शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
3
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
4
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
5
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
6
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
7
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
8
Nashik Municipal Election 2026: एबी फॉर्म घोटाळा नाट्य; अखेर मुख्यमंत्री मैदानात; घोळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन
9
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
10
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
11
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
12
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
13
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
14
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
15
Mumbai Crime: डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
16
Nashik Municipal Election 2026: भाजप शहराध्यक्षांना नाराजीची गाजरे! सुनील केदार यांना घेराव, पक्ष कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न
17
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
18
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
19
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
20
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
Daily Top 2Weekly Top 5

भूक लागली की मुलांना बाहेरचा चटक मटक खाऊच देता का? मग हे घरच्या चवीचे पदार्थ करून खाऊ घालाच. मुलं पिझ्झा बर्गर नक्की विसरतील!

By admin | Updated: June 6, 2017 18:04 IST

बाहेर पिझ्झा बर्गर झटपट मिळतात पण आई-आजीनं केलेल्या पोटभरीच्या खाऊला मात्र कशाचीच सर नाही.

-सारिका पूरकर-गुजराथीहॉटेलिंग आता अंगवळणी पडलंय साऱ्यांच्याच. पण तरीही घरच्या चवीला आणि पदार्थांना पर्याय नाही हेच खरं. आज भूक लागली तर बाहेर पिझ्झा बर्गर झटपट मिळतात पण आई-आजीनं केलेल्या पोटभरीच्या खाऊला मात्र कशाचीच सर नाही. आज अनेक घरात हे पदार्थ केले जात नाहीत पण त्याच्या चवी आजही जीभेवर आहेत. मुलांनी खाऊ मागितला की दुकानातलाच खाऊ का आठवतो? आपल्या लहानपणी आपल्याला आई आजी जो खाऊ द्यायची तो आपल्या मुलांसाठीही करून बघा की. मुलांच्या भुकेचा प्रश्न सुटेल आणि महत्त्वाचं म्हणज घरी बनणारा हा पौष्टिक खाऊ मुलांचाही फेव्हरिट होइल. असं म्हणतात मुलांना सर्व प्रकारच्या चवींची ओळख करून द्यावी त्यातूनच मुलांची टेस्ट तयार होते. ‘आमच्या मुलांना काय बाहेरचंच आवडतं’असं त्यांच्या आवडीविषयी सांगण्याआधी आपण मुलांना घरचा खाऊ आवडीनं खाऊ घातलाय का? याचा विचार आधी करा. आणि नाही असं उत्तर आलं तर हा घरचा खाऊ नक्की करून बघा. तुमच्याप्रमाणेच तुमच्या मुलांचाही तो आॅलटाइम फेव्हरिट होईल हे नक्की!१) गुळपापडीगुळपापडी आठवते आणि आवडतेही पण खाऊन किती दिवस झाले ते कोणी सांगेल का? महिने की वर्ष? असो. गव्हाची कणिक, साजूक तूप आणि गुळ या अवघ्या तीन घटकांची ही करामत आहे. कोरडी गुळपापडीही असते. कणिक तूपावर भाजून त्याला गुळ चोळून ठेवायचा आंओ गार झाले की हपके मारायचे तोंडात. गुळाऐवजी साखरही घातली तरी चालते. गुळ आणि कणिक पौष्टिक असतातच. त्यापासून बनलेली गुळपापडी ही पौष्टिक तर असतेच शिवाय चविष्टही असते.

               

२) तुक्कडखीरतुम्हाला वाटले असेल की आता हा कोणता खिरीचा नवीन प्रकार? पण हा प्रकार गोड नाही तर तिखट खिरीचा आहे. पूर्वी काटकसरीचा संस्कार सगळ्यांवर असायचा. अन्नाची नासाडी तर खपवूनच घेतली जात नसत. त्यातूनच हा पदार्थ जन्मला असावा असं वाटतं. कारण हा पदार्थ शिळ्या पोळ्यांपासून बनतो. शिळ्या पोळ्या चाळणीत पसरवून हवेशीर ठेवल्या तर त्या कडक होतात. नंतर लसूण, कढीपत्ता, जिरे-मोहरी,हळद आणि हिंगाची खमंग फोडणी पाण्याला द्यायची. पाण्याला उकळी फुटली की त्यात कडक पोळीचे मोठे तुकडे घालायचे. गॅस बंद करुन मीठ, कोथिंबीर टाकली की झाली तुक्कडखीर तय्यार. या खिरीला पुन्हा उकळी आणायची नसते. नाहीतर पोळी मऊ होऊन लगदा होतो. पोळीचे तुकडे थोडे कडक राहायला हवे. पोळ्यांऐवजी शिळ्या पण थोड्या कडक झालेल्या पुऱ्याही चालतात. चव अगदी भन्नाट. हा देखील पोटभरीचाच पदार्थ बरं का !

 

             ३) उबजे पूर्वी अनेकांकडे गणेशोत्सवात हा पदार्थ हमखास व्हायच. तांदळाच्या कण्या, हरभरा डाळ, आवडत असल्यास थोडी मूगडाळ, शेंगदाणे भिजत घालून ते उपसून घ्यायचं. नंतर खमंग फोडणीवर सर्व परतून वाफेवर कण्या शिजवायच्या. . कणी मोकळी राहायला हवी. त्याचा भात होता कामा नये या बेतानं ती शिजवायची. वरतून ओलं खोबरं, कोथिंबीर पेरुन अन लिंबू पिळून खायचं. हा पदार्थ एकदा खाल्ला की समाधान होत नाही. परत परत हवासा वाटतो.४) गोड शेंगदाणे शरीरात जेव्हा रक्ताची कमतरता निर्माण होते म्हणजेच जेव्हा अ‍ॅनिमिया होतो तेव्हा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गुळ-शेंगदाण्याचा लाडू खायला सांगितलं जातं. याला गोड शेंगदाणे हाही चांगला पर्याय आहे. गुळाच्या किंवा साखरेच्या पाकातील हे शेंगदाणे खूप मस्त लागतात.

 

  ५) रस-शेवयायासाठी बारीक शेवया घ्यायच्या. त्या उकळलेल्या पाण्यात घालून लगेचच चाळणीत निथळत ठेवायच्या. शेवया पूर्ण निथळल्या की या उकडलेल्या शेवया डिशमध्ये घालायच्या आणि त्यावर आंब्याचा घट्ट रस आणिन साजूक तूपाची धार धरायची. ६) आंबा पोळी आंब्याचा रस एका ताटात पसरवून ते ताट कडक उन्हात ठेवायचं. ते वाळलं की आंबा पोळी तयार.