शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

नागरीकरणामुळे पशुधनावरही संक्रांत

By admin | Updated: October 4, 2015 02:20 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘गावाकडे चला’ असा संदेश दिला होता. गाव विकसित व स्वयंपूर्ण झाली पाहिजे,....

दिन विशेष : शेती व्यवस्था दुष्काळाच्या गर्तेत अडकलीगडचिरोली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘गावाकडे चला’ असा संदेश दिला होता. गाव विकसित व स्वयंपूर्ण झाली पाहिजे, हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वप्न होते. परंतु आज परिस्थिती उलट झाली आहे. गाव ओस पडून शहर फुगू लागली आहेत. खेडेगावात राहून शेती करणे हा तोट्याचे धंदा होऊन बसला आहे. त्यामुळे आधीच्या पिढीने केलेली शेती त्याच पिढीचा नवा प्रतिनिधी करण्यास तयार नाही, ठेक्याने किंवा बटईने शेती देऊन त्यांनी शहराकडे धाव घेतली आहे. त्यामुळे गावागावात असलेले पशुधन आज प्रचंड प्रमाणात कमी झाले आहे. पूर्वी घरोघरी दूध दुभत्याचा व्यवसाय भरभराटीला होता. घरोघरी गायी, म्हशी, बकऱ्या पाळल्या जात होत्या. गावागावात दूध मिळायचे. आज ग्रामीण भागातही दूध दुभत्याचा धंदा परवडेनासा झाला आहे. पशुधन वाढविण्यासाठी लागणारा खर्च झेपणारा नाही, अशी तक्रार शेतकरी करू लागले आहे. त्यामुळे अनेक लोक आपल्या जवळचे पशुधन विकून मोकळे होऊ लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व आदिवासीबहूल गावांमध्ये जनावरे पाळली जातात. मात्र त्यांचे दूध काढणे हे त्यांच्या भावनेला पटत नसल्याने अनेक जनावरे जंगलात दिवसभर चरत राहतात. शहरातही दुधाची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवते. याची भरपाई बाहेर जिल्ह्यातून दूध आणून केली जात आहे. पशुसंवर्धन विभाग रिक्तपदांच्या ओझ्यातच दबला असून अशा परिस्थितीतही काही पशुधन विकास अधिकारी चांगली सेवा देत आहे.