शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

शहर विकासासाठी २४३ कोटींची गरज

By admin | Updated: February 23, 2015 01:34 IST

शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करून शहराचा नियोजनबध्द विकास करण्यासाठी २४३.११ कोटी रूपयांच्या निधीची गरज असून ...

लोकमत विशेषगडचिरोली : शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करून शहराचा नियोजनबध्द विकास करण्यासाठी २४३.११ कोटी रूपयांच्या निधीची गरज असून सदर निधीची मागणी नगर परिषद प्रशासनाने संबंधित विभागांकडे केली आहे. त्यासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावाही करीत आहेत. सदर निधी प्राप्त झाल्यास शहराचे रूप पालटण्यास फार मोठी मदत होणार आहे. गडचिरोलीला जिल्हास्थळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यालये येऊ लागले. या कार्यालयांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी गडचिरोलीमध्ये राहू लागले. त्यांच्या गरजा पूर्ण करताना इतरांनाही रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने इतरही नागरिकांचे पाय गडचिरोलीच्या दिशेने वळायला लागले. त्यामुळे गडचिरोली शहराची लोकसंख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत चालली आहे. वाढलेल्या लोकसंख्येला जुन्या साधनांच्या मदतीने आवश्यक सोयीसुविधा पुरविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शहरात काही नवीन बांधकाम होणे गरजेचे आहे. गडचिरोली नगर परिषदेला ‘ब’ दर्जा आहे. त्यामुळे शासनाकडून या नगर परिषदेला अत्यंत मर्यादीत प्रमाणात निधी प्राप्त होतो. हा निधी शहरवासीयांना दैनंदिन सोयीसुविधा पुरविण्यातच खर्च होतो. त्यामुळे नवीन विशेष बांधकाम करणे शक्य होत नाही. त्यासाठी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी खेचून आणल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे संबंधित विभागांकडे नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र अजूनपर्यंत शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने विकास कामे करताना नगर परिषद प्रशासनाला फार मोठी कसरत करावी लागत आहे. गडचिरोली नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाण्याचा मुबलक पुरवठा वर्षभर होतो. पाण्याचा उपसा करण्यापासून ते शुध्दीकरण करण्यासाठी नगर परिषदेचे महिन्याला लाखो रूपये खर्च होतात. मात्र नागरिक नळांना तोट्या लावत नाही. यावर आवर घालण्यासाठी नळांना मिटर लावल्या जाणार आहेत. त्यासाठी निधीची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)५० किमी नाल्या व ६० किमी रस्त्यांची गरजशहरात १४१.४० किमीच्या नाल्या व १७०.५० किमींच्या रस्त्यांचे बांधकाम झाले आहे. वाढत्या लोकवस्तीसाठी आणखी ५० किमी नाल्या व ६० किमी रस्त्यांची गरज आहे. दोन बगिचे, ३० पैकी १३ ओपन स्पेसचा विकास, मोक्षधाम, तीन शॉपींग काम्प्लेक्स, आठवडी बाजाराचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे. २३ आरक्षित भूखंडांचा विकास, नगर भूमापन करणे, २२ किमीचे सर्विस रोड तयार करणे व ६ हजार नळांना वॉटर मिटर लावण्यासाठी निधीची गरज आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी दोन पाण्याच्या टाक्याचंी गरज आहे. भूयारी गटार योजना ही शहराचे रूप पालटण्यासाठी मदत करणारी महत्त्वकांक्षी योजना आहे.या योजनेसाठी राज्य व केंद्राकडून निधी प्राप्त होणार आहे. भूयारी गटारामुळे शहरात स्वच्छता राहण्यास फार मोठी मदत होणार आहे.