शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

कलश यात्रेने शहर दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:23 IST

हनुमानजी महाराज व समस्त नगरवासीयांच्या वतीने परमपूज्य श्री परमानंदजी महाराज यांच्या अमृत वाणीतून श्रीराम कथेचा शुभारंभ रविवारी चामोर्शी मार्गावरील कमल-केशव सभागृहात करण्यात आला. दरम्यान आज सकाळी ९ वाजता शहरातील साई मंदिरापासून भव्य कलश यात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देश्रीराम कथा सप्ताहास प्रारंभ : धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचेही वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हनुमानजी महाराज व समस्त नगरवासीयांच्या वतीने परमपूज्य श्री परमानंदजी महाराज यांच्या अमृत वाणीतून श्रीराम कथेचा शुभारंभ रविवारी चामोर्शी मार्गावरील कमल-केशव सभागृहात करण्यात आला. दरम्यान आज सकाळी ९ वाजता शहरातील साई मंदिरापासून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. ही कलश यात्रा शहरातील मुख्य मार्गााने फिरविण्यात आली. यावेळी ‘जय श्रीराम’ नामाचा गजर करण्यात आला. ‘जय श्रीराम’ नामाच्या गजराने संपूर्ण गडचिरोली शहर दुमदुमले.श्रीराम कथेचे आयोजन रविवारपासून १३ जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे. वृंदावनवासी परमपूज्य परमानंद महाराज हे श्रीराम चरित्रमानस या ग्रंथातील कथेचे वाचन करून शहरवासीयांना मंत्रमुग्ध करणार आहेत. आज कथेच्या पहिल्या दिवशी परमपूज्य परमानंद महाराज म्हणाले की, रामकथा ही प्रभू श्रीरामाच्या उदारतेचे व चरित्राचे वर्णन व भाग्योदय करणारी आहे. भाग्योदय म्हणजेच संपूर्ण जग तुझं आणि माझं या मागेच पडलेले आहे. खरे मानवी जीवन या जगातील प्रत्येक मनुष्य विसरला आहे. अशा मानवाला रूळावर आणण्याचे काम श्रीराम कथा करीत असते.श्रीराम कथेत प्रभू श्रीरामाने कसे आदर्श जीवन मनुष्याने जगावे याचे जिवंत उदाहरण ठेवले आहे, असेही परमपूज्य परमानंद महाराजांनी सांगितले. या रामकथेला अधिकाधिक संगीमय व भक्तिमय बनविण्याकरीता श्रीरामाचे सुंदर असे भजन परमपूज्य परमानंद महाराज तसेच संगितकार अयोध्या, वृंदावन व झांशी येथून आलेले आहेत. या संगितकारांनी गायलेले भजन गडचिरोलीकरांना अगदी मोहून टाकणारे होते. कथेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.आज शिव विवाहप्रभू श्रीरामाच्या कथेत रामचरित मानस मधील ‘शिव विवाह’ यासंदर्भात कथा सोमवार ८ जानेवारीला सांगण्यात येणार आहे. कथा श्रवणासाठी जास्तीत जास्त संख्येने शहरवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कथा सप्ताह आयोजकांनी केले आहे.