शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

४७२१ जणांना कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:24 IST

रोजगारांनी स्वयंरोजगार उभारण्यास प्राधान्य द्यावे यासाठी ‘मुद्रा’ योजनेअंतर्गत त्यांना कर्जवाटप करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत ४७२१ जणांना ५१ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

ठळक मुद्देमुद्रा योजनेतून ५१.४१ कोटी दिले : राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेचा प्रतिसाद

मनोज ताजने ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : बेरोजगारांनी स्वयंरोजगार उभारण्यास प्राधान्य द्यावे यासाठी ‘मुद्रा’ योजनेअंतर्गत त्यांना कर्जवाटप करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत ४७२१ जणांना ५१ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात या योजनेतून कर्जवाटपाचे प्रमाण कमी असले तरी छोटे-छोटे व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या या जिल्ह्यात जास्त आहे. कोणीही हमीदार किंवा तारणशिवाय केवळ अर्जदाराची प्रामाणिकता तपासून केल्या जात असलेल्या या कर्जवाटपामुळे अनेक युवकांना दिलासा मिळाला आहे.२०१५-१६ या आर्थिक वर्षापासून या योजनेला सुरूवात झाली. पहिल्या वर्षी बँकांना दिलेले कर्जवाटपाचे लक्ष्य हे किमान लक्ष्य होते. पण बँकांनी ते कमाल लक्ष्य समजून मोजक्याच लोकांना कर्जवाटप केले. दुसºया वर्षी म्हणजे २०१६-१७ मध्ये तो गैरसमज दूर झाल्याने कर्जवाटपाचे प्रमाण वाढले. यावर्षीच्या (२०१७-१८) आर्थिक वर्षातील १० महिन्यात १३९७ जणांना २२ कोटी २२ लाख ४१ हजार रुपयांचे कर्जवाटप जानेवारी अखेरपर्यंत करण्यात आले. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हा आकडा आणखी वाढणार आहे.यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक ७ कोटी २१ लाख रुपयांचे कर्जवाटप बँक आॅफ महाराष्टÑने केले आहे. मात्र ते ६८ जणांनाच केले. बँक आॅफ इंडियाने ५ कोटी २१ लाख ६७ हजार रुपयांचे कर्जवाटप १२४ जणांना केले आहे. याशिवाय गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २ कोटी ६८ लाख १४ हजार रुपयांचे कर्जवापट ४२ जणांना केल्याचे दिसून येते.मुद्रा योजनेतून तीन टप्प्यात कर्जवाटप केले जाते. ५० हजारपर्यंत, ५ लाखापर्यंत किंवा १० लाखापर्यंत कर्ज घेता येते. त्यासाठी वेगवेगळ्या अटी आहेत. त्या कर्जावर ९ टक्क्यांपासून १२.५ टक्क्यांपर्यंत वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे व्याजदर लावले जातात.हातठेला, चहाटपरी, पानठेला यासारख्या छोट्या व्यावसायासाठी ‘शिशू’ या टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. ५० हजार ते ५ लाख पर्यंतच्या कर्जासाठी ‘किशोर’ या टप्प्यातून कर्ज दिले जाते. त्यासाठी संबंधिताला दुकानसारखा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वत:ची किंवा भाड्याची जागा, भाडेतत्वाचे करारपत्र आणि बँक बॅलन्सची शिट द्यावी लागते. तर त्यापेक्षा जास्त म्हणजे १० लाखापर्यंतच्या कर्जातून एखादे छोटे युनिट टाकून व्यवसाय उभारता येतो. पण त्यासाठी स्वत:ची जागा किंवा करारपत्रासोबतच प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागतो. त्यात केल्या जाणाºया व्यवसायाची इत्यंभूत माहिती आणि होणारा नफा याचीही माहिती द्यावी लागते.दुर्गम तालुक्यांमध्ये नागरिकच अनुत्सुकगडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम, आदिवासीबहुल तालुक्यातून या योजनेतून कर्ज घेण्यासाठी अतिशय कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यात भामरागड, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, धानोरा या तालुक्यांचा समावेश आहे. त्या भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थितीच जेमतेम असल्यामुळे कोणताही व्यवसाय करण्यासाठी त्या परिसरात फारसा वाव दिसून येत नाही. त्यांच्या तुलनेत गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा तालुक्यात मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.खासगी बँकांनी घेतला आखडता हातराष्ट्रीयकृत आणि जिल्हा सहकारी बँकेकडून मुद्रा योजनेतून कर्जवाटप करण्यास चांगला प्रतिसाद दिला जात असला तरी अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय या खासगी बँकांनी मात्र या सरकारी योजनेला खो दिल्याचे दिसून येते. अ‍ॅक्सिस बँकेने योजना सुरू झाल्यापासून जानेवारी अखेरपर्यंत एकाही बेरोजगाराला मुद्रा योजनेअंतर्गत कर्जवाटप केलेले नाही. आयसीआयसीआय बँकेने केवळ एका अर्जदाराला २४ हजार रुपयांचे कर्ज दिले आहे.मुद्रा योजनेतून कर्जवाटप वाढत आहे. वास्तविक या योजनेतून कर्ज मिळण्यासाठी अर्ज करताना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता न करताच लोक अर्ज करतात. शिवाय हमीदार किंवा तारणशिवाय कर्ज मंजूर करताना अर्जदाराचा व्यवसाय करण्यामागील प्रामाणिक हेतूही तपासावा लागतो, त्यामुळे थोडा वेळ लागतो.- पी.एम.भोसले, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक गडचिरोली