शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

धान्यामध्ये विष टाकून पक्ष्यांची केली जात आहे शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:14 IST

उन्हाची तिव्रता वाढत असल्याने पशु-पक्ष्यांना पाणी व चारा मिळणे कठीण झाले आहे. याचा गैरफायदा शिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. पाणवठ्याच्या शेजारी विषात कालवलेले धान्य टाकले जात आहे. अशा प्रकारे रोज शेकडो पक्ष्यांची शिकार केली जात आहे. असा प्रकार आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील कर्रेम जंगलात रविवारी उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देकर्रेम जंगलातील प्रकार : उन्हाळ्याच्या दाहकतेचा शिकाऱ्यांकडून गैरफायदा, नागरिकांना विषबाधा होण्याचा धोका

प्रशांत ठेपाले ।लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : उन्हाची तिव्रता वाढत असल्याने पशु-पक्ष्यांना पाणी व चारा मिळणे कठीण झाले आहे. याचा गैरफायदा शिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. पाणवठ्याच्या शेजारी विषात कालवलेले धान्य टाकले जात आहे. अशा प्रकारे रोज शेकडो पक्ष्यांची शिकार केली जात आहे. असा प्रकार आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील कर्रेम जंगलात रविवारी उघडकीस आला आहे.जंगलातील पशु-पक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वनविभागाने अनेक ठिकाणी वनतलाव खोदले आहेत. मार्च महिन्याला सुरूवात होताच तापमानात वाढ झाली आहे. पानझडीला सुरूवात झाली असल्याने पशु-पक्ष्यांना त्यांचे खाद्य मिळणे कठीण झाले आहे. अशातच पाणवठ्यांजवळ हिरवळ व थंडावा राहत असल्याने सदर ठिकाण पशु-पक्ष्यांचे लक्ष वेधून घेत आहे. परिणामी पाणवठ्यांच्या सभोवताल पशु-पक्ष्यांची दिवसभर गर्दी दिसून येत आहे. याचा फायदा शिकाऱ्यांकडून उचलला जात आहे. यापूर्वी टोपली किंवा जाळीच्या सहाय्याने पक्ष्यांची शिकार केली जात होती. आता मात्र विषारी धान्य टाकून पक्ष्यांची शिकार करण्याचा नवीनच शोध शिकाऱ्यांनी लावला असल्याचे दिसून येत आहे. हिरव्यागार झाडाच्या खाली धान्य टाकून ठेवले जाते. या धान्याला जल स्वरूपात असलेले विष लावले राहते. भुकेने व्याकुळ झालेले पक्षी सदर धान्य खातात. धान्य खाताच काही वेळाने पक्ष्यांचा मृत्यू होतो. काही पक्ष्यांची उडण्याची क्षमताच कमी होतो. तर काही पक्षी चक्कर येऊन झाडावरून पडतात. शिकारी अगदी बाजूलाच बसलेला असतो. पक्षी झाडावरून पडताच त्याला उचलले जाते. प्रतिनीधीने शिकाऱ्यांच्या थैलीत बघीतले असता त्याच्या थैलीत चार ते पाच जंगली कबुत्तर दिसून आले. त्याला विचारले असता पक्ष्याची शिकार कशी केली जाते, याविषयीची माहिती प्रतिनिधीला दिली. तसेच धान्यामध्ये टाकण्यासाठी वापरण्यात येणारे विष एटापल्ली किंवा सुदरनगर येथे मिळते असे सांगीतले. विषाच्या बॉटलचे नेमके नाव मात्र त्याला माहीत नाही. विशेष म्हणजे पक्ष्यांची शिकार विशिष्ट समाजाचे व्यक्ती करीत आहेत. आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या तिनही वनविभागात अनेक प्रकारचे आकर्षक व दुर्मिळ पक्षी आढळून येत होते.मात्र शिकरीचे प्रमाण वाढल्याचे पशु-पक्ष्यांची संख्या कमालीची घटली आहे. मोठे जंगल असतानाही अत्यंत कमी प्रमाणात पक्षी शिल्लक आहेत. वनविभागाने शिकाऱ्यांकडे लक्ष न दिल्यास पशु-पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे.मांसासोबतच विषाचेही सेवनपक्ष्याची शिकार केल्यानंतर त्याच्या शरिरामध्ये असणाºया आतड्या व इतर अवयव फेकून दिले जातात. त्यानंतर त्याचे मांस शिजवून सेवन केले जाते. आतड्या व इतर अवयव फे कून दिल्याने त्यामध्ये विष राहत नाही असा दावा संबंधित शिकाऱ्याकडून केला जात असला तरी काही प्रमाणात विष शिल्लकच राहते असे तज्ज्ञांचे मत आहे. यावरून शिकाऱ्याचे कुटुंब पक्ष्याच्या मांसासोबतच विषाचेही सेवन करीत आहे. एखादे दिवशी जास्त पक्ष्यांची शिकार झाल्यास काही पक्षी इतर नागरिकांनाही विकले जातात. विक्री करतेवेळी संबंधीत ग्राहकाला पक्ष्याची शिकार विष टाकून केली नसून बंदुक, गुल्यार, जाळे, टोपली आदींच्या माध्यमातून केली जात असल्याचे सांगीतले जाते. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ग्राहक विषयुक्त पक्षी खरेदी करतो. या पक्ष्याच्या मांसाचे सेवन केल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.