शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

शहर विकासासाठी २४३ कोटींची गरज

By admin | Updated: February 23, 2015 01:34 IST

शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करून शहराचा नियोजनबध्द विकास करण्यासाठी २४३.११ कोटी रूपयांच्या निधीची गरज असून ...

लोकमत विशेषगडचिरोली : शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करून शहराचा नियोजनबध्द विकास करण्यासाठी २४३.११ कोटी रूपयांच्या निधीची गरज असून सदर निधीची मागणी नगर परिषद प्रशासनाने संबंधित विभागांकडे केली आहे. त्यासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावाही करीत आहेत. सदर निधी प्राप्त झाल्यास शहराचे रूप पालटण्यास फार मोठी मदत होणार आहे. गडचिरोलीला जिल्हास्थळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यालये येऊ लागले. या कार्यालयांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी गडचिरोलीमध्ये राहू लागले. त्यांच्या गरजा पूर्ण करताना इतरांनाही रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने इतरही नागरिकांचे पाय गडचिरोलीच्या दिशेने वळायला लागले. त्यामुळे गडचिरोली शहराची लोकसंख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत चालली आहे. वाढलेल्या लोकसंख्येला जुन्या साधनांच्या मदतीने आवश्यक सोयीसुविधा पुरविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शहरात काही नवीन बांधकाम होणे गरजेचे आहे. गडचिरोली नगर परिषदेला ‘ब’ दर्जा आहे. त्यामुळे शासनाकडून या नगर परिषदेला अत्यंत मर्यादीत प्रमाणात निधी प्राप्त होतो. हा निधी शहरवासीयांना दैनंदिन सोयीसुविधा पुरविण्यातच खर्च होतो. त्यामुळे नवीन विशेष बांधकाम करणे शक्य होत नाही. त्यासाठी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी खेचून आणल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे संबंधित विभागांकडे नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र अजूनपर्यंत शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने विकास कामे करताना नगर परिषद प्रशासनाला फार मोठी कसरत करावी लागत आहे. गडचिरोली नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीची मागणी करून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. गडचिरोली शहराला वैनगंगा नदीतून पाण्याचा मुबलक पुरवठा वर्षभर होतो. पाण्याचा उपसा करण्यापासून ते शुध्दीकरण करण्यासाठी नगर परिषदेचे महिन्याला लाखो रूपये खर्च होतात. मात्र नागरिक नळांना तोट्या लावत नाही. यावर आवर घालण्यासाठी नळांना मिटर लावल्या जाणार आहेत. त्यासाठी निधीची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)५० किमी नाल्या व ६० किमी रस्त्यांची गरजशहरात १४१.४० किमीच्या नाल्या व १७०.५० किमींच्या रस्त्यांचे बांधकाम झाले आहे. वाढत्या लोकवस्तीसाठी आणखी ५० किमी नाल्या व ६० किमी रस्त्यांची गरज आहे. दोन बगिचे, ३० पैकी १३ ओपन स्पेसचा विकास, मोक्षधाम, तीन शॉपींग काम्प्लेक्स, आठवडी बाजाराचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे. २३ आरक्षित भूखंडांचा विकास, नगर भूमापन करणे, २२ किमीचे सर्विस रोड तयार करणे व ६ हजार नळांना वॉटर मिटर लावण्यासाठी निधीची गरज आहे. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी दोन पाण्याच्या टाक्याचंी गरज आहे. भूयारी गटार योजना ही शहराचे रूप पालटण्यासाठी मदत करणारी महत्त्वकांक्षी योजना आहे.या योजनेसाठी राज्य व केंद्राकडून निधी प्राप्त होणार आहे. भूयारी गटारामुळे शहरात स्वच्छता राहण्यास फार मोठी मदत होणार आहे.