शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

अपघात ही देशासमोरील मोठी समस्या

By admin | Updated: January 12, 2016 01:24 IST

वाढती वाहनांची संख्या व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे केले जाणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

महेश आव्हाड यांचे प्रतिपादन : रस्ता सुरक्षा अभियानाचा गडचिरोलीत शुभारंभगडचिरोली : वाढती वाहनांची संख्या व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे केले जाणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातानंतर संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळते. हे संकट टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, अपघातामुळे दर दिवशी ३७० नागरिक मरण पावतात. २०१३ मध्ये देशभरातील अपघातांमध्ये १ लाख ३७ हजार नागरिक मृत्युमुखी पडले. युद्ध, आतंकवादी हल्ले यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने नागरिक अपघातामध्ये मृत्यू पावले आहेत. त्यामुळे अपघात ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या बनली आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले.जिल्हा सुरक्षा समिती, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गडचिरोली व शहर वाहतूक पोलीस शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक इंदिरा गांधी चौकातील सभागृहात रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्राचार्य संजय भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे यांनी बहुतांश अपघात निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहन चालविताना प्रत्येक चालकाने वाहतूक नियमांचे पालन केलेच पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकादरम्यान सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फासे यांनी दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात १० ते १२ हजार वाहनांची भर पडत आहे. प्रत्येक १० व्यक्तीमागे एक वाहन आहे. वाहनांची संख्या वाढत चालल्याने देशात प्रत्येक मिनिटाला एक अपघात घडतो. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे कर्तव्य मानून वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका व वाहतूक नियमांविषयी असलेल्या पत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन निरीक्षक नीलेश बन्सोड यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रशांत इंगवले, नितीन सूर्यवंशी, हर्षल बदन, मेश्राम, नीलेश उराडे, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपूत यांच्यासह वाहतूक पोलीसांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)