शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

रोहयोच्या कामांचे ७.७९ कोटी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:47 IST

दिलीप दहेलकर ।ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये विविध कामे हाती घेण्यात आली होती. काही कामे पूर्ण झाली असून बरीच कामे सुरू आहेत. मात्र नरेगाच्या कुशल व अकुशल कामाचा निधी शासनाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने सुरू असलेल्या कामांवर ...

ठळक मुद्देउद्दिष्टपूर्तीत अडचणी : गडचिरोलीतील रोहयो कामांना ब्रेक

दिलीप दहेलकर ।ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये विविध कामे हाती घेण्यात आली होती. काही कामे पूर्ण झाली असून बरीच कामे सुरू आहेत. मात्र नरेगाच्या कुशल व अकुशल कामाचा निधी शासनाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने सुरू असलेल्या कामांवर परिणाम झाला आहे. गडचिरोलीतील कुशल व अकुशल कामांचे मिळून केंद्र शासनाकडे ७ कोटी ७९ लाख ८२ हजार रूपये प्रलंबित आहे.जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागामार्फत रोहयोच्या कामांचा वार्षिक आराखडा तयार करून त्यास मंजुरी प्रदान केली जाते. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींमार्फत कामे सुरू केली जातात. रोहयोच्या कायद्यान्वये ५० टक्के कामे यंत्रणास्तरावर व ५० टक्के कामे ग्रामपंचायत स्तरावर केली जातात. नरेगाच्या कामांचे संबंधित ग्रामपंचायत व प्रशासकीय विभागांना वार्षिक उद्दिष्टही दिले जाते. सदर उद्दिष्ट गाठण्यासाठी जि.प. यंत्रणेमार्फत कार्यशाळाही राबविल्या जातात. मात्र गेल्या चार महिन्यांपासून नरेगाच्या कुशल कामांचे ५ कोटी ६८ लाख रूपये केंद्र शासनाकडून मिळाले नाहीत. याशिवाय अकुशल कामांचे जवळपास पावणेदोन कोटी रूपये प्रलंबित आहेत. त्यामुळे नरेगाचे काम करणारे अधिकारी, कर्मचारी पुरते हतबल झाले आहेत.निधीअभावी जिल्ह्याच्या अनेक भागातील नरेगाची कामे थांबली असल्याने शासनाने दिलेले कामाचे उद्दिष्ट कसे गाठावे, असा प्रश्न साऱ्यांच यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने नरेगाचा हा गंभीर प्रश्न तत्काळ मार्गी लावून ७ कोटी ७९ लाख ८२ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.पुरवठादारांकडून साहित्य पुरवठा बंदरोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर, शौचालय व इतर बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. बरीचशी कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत, मात्र निधीअभावी बिल प्रलंबित असल्याने पुरवठादारांनी सिमेंट, लोखंडी साहित्य, रेती, गिट्टी आदी ग्रामपंचायतींना पुरविण्यास नकार दिला आहे. परिणामी ग्रामसेवकांसह सारीच यंत्रणा आता रोहयोची कामे करण्यासाठी चालढकल करीत आहे. निधी प्रलंबित असल्याने शौचालय व गांडूळ खत निर्मितीच्या कामांवर परिणाम झाला आहे.रोजगार घटणारशेती मशागतीचे कामे नसल्याने हजारो नोंदणीकृत मजूर रिकामे आहेत. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात रोहयोच्या कामाची मागणी अनेक असते. त्यानंतर मे पासून तेंदू हंगाम सुरू झाल्यावर तिकडे वळतात. निधीसाठी विलंब झाल्यास रोजगार घटणार आहे.