शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

अपघात ही देशासमोरील मोठी समस्या

By admin | Updated: January 12, 2016 01:24 IST

वाढती वाहनांची संख्या व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे केले जाणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

महेश आव्हाड यांचे प्रतिपादन : रस्ता सुरक्षा अभियानाचा गडचिरोलीत शुभारंभगडचिरोली : वाढती वाहनांची संख्या व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे केले जाणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातानंतर संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळते. हे संकट टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, अपघातामुळे दर दिवशी ३७० नागरिक मरण पावतात. २०१३ मध्ये देशभरातील अपघातांमध्ये १ लाख ३७ हजार नागरिक मृत्युमुखी पडले. युद्ध, आतंकवादी हल्ले यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने नागरिक अपघातामध्ये मृत्यू पावले आहेत. त्यामुळे अपघात ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या बनली आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले.जिल्हा सुरक्षा समिती, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गडचिरोली व शहर वाहतूक पोलीस शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक इंदिरा गांधी चौकातील सभागृहात रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्राचार्य संजय भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे यांनी बहुतांश अपघात निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहन चालविताना प्रत्येक चालकाने वाहतूक नियमांचे पालन केलेच पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकादरम्यान सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फासे यांनी दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात १० ते १२ हजार वाहनांची भर पडत आहे. प्रत्येक १० व्यक्तीमागे एक वाहन आहे. वाहनांची संख्या वाढत चालल्याने देशात प्रत्येक मिनिटाला एक अपघात घडतो. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे कर्तव्य मानून वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका व वाहतूक नियमांविषयी असलेल्या पत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन निरीक्षक नीलेश बन्सोड यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रशांत इंगवले, नितीन सूर्यवंशी, हर्षल बदन, मेश्राम, नीलेश उराडे, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपूत यांच्यासह वाहतूक पोलीसांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)