शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

४३ शेततळे, ७९ बंधारे

By admin | Updated: September 16, 2014 01:56 IST

कृषी विभागाच्यावतीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात

दोन वर्षात : सिंचन सुविधा वाढविण्यास मदत, धान शेतीस उपयोगीगडचिरोली : कृषी विभागाच्यावतीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात एकूण ४३ शेततळे व ७९ सिमेंट काँक्रीट व मातीचे बंधारे बांधण्यात आले. या शेततळे व बंधाराच्या माध्यमातून शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. राज्य शासनाच्यावतीने जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत संपूर्ण राज्यभरात शेततळे व सिमेंट काँक्रीट तसेच मातीचे बंधारे बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून राबविल्या जात आहे. शेतालगतच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळी वाढ व्हावी. तसेच पाण्याच्या साठवणूक क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी राज्य शासनाने ही महत्वपूर्ण योजना अंमलात आणली. या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सन २०१२-१३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण तीन शेततळे बांधण्यात आले. तसेच २०१३-१४ मध्ये एकूण ४० शेततळे बांधण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सन २०१२-१३ मध्ये मातीचे १५ व सिमेंट काँक्रीटचे १८ बंधारे असे एकूण २३ बंधारे बांधण्यात आले. सन २०१३-१४ मध्ये या कार्यालयामार्फत मातीचे एकूण ५४ बंधारे बांधण्यात आले तर सिमेंट काँक्रीटचे दोन बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले. दोन्ही वर्षांचे मिळून एकूण ७९ बंधाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्यात कृषी विभागाला यश मिळाले आहे. १९८० च्या वनकायद्याच्या अडथळ्यामुळे जिल्ह्यातील मोठे व लघू सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. १९८० च्या वनकायद्यात शिथीलता आणून जिल्ह्यातील मोठे व लघू सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याबाबत शासनाने अद्यापही निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मोठे व लघूसिंचन प्रकल्प वनकायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कृषी विभागाच्यावतीने बांधण्यात आलेले शेततळे व सिमेंट काँक्रीट व मातीच्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जि.पं.च्या कृषी विभागामार्फतही जिल्ह्यात शेततळे व बंधारे बांधण्यात आले आहेत. एका बंधाऱ्याच्या माध्यमातून एक हेक्टर शेती क्षेत्रात सिंचन सुविधा पुरविता येते. एका शेततळ्यापासून दोन एकर क्षेत्रापर्यंत सिंचन व्यवस्थेची सुविधा होते. जिल्ह्यातील आणखी बरेच शेती क्षेत्र सिंचनाखाली येणे बाकी आहे. उर्वरित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेततळे व बंधारे निर्माण करावेत. (स्थानिक प्रतिनिधी)अनेक बंधाऱ्यांची दूरवस्थाप्रशासनाच्यावतीने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात मातीचे तसेच सिमेंट काँक्रीटकरणाचे बंधारे बांधण्यात आले. मात्र या बंधाऱ्यांच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यातील अनेक बंधाऱ्यांची सध्या दूरवस्था झाली आहे. अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत आहेत. अशा बंधाऱ्यांतून पावसाचे पाणी तत्काळ निघून जाते. तसेच जिल्ह्यातील काही बंधारे लिकेज आहेत. या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. निकृष्ठ बांधकाम साहित्यामुळे काही बंधाऱ्यांची दूरवस्था झाली आहे.