व्यसनामुळे मराठी अभिनेत्रीचं झालं ब्रेकअप, काही वर्षांनी परदेशी बॉयफ्रेंडसोबत केलं गुपचूप लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 01:48 PM2023-09-18T13:48:35+5:302023-09-18T14:03:39+5:30

'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य काय चर्चेत राहिलं

मराठी अभिनेत्री नारायणी शास्त्री (Narayani Shastri) आठवतेय का? नाना पाटकेरांच्या पक पक पकाकमध्ये तिने साकारलेली साळू सर्वांनाच भावली. २३ वर्षांपूर्वीच तिने 'कहानी सात फेरो की' या मालिकेतून करिअरला सुरुवात केली होती.

नारायणी मराठीपेक्षा हिंदी विश्वातच जास्त दिसली. तसंच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती कायम चर्चेत राहिली. २०१५ मध्ये तिने परदेशी बॉयफ्रेंड स्टीवनसोबत लग्न करत सर्वांना धक्का दिला होता.

स्टीव्हनसोबत गुपचूप लग्न केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी तिने याबाबत खुलासा केला. मी माझं लग्न जगजाहीर करु इच्छित नव्हते. माझं प्रेम होतं आणि मी लग्न केलं.मी खूप खूश आहे. स्टीव्हन लंडनचा आहे मात्र गेल्या १४ वर्षांपासून तो मुंबईतच राहत आहे.

नारायण शास्त्रीचं खरी चर्चेत आली ते अभिनेता गौरव चोप्रासोबतच्या (Gaurav Chopra)अफेअरमुळे. दोघांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे. 'पिया का घर','घर की लक्ष्मी बेटिया' या मालिकांचा त्यात समावेष आहे. इतकंच नाही तर दोघंही नच बलिए सिझन २ चा भाग होते.

या दोघांचं नातं जितकं चर्चेत होतं तितकंच त्यांच्या ब्रेकअपचीही चर्चा झाली. रिपोर्ट्सनुसार नारायणीचं धुम्रपानाचं व्यसन त्यांच्या ब्रेकअपला कारणीभूत ठरलं. नच बलिएच्या सेटवरही तिला स्मोकिंग करताना पाहिलं गेलं होतं.

नारायणीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नारायणीची भेट स्टीव्हनशी झाली. २०१५ साली ते लग्नबंधनात अडकले. तर गौरव चोप्राने गर्लफ्रेंड हितिशासोबत 2018 साली लग्नगाठ बांधली.

नारायणी अनेक मालिकांमध्ये दिसली आहे. 'क्योकी सांस भी कभी बहू थी','कुसूम','ममता','फिर सुबह होगी','पिया रंगरेज,'रिश्तो का चक्रव्यूह','लाल इश्क' अशा अनेक मालिकांचा समावेश आहे.

सिनेमात काम करण्यापेक्षा मी टीव्हीचीच क्वीन बनून राहील. कारण सिनेमात काम करुन शेवटी एडिटिंगमध्ये आपली किती भूमिका राहते हा प्रश्नच आहे. म्हणूनच मी सिनेमा करणं टाळते असं नारायणी म्हणाली होती.