शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

५४ पूल धोकादायक

By admin | Updated: July 14, 2017 02:06 IST

जिल्ह्यातील एकूण पुलांपैकी ५२ पुलांची उंची कमी असल्याने या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहते.

पावसाळ्यात तुटतो संपर्क : ठेंगण्या पुलांवरून चढते पावसाचे पाणीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील एकूण पुलांपैकी ५२ पुलांची उंची कमी असल्याने या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहते. त्यामुळे ही ५४ पुले धोकादायक असल्याचे दिसून येते. काही गावांना तर या पुलांव्यतिरिक्त इतर ठिकाणावरून जाण्यासाठी मार्ग नसल्याने या पुलांवरून पाणी वाहू लागताच संबंधित गावांचा जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे पावसाळयादरम्यान या पुलांच्या पाणी पातळीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. नक्षल्यांची दहशत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष यामुळे एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या तालुक्यांमधील दुर्गम भागातील रस्ते व पुलांचे बांधकाम अजूनपर्यंत होऊ शकले नाही. जिल्ह्यातील शेकडो गावे अजुनही बारमाही रस्त्यांपासून वंचित आहेत. या गावांना पायवाटेनेच जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान या गावांना जाणे अशक्य होते. तर पावसाळ्यादरम्यान एखादा ओढा या गावाचा मार्ग अडवून धरतो. काही मुख्य मार्गांवर पुलांचे बांधकाम २० वर्षांपूर्वी करण्यात आले होते. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत ठेंगणे पूल बांधण्यात आले. सदर पुलांची उंची वाढविणे आवश्यक असले तरी अजूनपर्यंत काही पुलांची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. दरवर्षी पावसाळ्यादरम्यान या पुलांवरून पाणी वाहत राहते. त्यामुळे संबंधित गावांचा जगाशी संपर्क तुटतो. काही पूल तर अतिशय जुने असून कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मात्र सदर पुलांची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नाही. परिणामी सदर पूल कधीही कोसळण्याचा धोका आहे. हा धोका माहित असतानाही संबंधित गावकऱ्यांना इतर पर्याय उपलब्ध नसल्याने याच पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागतो. गृहमंत्रालयाच्या मदतीची प्रतीक्षापुलांची उंची वाढविण्याविषयी राज्य व केंद्र शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र कधी नक्षलवाद तर कधी निधीचे कारण पुढे करून पुलाची उंची वाढविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने विशेष निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. या अंतर्गतच नक्षलग्रस्त भागात टॉवरचे बांधकाम करण्यात येत आहे. गोदावरी नदीवरील सिरोंचा जवळील पूल याच योजनेतून बांधण्यात आला आहे. त्यामुळे या पुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.३७ गावांना पर्यायी रस्तेच नाही५४ पुलांची उंची कमी असल्याने या पुलांवरून पावसाळ्यादरम्यान पाणी वाहते. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटतो. मात्र ३७ गावे अशी आहेत की, या ठेंगण्या पुलावरून पाणी वाहत राहत असल्यास इतर पुलावरून जाता येत नाही. त्यामुळे या गावांचा जगाशीच संपर्क तुटतो. या कालावधीत एखादा गंभीर रूग्ण असल्यास किंवा गरोदर मातेला प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल करायचे झाल्यास काहीच पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे अशा पुलांना प्राधान्य देऊन त्यांची उंची वाढविणे आवश्यक आहे. इतर १७ मार्गावरील पुलांवरून पाणी राहिल्यास दुसऱ्या गावावरून त्या गावामध्ये जाण्याची सुविधा उपलब्ध होत असल्याने तेथील नागरिकांना फारशी अडचण जाणवत नाही.