मानसी नाईक ते सत्या मांजरेकर 'या' मराठी कलाकारांना केलं गेलं अचानक रिप्लेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 01:24 PM2023-04-05T13:24:24+5:302023-04-05T20:22:03+5:30

एखादा चित्रपट किंवा मालिका मिळवण्यासाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यातून काही रातोरात स्टार बनतात पण काहींचं स्वप्न थोडक्यात हुलकावणी देते. असे काही कलाकार आहेत ज्यांना मालिका आणि चित्रपट सुरू असतानाच काढून टाकण्यात आलं होतं. अनेकदा त्यांच्या वागणुकीमुळे किंवा त्यांच्या काही वैयक्तिक कारणांमुळे.

सत्या मांजरेकर: प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्याच लेक सत्या मांजरेकरला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवलाय. पण त्याचं कारणही तितकच महत्त्वाचं आहे. सत्या वेडात मराठे वीर दौडले सात या महेश मांजरेकर यांच्या बिग बजेट चित्रपटात झळकणार होता. सिनेमाच कास्टिंग झालं. पोस्टर आलं. कलाकारांची घोषणा झाली. मात्र त्यानंतर सत्या ला प्रेक्षकांनी सपशेल नाकारलं. तो सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला. आणि त्यानंतर महेश मांजरेकर यांनी सत्याला चित्रपटात न घेण्याचा निर्णय घेतला. पण हे असं घडण्याची काही पहिलीच वेळ नाही. बऱ्याच कलाकारांना अशाप्रकारे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

किरण माने: बिग बॉस फेम अभिनेता किरण मानेला मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. आणि या नंतर मालिकेचे निर्माते, कलाकार आणि किरण माने यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं होतं. सेटवर कलाकारांशी गैर वर्तणूक केल्यामुळे किरण माने मालिकेतून काढलं असल्याचं प्रोडक्शन टीम कडून सांगण्यात आलं होतं.

प्राजक्ता गायकवाड : किरण माने प्रमाणेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला आई माझी काळूबाई या मालिकेतून अर्ध्यातच काढण्यात टाक आलं होतं. पण आपणच स्वतःहून मालिका सोडली असल्याचं प्राजक्ता ने दावा केला होता. मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेता अलका कुबल यांनी प्राजक्तावर अनेक गंभीर आरोप केले होते. शूटिंगला वेळेवर न येणं. दांड्या मारण. शूटिंग सोडून इतर कार्यक्रमांना हजेरी लावणे. अशा प्रकारांमुळे तिला मालिकेतून काढण्यात आलं होतं.

मानसी नाईक :अभिनेत्री मानसी नाईकने काही महि्यांपूर्वीच केलेल्या एका दाव्यामुळे बरीच चर्चा झाली होती. मागच्या वर्षी आलेला चंद्रमुखी हा चित्रपट हिट ठरला होता. तर अभिनेत्री अमृता खानविलकरने यात मुख्य भूमिका साकारली होती. पण या चित्रपट सर्वात आधी मला घेतल होत असं मानसीने काही मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर तिला काढून टाकलं गेलं आणि अमृताची एन्ट्री झाली. असा दावा मानसीने केला होता. पण दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी हे सगळे दावे फेटाळले होते.

ऋतुजा बागवे :अभिनेत्री ऋतुजा बागवेला आजपर्यंत आपण बऱ्याच मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये पाहिले आहे. पण तिची पहिली मालिका होती या गोजिरवाण्या घरात. हे कदाचितच अनेकांना माहीत असेल. या मालिकेच्या काही भागाचं शूटिंग झाल्यानंतर अचानक तिला मालिकेतून काढण्यात आलं. दिसायला सुंदर नसल्याचं कारण देत तिला काढून टाकण्यात आलं होतं.

शिल्पा शिंदे :अंगुरी भाभी फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेला 'भाभीजी घर पर है'.... मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली होती. मात्र शिल्पाला मध्येच मालिकेतून काढण्यात टाकण्यात आलं. लोकप्रियता मिळाल्यानंतर शिल्पाने जास्त मानधनाची मागणी केली होती. ज्याला निर्मात्यांनी नकार दिला. त्यानंतर शिल्पा आणि निर्मात्यामध्ये वादाची ठिणगी पडली आणि शिल्पाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.