शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

३० हजार क्विंटल बियाणे लागणार

By admin | Updated: May 17, 2015 02:09 IST

चालू खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून एवढ्या क्षेत्रासाठी २९ हजार ...

गडचिरोली : चालू खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून एवढ्या क्षेत्रासाठी २९ हजार ७११ क्विंटल बियाणे व ४९ हजार ८०० मेट्रिक टन रासायनिक खताची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने तयारी केली असून काही प्रमाणात बियाणे व रासायनिक खत उपलब्ध झाले आहे. खरीप हंगामात सर्वाधिक पिकांची लागवड केली जात असल्याने कृषी विभागाच्या मार्फतीने या हंगामासाठी विशेष तयारी केली जाते. शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते, किटक नाशके उपलब्ध होतील. याबाबतचे उन्हाळ्यातच नियोजन केले जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या गरजेचा व अज्ञानाचा गैरफायदा घेऊन खते व बियाणांचा काळा बाजार होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाते. चालू खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र धान पिकाचे असून सुमारे एक लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाणार आहे. तीन हजार ७३० हेक्टरवर सोयाबिन, सात हजार ९०० हेक्टरवर तूर, सात हजार ७०० हेक्टरवर कापूस, एक हजार २०० हेक्टरवर मका, ५३८ हेक्टरवर तिळाचे उत्पादन घेतले जाणार आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानंतर शेतकरी संकरित बियाणांचा वापर करू लागला आहे. शेतीच्या दृष्टीने बियाणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बियाणे वेळेवर व चांगल्या दर्जाचे उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बियाणे खराब निघाल्यास शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच संपूर्ण फसल मार खाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभागही बियाणांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्याला सुमारे २९ हजार ७११ क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये महाबिज १७ हजार ५४ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देणार आहे. तर खासगी कंपन्यांच्या मार्फतीने १२ हजार ६५७ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहेत. एक महिन्यानंतर प्रत्यक्ष पेरणीला सुरूवात होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते व बी-बियाणांची खरेदी सुरू केली आहे. जवळपास पाच हजार क्विंटल बियाणे कृषी केंद्र चालकांकडे उपलब्ध झाले आहेत. (नगर प्रतिनिधी) १३ भरारी पथकांची निर्मितीशेतकऱ्यांच्या अज्ञान व गरजेचा गैरफायदा घेऊन कधीकधी कृषी केंद्र चालक व व्यापाऱ्यांकडून बियाणे व खतांचा कुत्रिम तुटवडा निर्माण केला जातो व शेतकऱ्यांची लुबाडनुक केली जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे तालुकास्तरावर १२ व जिल्हास्तरावर एक पथकाची नेमणूक केली आहे. कृषी निवेष्ठांच्या तक्रारीचे वेळीच निराकरण करण्यासाठी १३ तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाची फार मोठी मदत होईल.घरचे बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनकृषी केंद्रातून खरेदी केलेले बियाणे महाग असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला ते खरेदी करणे शक्य होत नाही. परिणामी काही शेतकरी घरचे धान्य बियाणे म्हणून वापरतात. घरचे बियाणे वापरताना ते निरोगी व चांगले असावे, याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचण्यास मदत होणार आहे.