शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

तुम्ही भाज्या फळं प्लॅस्टिकच्या पिशव्यात आणतात आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यातच ठेवता का? मग हे घातकच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 18:48 IST

भाज्या फळं प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवल्यानं आता भाज्या ताज्या आणि सुरक्षित राहतील असा आपला समज असतो तो साफ खोटाच. उलट प्लॅस्टिकच्या पिशव्यात ठेवलेल्या भाज्या फळं आरोग्याचा घात करतात.

ठळक मुद्दे* भाज्या आणि फळांना प्लॅस्टिकच्या पिशव्यात भरून ठेवल्यानं त्या ताज्या राहत नाही. उलट अशा पिशव्यांमुळे भाज्या आणि फळांना श्वास घ्यायला जागाच राहात नाही.* भाज्या आणि फळं ठेवताना खास रेफ्रिजरेटर बॅग्जचा वापर करत असला तरी प्रत्येकवेळी भाजी काढून पिशवी रिकामी केल्यानंतर ती व्यवस्थित धुवून घ्यावी.* भाज्या फळं साठवताना काय चुकीचं काय बरोबर याचा विचार केला तरच आपण घरी साठवतो त्या भाज्या फळं खाण्यास सुरक्षित राहू शकतात.

- माधुरी पेठकरप्लॅस्टिकच्या पिशव्या जणू जीवनावश्यक घटकच बनल्या आहेत असंच वापरतो आपण. दुकानातून वाणसामान आणण्यापासून ते भाजी बाजारातून भाज्या आणि फळं आणण्यापर्यंत आपण प्लॅस्टिक पिशव्याच वापरतो. बाजारात जाताना कापडी पिशवी घेवून जाण्यात अनेकांना अजूनही कमीपणाच वाटतो. इतकंच कशाला सोबत कापडी पिशवी असतानाही घरी भाज्या बिज्या ठेवायला बर्या  म्हणून दुकानदाराकडे, भाजीवाल्याकडे प्लॅस्टिकची पिशवीच मागितली जाते.वाण सामान, भाज्या -फळं प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणणं ठीक पण भाज्या फळं प्लॅस्टिकच्या पिशवीतच ठेवणं हे मात्र घातकच. भाज्या फळं प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवल्यानं आता भाज्या ताज्या आणि सुरक्षित राहतील असा आपला समज असतो तो साफ खोटाच. भाज्या फळं साठवताना काय चुकीचं काय बरोबर याचा विचार केला तरच आपण घरी साठवतो त्या भाज्या फळं खाण्यास सुरक्षित राहू शकतात.प्लॅस्टिकच्या पिशवीत भाज्या आणि फळं ठेवल्या तर त्या ताज्या राहतात असं नाही उलट अशा भाज्यांमध्ये शरीरास हानिकारक जीवाणू वाढतात. भाज्या आणि फळांना प्लॅस्टिकच्या पिशव्यात भरून ठेवल्यानं त्या ताज्या राहत नाही. उलट अशा पिशव्यांमुळे भाज्या आणि फळांना श्वास घ्यायला जागाच राहात नाही. प्लॅस्टिकची पिशवी ही काही नैसर्गिक गोष्ट नाही. उलट ती रसायनांपासून बनवली जाते. अशा पिशवीत फळं आणि भाज्या भरून ठेवल्यानं हे रसायनं भाज्या आणि फळांमध्ये शिरतात. प्लॅस्टिक पिशव्यांमधील हे रसायनं शरीरास अत्यंत घातक असतात. त्यांच्यामुळे पेशींचा मूळ आकार बदलतो, शरीरातील जनुकीय साखळी बिघडते, मुला-मुलींना लवकर तारूण येतं तसेच संप्रेरकांंमध्ये अर्थात हार्मोन्समध्ये घातक बदल होतात. म्हणून तज्ञ्ज्ञांच्या मते भाज्या आणि फळं साठवताना खाकी कागदी पिशव्यांचा किंवा उच्च प्रतीच्या पॉलिथीन पिशव्यांचा वापर करावा. पण प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळावा.भाज्या आणि फळं ठेवताना खास रेफ्रिजरेटर बॅग्जचा वापर करत असला तरी प्रत्येकवेळी भाजी काढून पिशवी रिकामी केल्यानंतर ती व्यवस्थित धुवून घ्यावी. ती पिशवी व्यवस्थित कोरडी करूनच त्यात नवीन भाजी भरावी. पिशवी स्वच्छ न करता एका मागोमाग भाज्या भरल्या तर पिशव्यांच्या आत जीवाणूंची वाढ होते आणि ती शरीरास हानिकार ठरते.

हे कराच!1) सफरचंद सारखी फळं आणल्यानंतर ती थेट प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा ती बाहेर थंड ठिकाणी मोकळी करून ठेवली तरी चालतात. अशा ठिकाणी ठेवलेली सफरचंद दोन आठवड्यांपर्यंत टिकू शकतात. त्यापेक्षा जास्त टिकवायची असतील तर फ्रीजमधील कार्डबोर्ड बॉक्समध्ये मोकळीच ठेवावीत.

2) स्ट्रॉबेरीजसारखं नाजूक फळ ओलसरपणापासून दूर राहायला हवं. ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलं तर ओलसरपणा आपोआप निर्माण होतो. आणि फळ खराब होतं. म्हणून स्ट्रॉबेरीज या कागदी पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवाव्यात.

3) टोमॅटो तर अनेकजण फ्रीजमध्येच ठेवतात. खरंतर टोमॅटो बाहेरच चांगले राहातात. जास्त पिकलेले टोमॅटो वेगळे करून तेवढे फक्त फ्रीजमध्ये ठेवावेत आणि लगेच वापरून संपवावेत.

4)बटाटे, लसूण, कांदा या गोष्टी तर कधीच प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवू नये. ते बाजारातून आणल्यानंतर लगेच मोकळेकरून बाहेर थंड आणि कोरड्या जागेत ठेवावेत.

5) हिरव्या भाज्या प्लॅस्टिकच्या पिशव्यात ठेवू नये. मेथी, कोथिंबीर सारख्या भाज्यांची जुडी सोडून ती निवडून ओलसर कपड्यात घट्ट गुंडाळून ठेवावी. हिरव्या भाज्या कोरड्या होवू नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवाव्यात पण प्लॅस्टिकच्या पिशवीत नाही. आणि त्या लगेच वापरून संपवाव्यात.