नशीबाने थट्टा कशी माडंली ! जेव्हा हनीमुनच्या रात्री पतीनेच केला होता 'या' अभिनेत्रीचा सौदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 02:23 PM2020-07-22T14:23:56+5:302020-07-22T14:38:05+5:30

करिश्मा कपूरच्या घटस्फोटाची केस सुरू असताना संजयनं तिच्यावर केवळ पैशाच्या हव्यासापोटी लग्न केल्याचा आरोप केला होता

अभिषेकच्या आयुष्यात आलेली पहिली तरुणी ही करिश्मा कपूर होती. करिश्मा-अभिषेक बालपणापासून एकमेकांना ओळखत होते.

अभिषेकला 'रेफ्यूजी' हा पहिला सिनेमा मिळाला. या सिनेमात त्याच्या अपोझिट करिश्माची धाकटी बहीण करीना कपूर होती.

असे म्हटले जाते, की करीना सेटवर अभिषेकला भावोजी म्हणून हाक मारायची. करिश्मा नेहमी अभिषेकला भेटायला सेटवर यायची. अभिषेकचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला, मात्र दोघांचे प्रेम फुलतच गेले.

अमिताभ यांनी त्यांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेक-करिश्माच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्वांना अभिषेक-करिश्माच्या प्रेमाविषयी समजले.

अभिषेकसोबत लग्नानंतर करिश्माने सिनेसृष्टीत काम करु नये, अशी जया बच्चन यांनी तिला अट घातल्याचे वृत्त लगेचच आले. ही अट करिश्माची आई बबिता यांना मात्र मान्य नव्हती.

बबिता यांना जावाई म्हणून अभिषेक पसंत नव्हता. त्याकाळी अभिषेकचे अनेक सिनेमे फ्लॉप होत होते. तर करिश्मा आघाडीची अभिनेत्री होती.

बबीता यांना भिती वाटायची, की अभिषेक कधीच यशस्वी अभिनेता होऊ शकला नाही तर... अखेर करिश्मा आई पुढे झुकली आणि तिने स्वत: हे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला.

2003 मध्ये या करिश्माचं लग्न बिझनेसमन संजय कपूरशी मोठ्या थाटामाटात झालं. मात्र लग्नाच्या अवघ्या 7 वर्षांतच या दोघांचा घटस्फोट झाला. 2010 ला करिश्मा आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून आली.

करिश्मानं संजयच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या तसेच तिला मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला. करिश्मानं त्याच्यावर हनीमूनच्या रात्रीच त्यानं माझा सौदा केला होता असा आरोप केला होता.

इतकेच नाही तर संजयनं त्याच्या भावाला करिश्मावर लक्ष ठेवायला सांगितल्याचे तिने सांगितले होते.

Read in English