शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
9
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
10
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
11
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
12
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
13
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
14
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
15
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
16
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
17
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
18
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
19
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
20
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

४३ शेततळे, ७९ बंधारे

By admin | Updated: September 16, 2014 01:56 IST

कृषी विभागाच्यावतीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात

दोन वर्षात : सिंचन सुविधा वाढविण्यास मदत, धान शेतीस उपयोगीगडचिरोली : कृषी विभागाच्यावतीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात एकूण ४३ शेततळे व ७९ सिमेंट काँक्रीट व मातीचे बंधारे बांधण्यात आले. या शेततळे व बंधाराच्या माध्यमातून शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. राज्य शासनाच्यावतीने जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत संपूर्ण राज्यभरात शेततळे व सिमेंट काँक्रीट तसेच मातीचे बंधारे बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून राबविल्या जात आहे. शेतालगतच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळी वाढ व्हावी. तसेच पाण्याच्या साठवणूक क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी राज्य शासनाने ही महत्वपूर्ण योजना अंमलात आणली. या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सन २०१२-१३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण तीन शेततळे बांधण्यात आले. तसेच २०१३-१४ मध्ये एकूण ४० शेततळे बांधण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सन २०१२-१३ मध्ये मातीचे १५ व सिमेंट काँक्रीटचे १८ बंधारे असे एकूण २३ बंधारे बांधण्यात आले. सन २०१३-१४ मध्ये या कार्यालयामार्फत मातीचे एकूण ५४ बंधारे बांधण्यात आले तर सिमेंट काँक्रीटचे दोन बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले. दोन्ही वर्षांचे मिळून एकूण ७९ बंधाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्यात कृषी विभागाला यश मिळाले आहे. १९८० च्या वनकायद्याच्या अडथळ्यामुळे जिल्ह्यातील मोठे व लघू सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. १९८० च्या वनकायद्यात शिथीलता आणून जिल्ह्यातील मोठे व लघू सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याबाबत शासनाने अद्यापही निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मोठे व लघूसिंचन प्रकल्प वनकायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कृषी विभागाच्यावतीने बांधण्यात आलेले शेततळे व सिमेंट काँक्रीट व मातीच्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जि.पं.च्या कृषी विभागामार्फतही जिल्ह्यात शेततळे व बंधारे बांधण्यात आले आहेत. एका बंधाऱ्याच्या माध्यमातून एक हेक्टर शेती क्षेत्रात सिंचन सुविधा पुरविता येते. एका शेततळ्यापासून दोन एकर क्षेत्रापर्यंत सिंचन व्यवस्थेची सुविधा होते. जिल्ह्यातील आणखी बरेच शेती क्षेत्र सिंचनाखाली येणे बाकी आहे. उर्वरित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेततळे व बंधारे निर्माण करावेत. (स्थानिक प्रतिनिधी)अनेक बंधाऱ्यांची दूरवस्थाप्रशासनाच्यावतीने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात मातीचे तसेच सिमेंट काँक्रीटकरणाचे बंधारे बांधण्यात आले. मात्र या बंधाऱ्यांच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यातील अनेक बंधाऱ्यांची सध्या दूरवस्था झाली आहे. अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत आहेत. अशा बंधाऱ्यांतून पावसाचे पाणी तत्काळ निघून जाते. तसेच जिल्ह्यातील काही बंधारे लिकेज आहेत. या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. निकृष्ठ बांधकाम साहित्यामुळे काही बंधाऱ्यांची दूरवस्था झाली आहे.