शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

चकरा वाढल्या : जुनी निवड समिती बरखास्त

By admin | Updated: February 17, 2015 01:43 IST

गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती

हजारो लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबितगडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती व इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना राबविल्या जातात. सरकार बदलल्यामुळे जुन्या निवड समित्या १५ जानेवारी २०१५ रोजी बरखास्त झाल्या. नवी समिती गठित झाली नसल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुक्यातील तहसील कार्यालयात जवळपास एक हजार पेक्षा अधिक अर्ज प्रलंबित असल्याची माहिती आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज केलेले नागरिक संबंधित तहसील कार्यालयाच्या वारंवार चकरा मारत असल्याचे दिसून येते.गडचिरोली तालुक्यात सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एकूण १ हजार ९०५ लाभार्थी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे दारिद्र्यरेषेवरील एकूण १ हजार ६०९ तर इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे दारिद्र्यरेषेखालील चार हजार ७९९ लाभार्थी आहेत. हे सर्व लाभार्थी दरमहा ६०० रूपये अनुदानाचा लाभ घेत आहेत. गडचिरोली तहसील कार्यालयात २८ फेब्रुवारी २०१४ रोजी घेण्यात आलेल्या निवड समितीच्या सभेत संजय गांधी निराधार योजनेचे एकूण १३६ अर्ज मंजूर करण्यात आले तर २२ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे १९४ अर्ज मंजूर तर १५ अर्ज नामंजूर करण्यात आली. त्यानंतरच्या सभेत संजय गांधी निराधार योजनेचे १३० अर्ज मंजूर तर १४ अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे ३३५ अर्ज मंजूर तर ९ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे २४४ अर्ज मंजूर तर २३ अर्ज नामंजूर करण्यात आले. नामंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रांची सुधारणा करून पुन्हा तहसील कार्यालयात योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्राप्त झालेल्या अर्जांवर कारवाई होऊ शकली नाही. परिणामी शेकडो अर्ज प्रलंबित राहिले. गडचिरोली तहसील कार्यालयात १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१५ या दीड महिन्याच्या कालावधीत निराधार योजनेचे एकूण २८८ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे ३९, श्रावणबाळ योजनेचे २४९ व इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेच्या एका अर्जाचा समावेश आहे. मात्र निवड समितीअभावी प्राप्त झालेले सर्व अर्ज प्रलंबित आहे. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात अशीच परिस्थिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)त्रैमासिक सभा होणे आवश्यककेंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तालुका निवड समितीची त्रैमासिक सभा होणे गरजेचे आहे. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे सभा होऊ शकली नाही. परिणामी अनेक अर्ज प्रलंबित आहेत. लाभार्थी निवडीचे अधिकार एसडीओंनाराज्य शासनाने नवे परिपत्रक काढून १५ जानेवारी २०१५ वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत असलेली जुनी लाभार्थी निवड समिती बरखास्त केली. नवी समिती गठीत होईपर्यंत प्राप्त अर्जावर कारवाई करून अर्ज मंजूर करण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यानुसार प्राप्त अर्ज मंजूर करण्याच्या कारवाईसाठी गडचिरोली येथे २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलाविण्यात आली आहे.पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर नवी निवड समिती अस्तित्वात येणार४वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत तालुकास्तरावर ९ शासकीय व अशासकीय सदस्यांची निवड समिती असते. यामध्ये न.प. क्षेत्रात शासकीय सदस्य म्हणून संवर्ग विकास अधिकारी, न.प. मुख्याधिकारी तर ७ अशासकीय सदस्य पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार नियुक्त केले जातात. समितीच्या अध्यक्षपदी एका अशासकीय सदस्याची निवड केली जाते. पालकमंत्री अशासकीय सदस्यांची नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुचवितात. त्यानंतर समिती गठीत केली जाते. जिल्ह्याचे पालकमंत्री निवड समितीबाबत केव्हा निर्णय घेतात, यावरच लाभार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.