शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

५४ पूल धोकादायक

By admin | Updated: July 14, 2017 02:06 IST

जिल्ह्यातील एकूण पुलांपैकी ५२ पुलांची उंची कमी असल्याने या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहते.

पावसाळ्यात तुटतो संपर्क : ठेंगण्या पुलांवरून चढते पावसाचे पाणीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील एकूण पुलांपैकी ५२ पुलांची उंची कमी असल्याने या पुलावरून पावसाळ्यात पाणी वाहते. त्यामुळे ही ५४ पुले धोकादायक असल्याचे दिसून येते. काही गावांना तर या पुलांव्यतिरिक्त इतर ठिकाणावरून जाण्यासाठी मार्ग नसल्याने या पुलांवरून पाणी वाहू लागताच संबंधित गावांचा जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे पावसाळयादरम्यान या पुलांच्या पाणी पातळीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. नक्षल्यांची दहशत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष यामुळे एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या तालुक्यांमधील दुर्गम भागातील रस्ते व पुलांचे बांधकाम अजूनपर्यंत होऊ शकले नाही. जिल्ह्यातील शेकडो गावे अजुनही बारमाही रस्त्यांपासून वंचित आहेत. या गावांना पायवाटेनेच जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान या गावांना जाणे अशक्य होते. तर पावसाळ्यादरम्यान एखादा ओढा या गावाचा मार्ग अडवून धरतो. काही मुख्य मार्गांवर पुलांचे बांधकाम २० वर्षांपूर्वी करण्यात आले होते. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत ठेंगणे पूल बांधण्यात आले. सदर पुलांची उंची वाढविणे आवश्यक असले तरी अजूनपर्यंत काही पुलांची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. दरवर्षी पावसाळ्यादरम्यान या पुलांवरून पाणी वाहत राहते. त्यामुळे संबंधित गावांचा जगाशी संपर्क तुटतो. काही पूल तर अतिशय जुने असून कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मात्र सदर पुलांची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली नाही. परिणामी सदर पूल कधीही कोसळण्याचा धोका आहे. हा धोका माहित असतानाही संबंधित गावकऱ्यांना इतर पर्याय उपलब्ध नसल्याने याच पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागतो. गृहमंत्रालयाच्या मदतीची प्रतीक्षापुलांची उंची वाढविण्याविषयी राज्य व केंद्र शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र कधी नक्षलवाद तर कधी निधीचे कारण पुढे करून पुलाची उंची वाढविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने विशेष निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. या अंतर्गतच नक्षलग्रस्त भागात टॉवरचे बांधकाम करण्यात येत आहे. गोदावरी नदीवरील सिरोंचा जवळील पूल याच योजनेतून बांधण्यात आला आहे. त्यामुळे या पुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.३७ गावांना पर्यायी रस्तेच नाही५४ पुलांची उंची कमी असल्याने या पुलांवरून पावसाळ्यादरम्यान पाणी वाहते. त्यामुळे या गावांचा संपर्क तुटतो. मात्र ३७ गावे अशी आहेत की, या ठेंगण्या पुलावरून पाणी वाहत राहत असल्यास इतर पुलावरून जाता येत नाही. त्यामुळे या गावांचा जगाशीच संपर्क तुटतो. या कालावधीत एखादा गंभीर रूग्ण असल्यास किंवा गरोदर मातेला प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल करायचे झाल्यास काहीच पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे अशा पुलांना प्राधान्य देऊन त्यांची उंची वाढविणे आवश्यक आहे. इतर १७ मार्गावरील पुलांवरून पाणी राहिल्यास दुसऱ्या गावावरून त्या गावामध्ये जाण्याची सुविधा उपलब्ध होत असल्याने तेथील नागरिकांना फारशी अडचण जाणवत नाही.