शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

४७२१ जणांना कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:24 IST

रोजगारांनी स्वयंरोजगार उभारण्यास प्राधान्य द्यावे यासाठी ‘मुद्रा’ योजनेअंतर्गत त्यांना कर्जवाटप करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत ४७२१ जणांना ५१ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

ठळक मुद्देमुद्रा योजनेतून ५१.४१ कोटी दिले : राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेचा प्रतिसाद

मनोज ताजने ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : बेरोजगारांनी स्वयंरोजगार उभारण्यास प्राधान्य द्यावे यासाठी ‘मुद्रा’ योजनेअंतर्गत त्यांना कर्जवाटप करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत ४७२१ जणांना ५१ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात या योजनेतून कर्जवाटपाचे प्रमाण कमी असले तरी छोटे-छोटे व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या या जिल्ह्यात जास्त आहे. कोणीही हमीदार किंवा तारणशिवाय केवळ अर्जदाराची प्रामाणिकता तपासून केल्या जात असलेल्या या कर्जवाटपामुळे अनेक युवकांना दिलासा मिळाला आहे.२०१५-१६ या आर्थिक वर्षापासून या योजनेला सुरूवात झाली. पहिल्या वर्षी बँकांना दिलेले कर्जवाटपाचे लक्ष्य हे किमान लक्ष्य होते. पण बँकांनी ते कमाल लक्ष्य समजून मोजक्याच लोकांना कर्जवाटप केले. दुसºया वर्षी म्हणजे २०१६-१७ मध्ये तो गैरसमज दूर झाल्याने कर्जवाटपाचे प्रमाण वाढले. यावर्षीच्या (२०१७-१८) आर्थिक वर्षातील १० महिन्यात १३९७ जणांना २२ कोटी २२ लाख ४१ हजार रुपयांचे कर्जवाटप जानेवारी अखेरपर्यंत करण्यात आले. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हा आकडा आणखी वाढणार आहे.यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक ७ कोटी २१ लाख रुपयांचे कर्जवाटप बँक आॅफ महाराष्टÑने केले आहे. मात्र ते ६८ जणांनाच केले. बँक आॅफ इंडियाने ५ कोटी २१ लाख ६७ हजार रुपयांचे कर्जवाटप १२४ जणांना केले आहे. याशिवाय गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २ कोटी ६८ लाख १४ हजार रुपयांचे कर्जवापट ४२ जणांना केल्याचे दिसून येते.मुद्रा योजनेतून तीन टप्प्यात कर्जवाटप केले जाते. ५० हजारपर्यंत, ५ लाखापर्यंत किंवा १० लाखापर्यंत कर्ज घेता येते. त्यासाठी वेगवेगळ्या अटी आहेत. त्या कर्जावर ९ टक्क्यांपासून १२.५ टक्क्यांपर्यंत वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे व्याजदर लावले जातात.हातठेला, चहाटपरी, पानठेला यासारख्या छोट्या व्यावसायासाठी ‘शिशू’ या टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. ५० हजार ते ५ लाख पर्यंतच्या कर्जासाठी ‘किशोर’ या टप्प्यातून कर्ज दिले जाते. त्यासाठी संबंधिताला दुकानसारखा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वत:ची किंवा भाड्याची जागा, भाडेतत्वाचे करारपत्र आणि बँक बॅलन्सची शिट द्यावी लागते. तर त्यापेक्षा जास्त म्हणजे १० लाखापर्यंतच्या कर्जातून एखादे छोटे युनिट टाकून व्यवसाय उभारता येतो. पण त्यासाठी स्वत:ची जागा किंवा करारपत्रासोबतच प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागतो. त्यात केल्या जाणाºया व्यवसायाची इत्यंभूत माहिती आणि होणारा नफा याचीही माहिती द्यावी लागते.दुर्गम तालुक्यांमध्ये नागरिकच अनुत्सुकगडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम, आदिवासीबहुल तालुक्यातून या योजनेतून कर्ज घेण्यासाठी अतिशय कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यात भामरागड, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, मुलचेरा, धानोरा या तालुक्यांचा समावेश आहे. त्या भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थितीच जेमतेम असल्यामुळे कोणताही व्यवसाय करण्यासाठी त्या परिसरात फारसा वाव दिसून येत नाही. त्यांच्या तुलनेत गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, अहेरी आणि सिरोंचा तालुक्यात मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.खासगी बँकांनी घेतला आखडता हातराष्ट्रीयकृत आणि जिल्हा सहकारी बँकेकडून मुद्रा योजनेतून कर्जवाटप करण्यास चांगला प्रतिसाद दिला जात असला तरी अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय या खासगी बँकांनी मात्र या सरकारी योजनेला खो दिल्याचे दिसून येते. अ‍ॅक्सिस बँकेने योजना सुरू झाल्यापासून जानेवारी अखेरपर्यंत एकाही बेरोजगाराला मुद्रा योजनेअंतर्गत कर्जवाटप केलेले नाही. आयसीआयसीआय बँकेने केवळ एका अर्जदाराला २४ हजार रुपयांचे कर्ज दिले आहे.मुद्रा योजनेतून कर्जवाटप वाढत आहे. वास्तविक या योजनेतून कर्ज मिळण्यासाठी अर्ज करताना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता न करताच लोक अर्ज करतात. शिवाय हमीदार किंवा तारणशिवाय कर्ज मंजूर करताना अर्जदाराचा व्यवसाय करण्यामागील प्रामाणिक हेतूही तपासावा लागतो, त्यामुळे थोडा वेळ लागतो.- पी.एम.भोसले, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक गडचिरोली