Allu Arjun Birthday: स्रेहावर पहिल्याच नजरेत भाळला होता अल्लू अर्जुन...पण ‘लव्हस्टोरी’त अचानक आला होता ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:04 PM2022-04-08T12:04:15+5:302022-04-08T12:16:23+5:30

Allu Arjun Birthday: या अल्लूची पर्सनल लाईफची बरीच फिल्मी आहे. होय, अल्लूवर अख्खं जग फिदा आहे आणि अल्लू मात्र पत्नी स्रेहावर लट्टू आहे.

‘पुष्पा’ या सिनेमानंतर सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा आज वाढदिवस. आज अल्लू त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करतोय.

या अल्लूची पर्सनल लाईफची बरीच फिल्मी आहे. होय, अल्लूवर अख्खं जग फिदा आहे आणि अल्लू मात्र पत्नी स्रेहावर लट्टू आहे. अल्लू व स्नेहाचं लव्हमॅरेज.

अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डीची लव्हस्टोरीसुद्धा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. म्हणायला एवढा मोठा सुपरस्टार. पण या सुपरस्टारला सुद्धा लग्नाची परवानगी मिळवण्यासाठी स्नेहाच्या वडिलांची बरीच समजूत काढावी लागली होती.

एका मित्राच्या लग्नात अल्लूने स्रेहाला पहिल्यांदा पाहिलं होतं. तिला पाहिलं आणि अल्लू तिच्या प्रेमात पडला. स्रेहा सुद्धा अल्लूवर पहिल्याच नजरेत भाळली. इथूनच अल्लू व स्रेहाची लव्हस्टोरी सुरू झाली.

मित्रांच्या लग्नातच दोघांनी एकमेकांचे फोननंबर घेतले. मग फोनवर तासन् तास बोलणं सुरू झालं. त्यावेळी अल्लू मोठा स्टार होता आणि स्रेहा मास्टर्स पूर्ण करून नुकतीच परदेशातून भारतात परतली होती.

अर्जुनचं नाव तेलगू चित्रपटांत गाजत होतं. त्याच्याकडे पैसा होता, नाव होतं. ग्लॅमर होतं. स्रेहाचा मात्र चित्रपटसृष्टीशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. तिचे वडील हैदराबादचे एक मोठे बिझनेसमॅन होते.

काही महिने एकमेकांना डेट केल्यावर अल्लू व स्रेहानं लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्नाबद्दल घरी सांगितलं. अल्लूच्या घरच्यांनी लगेच परवानगी दिली. मात्र स्नेहाच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला.

अल्लू अर्जुन आणि त्याचे वडील स्नेहाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले होते. पण स्नेहाच्या वडिलांनी त्यांचा प्रस्तावाला नकार दिला. आता लव्हस्टोरी एका वेगळ्या वळणावर आली होती. पण अल्लू अर्जुन आणि स्नेहा दोघांनाही एकमेकांशिवाय राहावत नव्हतं. दोघांनीही हार न मानता स्नेहाच्या वडीलांची या लग्नासाठी परवानगी मिळवलीच.

घरातल्यांनी होकार दिल्यानंतर दोघांनी थाटामाटात लग्न केलं. अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांचा विवाह 6 मार्च 2011 रोजी झाला होता. आज ते त्यांच्या संसारात अत्यंत सुखी असून त्यांना आर्यन आणि अरहा अशी दोन मुलं आहेत.

अल्लू अर्जुन हा प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक अल्लू अरविंद यांचा मुलगा आहे आणि प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांचा भाचा आहे. 8 एप्रिल 1983 रोजी जन्मलेल्या अल्लू अर्जुननं 2003 मध्ये गंगोत्री चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.