शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

कलश यात्रेने शहर दुमदुमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:23 IST

हनुमानजी महाराज व समस्त नगरवासीयांच्या वतीने परमपूज्य श्री परमानंदजी महाराज यांच्या अमृत वाणीतून श्रीराम कथेचा शुभारंभ रविवारी चामोर्शी मार्गावरील कमल-केशव सभागृहात करण्यात आला. दरम्यान आज सकाळी ९ वाजता शहरातील साई मंदिरापासून भव्य कलश यात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देश्रीराम कथा सप्ताहास प्रारंभ : धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचेही वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हनुमानजी महाराज व समस्त नगरवासीयांच्या वतीने परमपूज्य श्री परमानंदजी महाराज यांच्या अमृत वाणीतून श्रीराम कथेचा शुभारंभ रविवारी चामोर्शी मार्गावरील कमल-केशव सभागृहात करण्यात आला. दरम्यान आज सकाळी ९ वाजता शहरातील साई मंदिरापासून भव्य कलश यात्रा काढण्यात आली. ही कलश यात्रा शहरातील मुख्य मार्गााने फिरविण्यात आली. यावेळी ‘जय श्रीराम’ नामाचा गजर करण्यात आला. ‘जय श्रीराम’ नामाच्या गजराने संपूर्ण गडचिरोली शहर दुमदुमले.श्रीराम कथेचे आयोजन रविवारपासून १३ जानेवारीपर्यंत करण्यात आले आहे. वृंदावनवासी परमपूज्य परमानंद महाराज हे श्रीराम चरित्रमानस या ग्रंथातील कथेचे वाचन करून शहरवासीयांना मंत्रमुग्ध करणार आहेत. आज कथेच्या पहिल्या दिवशी परमपूज्य परमानंद महाराज म्हणाले की, रामकथा ही प्रभू श्रीरामाच्या उदारतेचे व चरित्राचे वर्णन व भाग्योदय करणारी आहे. भाग्योदय म्हणजेच संपूर्ण जग तुझं आणि माझं या मागेच पडलेले आहे. खरे मानवी जीवन या जगातील प्रत्येक मनुष्य विसरला आहे. अशा मानवाला रूळावर आणण्याचे काम श्रीराम कथा करीत असते.श्रीराम कथेत प्रभू श्रीरामाने कसे आदर्श जीवन मनुष्याने जगावे याचे जिवंत उदाहरण ठेवले आहे, असेही परमपूज्य परमानंद महाराजांनी सांगितले. या रामकथेला अधिकाधिक संगीमय व भक्तिमय बनविण्याकरीता श्रीरामाचे सुंदर असे भजन परमपूज्य परमानंद महाराज तसेच संगितकार अयोध्या, वृंदावन व झांशी येथून आलेले आहेत. या संगितकारांनी गायलेले भजन गडचिरोलीकरांना अगदी मोहून टाकणारे होते. कथेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भाविकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.आज शिव विवाहप्रभू श्रीरामाच्या कथेत रामचरित मानस मधील ‘शिव विवाह’ यासंदर्भात कथा सोमवार ८ जानेवारीला सांगण्यात येणार आहे. कथा श्रवणासाठी जास्तीत जास्त संख्येने शहरवासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कथा सप्ताह आयोजकांनी केले आहे.