शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अपघात ही देशासमोरील मोठी समस्या

By admin | Updated: January 12, 2016 01:24 IST

वाढती वाहनांची संख्या व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे केले जाणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

महेश आव्हाड यांचे प्रतिपादन : रस्ता सुरक्षा अभियानाचा गडचिरोलीत शुभारंभगडचिरोली : वाढती वाहनांची संख्या व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे केले जाणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातानंतर संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळते. हे संकट टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, अपघातामुळे दर दिवशी ३७० नागरिक मरण पावतात. २०१३ मध्ये देशभरातील अपघातांमध्ये १ लाख ३७ हजार नागरिक मृत्युमुखी पडले. युद्ध, आतंकवादी हल्ले यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने नागरिक अपघातामध्ये मृत्यू पावले आहेत. त्यामुळे अपघात ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या बनली आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले.जिल्हा सुरक्षा समिती, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गडचिरोली व शहर वाहतूक पोलीस शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक इंदिरा गांधी चौकातील सभागृहात रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्राचार्य संजय भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे यांनी बहुतांश अपघात निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहन चालविताना प्रत्येक चालकाने वाहतूक नियमांचे पालन केलेच पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकादरम्यान सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फासे यांनी दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात १० ते १२ हजार वाहनांची भर पडत आहे. प्रत्येक १० व्यक्तीमागे एक वाहन आहे. वाहनांची संख्या वाढत चालल्याने देशात प्रत्येक मिनिटाला एक अपघात घडतो. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे कर्तव्य मानून वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका व वाहतूक नियमांविषयी असलेल्या पत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन निरीक्षक नीलेश बन्सोड यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रशांत इंगवले, नितीन सूर्यवंशी, हर्षल बदन, मेश्राम, नीलेश उराडे, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपूत यांच्यासह वाहतूक पोलीसांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)