शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

रोहयोच्या कामांचे ७.७९ कोटी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:47 IST

दिलीप दहेलकर ।ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये विविध कामे हाती घेण्यात आली होती. काही कामे पूर्ण झाली असून बरीच कामे सुरू आहेत. मात्र नरेगाच्या कुशल व अकुशल कामाचा निधी शासनाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने सुरू असलेल्या कामांवर ...

ठळक मुद्देउद्दिष्टपूर्तीत अडचणी : गडचिरोलीतील रोहयो कामांना ब्रेक

दिलीप दहेलकर ।ऑनलाईन लोकमतगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१७-१८ मध्ये विविध कामे हाती घेण्यात आली होती. काही कामे पूर्ण झाली असून बरीच कामे सुरू आहेत. मात्र नरेगाच्या कुशल व अकुशल कामाचा निधी शासनाकडे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने सुरू असलेल्या कामांवर परिणाम झाला आहे. गडचिरोलीतील कुशल व अकुशल कामांचे मिळून केंद्र शासनाकडे ७ कोटी ७९ लाख ८२ हजार रूपये प्रलंबित आहे.जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागामार्फत रोहयोच्या कामांचा वार्षिक आराखडा तयार करून त्यास मंजुरी प्रदान केली जाते. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींमार्फत कामे सुरू केली जातात. रोहयोच्या कायद्यान्वये ५० टक्के कामे यंत्रणास्तरावर व ५० टक्के कामे ग्रामपंचायत स्तरावर केली जातात. नरेगाच्या कामांचे संबंधित ग्रामपंचायत व प्रशासकीय विभागांना वार्षिक उद्दिष्टही दिले जाते. सदर उद्दिष्ट गाठण्यासाठी जि.प. यंत्रणेमार्फत कार्यशाळाही राबविल्या जातात. मात्र गेल्या चार महिन्यांपासून नरेगाच्या कुशल कामांचे ५ कोटी ६८ लाख रूपये केंद्र शासनाकडून मिळाले नाहीत. याशिवाय अकुशल कामांचे जवळपास पावणेदोन कोटी रूपये प्रलंबित आहेत. त्यामुळे नरेगाचे काम करणारे अधिकारी, कर्मचारी पुरते हतबल झाले आहेत.निधीअभावी जिल्ह्याच्या अनेक भागातील नरेगाची कामे थांबली असल्याने शासनाने दिलेले कामाचे उद्दिष्ट कसे गाठावे, असा प्रश्न साऱ्यांच यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने नरेगाचा हा गंभीर प्रश्न तत्काळ मार्गी लावून ७ कोटी ७९ लाख ८२ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.पुरवठादारांकडून साहित्य पुरवठा बंदरोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर, शौचालय व इतर बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. बरीचशी कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत, मात्र निधीअभावी बिल प्रलंबित असल्याने पुरवठादारांनी सिमेंट, लोखंडी साहित्य, रेती, गिट्टी आदी ग्रामपंचायतींना पुरविण्यास नकार दिला आहे. परिणामी ग्रामसेवकांसह सारीच यंत्रणा आता रोहयोची कामे करण्यासाठी चालढकल करीत आहे. निधी प्रलंबित असल्याने शौचालय व गांडूळ खत निर्मितीच्या कामांवर परिणाम झाला आहे.रोजगार घटणारशेती मशागतीचे कामे नसल्याने हजारो नोंदणीकृत मजूर रिकामे आहेत. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात रोहयोच्या कामाची मागणी अनेक असते. त्यानंतर मे पासून तेंदू हंगाम सुरू झाल्यावर तिकडे वळतात. निधीसाठी विलंब झाल्यास रोजगार घटणार आहे.