शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

धान्यामध्ये विष टाकून पक्ष्यांची केली जात आहे शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:14 IST

उन्हाची तिव्रता वाढत असल्याने पशु-पक्ष्यांना पाणी व चारा मिळणे कठीण झाले आहे. याचा गैरफायदा शिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. पाणवठ्याच्या शेजारी विषात कालवलेले धान्य टाकले जात आहे. अशा प्रकारे रोज शेकडो पक्ष्यांची शिकार केली जात आहे. असा प्रकार आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील कर्रेम जंगलात रविवारी उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देकर्रेम जंगलातील प्रकार : उन्हाळ्याच्या दाहकतेचा शिकाऱ्यांकडून गैरफायदा, नागरिकांना विषबाधा होण्याचा धोका

प्रशांत ठेपाले ।लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : उन्हाची तिव्रता वाढत असल्याने पशु-पक्ष्यांना पाणी व चारा मिळणे कठीण झाले आहे. याचा गैरफायदा शिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. पाणवठ्याच्या शेजारी विषात कालवलेले धान्य टाकले जात आहे. अशा प्रकारे रोज शेकडो पक्ष्यांची शिकार केली जात आहे. असा प्रकार आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील कर्रेम जंगलात रविवारी उघडकीस आला आहे.जंगलातील पशु-पक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वनविभागाने अनेक ठिकाणी वनतलाव खोदले आहेत. मार्च महिन्याला सुरूवात होताच तापमानात वाढ झाली आहे. पानझडीला सुरूवात झाली असल्याने पशु-पक्ष्यांना त्यांचे खाद्य मिळणे कठीण झाले आहे. अशातच पाणवठ्यांजवळ हिरवळ व थंडावा राहत असल्याने सदर ठिकाण पशु-पक्ष्यांचे लक्ष वेधून घेत आहे. परिणामी पाणवठ्यांच्या सभोवताल पशु-पक्ष्यांची दिवसभर गर्दी दिसून येत आहे. याचा फायदा शिकाऱ्यांकडून उचलला जात आहे. यापूर्वी टोपली किंवा जाळीच्या सहाय्याने पक्ष्यांची शिकार केली जात होती. आता मात्र विषारी धान्य टाकून पक्ष्यांची शिकार करण्याचा नवीनच शोध शिकाऱ्यांनी लावला असल्याचे दिसून येत आहे. हिरव्यागार झाडाच्या खाली धान्य टाकून ठेवले जाते. या धान्याला जल स्वरूपात असलेले विष लावले राहते. भुकेने व्याकुळ झालेले पक्षी सदर धान्य खातात. धान्य खाताच काही वेळाने पक्ष्यांचा मृत्यू होतो. काही पक्ष्यांची उडण्याची क्षमताच कमी होतो. तर काही पक्षी चक्कर येऊन झाडावरून पडतात. शिकारी अगदी बाजूलाच बसलेला असतो. पक्षी झाडावरून पडताच त्याला उचलले जाते. प्रतिनीधीने शिकाऱ्यांच्या थैलीत बघीतले असता त्याच्या थैलीत चार ते पाच जंगली कबुत्तर दिसून आले. त्याला विचारले असता पक्ष्याची शिकार कशी केली जाते, याविषयीची माहिती प्रतिनिधीला दिली. तसेच धान्यामध्ये टाकण्यासाठी वापरण्यात येणारे विष एटापल्ली किंवा सुदरनगर येथे मिळते असे सांगीतले. विषाच्या बॉटलचे नेमके नाव मात्र त्याला माहीत नाही. विशेष म्हणजे पक्ष्यांची शिकार विशिष्ट समाजाचे व्यक्ती करीत आहेत. आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या तिनही वनविभागात अनेक प्रकारचे आकर्षक व दुर्मिळ पक्षी आढळून येत होते.मात्र शिकरीचे प्रमाण वाढल्याचे पशु-पक्ष्यांची संख्या कमालीची घटली आहे. मोठे जंगल असतानाही अत्यंत कमी प्रमाणात पक्षी शिल्लक आहेत. वनविभागाने शिकाऱ्यांकडे लक्ष न दिल्यास पशु-पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे.मांसासोबतच विषाचेही सेवनपक्ष्याची शिकार केल्यानंतर त्याच्या शरिरामध्ये असणाºया आतड्या व इतर अवयव फेकून दिले जातात. त्यानंतर त्याचे मांस शिजवून सेवन केले जाते. आतड्या व इतर अवयव फे कून दिल्याने त्यामध्ये विष राहत नाही असा दावा संबंधित शिकाऱ्याकडून केला जात असला तरी काही प्रमाणात विष शिल्लकच राहते असे तज्ज्ञांचे मत आहे. यावरून शिकाऱ्याचे कुटुंब पक्ष्याच्या मांसासोबतच विषाचेही सेवन करीत आहे. एखादे दिवशी जास्त पक्ष्यांची शिकार झाल्यास काही पक्षी इतर नागरिकांनाही विकले जातात. विक्री करतेवेळी संबंधीत ग्राहकाला पक्ष्याची शिकार विष टाकून केली नसून बंदुक, गुल्यार, जाळे, टोपली आदींच्या माध्यमातून केली जात असल्याचे सांगीतले जाते. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ग्राहक विषयुक्त पक्षी खरेदी करतो. या पक्ष्याच्या मांसाचे सेवन केल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.