शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गुरांनी लावली रहदारीची ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST

अंकिसा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा व छत्तीसगड राज्याला जोडतो. त्यामुळे २४ तास येथून वाहनांची वर्दळ असते. विशेषत: अवजड वाहनांची रहदारी अधिक असते. परंतु सकाळ व सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी येतात. प्रसंगी अपघातसुद्धा घडू शकतो.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील स्थिती : व्यावसायिकांनी दुकानांसमोर केले बांबूचे कुंपण

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी मोकाट जनावरांच्या हैैदोसाचा सामना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना करावा लागतो. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वत्र सारखीच स्थिती असते. मात्र अंकिसा परिसरात याहून स्थिती अधिक बिकट आहे. येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आधीच वाहनांची प्रचंड वर्दळ असताना मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते. काही दिवसांपासून येथे मोकाट जनावरांनी हैैदोस घातल्याने रहदारीची ‘वाट’ लागली आहे. संरक्षणासाठी अनेक दुकानदारांना प्रतिष्ठाणासमोर बांबूचे कुंपण करावे लागले आहे.अंकिसा येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा व छत्तीसगड राज्याला जोडतो. त्यामुळे २४ तास येथून वाहनांची वर्दळ असते. विशेषत: अवजड वाहनांची रहदारी अधिक असते. परंतु सकाळ व सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे ठिय्या मांडतात. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी येतात. प्रसंगी अपघातसुद्धा घडू शकतो. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत ग्रामीण स्तरावर काहीच उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे मोकाट जनावरे रस्त्यावरून गिरट्या घालत असतात.गावातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या सभोवताल बांबूंचे कुंपण करून बंदोबस्त केला आहे. मोकाट जनावरांपासून त्यांच्या मालाचे संरक्षण होत असले तरी इतरांचे काय? असा सवाल होत आहे.दुर्घटना घडल्यास जबाबदारी कुणाची?अंकिसा येथील महामार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशास्थितीत येथे मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. ग्रामीण भागात दिवसेंदिवस गुराख्यांची टंचाई भासत असल्याने जनावरे मोकाट राहतात. परिणामी अनेक शेतकरी अनावश्यक जनावरे कसायांना विक्री करतात.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा