Malaika Arora: 'खान' आडनावं काढल्यानंतर आयुष्य किती बदललं? मलायका अरोरा म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 02:35 PM2023-03-19T14:35:50+5:302023-03-19T14:41:24+5:30

Malaika Arora: कधी सोशल मीडियावरच्या बोल्ड फोटोंमुळे, कधी बोल्ड कपड्यामुळे तर कधी तिच्या चालण्यामुळे मलायकाला ट्रोल केलं जातं. पण बिनधास्त मलायका आपल्या अटींवर जगते...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सतत चर्चेत असते. अर्जुन कपूरला डेट करणारी मलायका अनेकदा ट्रोल होते. पण लोकांची पर्वा करेल ती मलायका कुठली

कधी सोशल मीडियावरच्या बोल्ड फोटोंमुळे, कधी बोल्ड कपड्यामुळे तर कधी तिच्या चालण्यामुळे मलायकाला ट्रोल केलं जातं. पण बिनधास्त मलायका आपल्या अटींवर जगते.

मलायका अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरमध्ये गुंतली. खरं तर पर्सनल लाईफबद्दल ती कधीच बोलत नाही. पण अलीकडे एका इव्हेंटमध्ये ती मनमोकळी बोलली.

खान कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर तिचे आयुष्य कसं बदललं, हे तिने सांगितलं. तिच्या यशाचे श्रेय खान कुटुंबाला दिलं जात आहे, यावर काय बोलशील, असं इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये तिला विचारण्यात आलं.

यावर ती म्हणाली, घटस्फोटांचा निर्णय अरबाज व माझा आम्हा दोघांचा होता त्यामुळे फारसा गोंधळ झाला नाही. सर्व काही शांततेत झालं. खान या आडनावाने मला माझ्या आयुष्यात खूप मदत केली आहे, हे खरं आहे. पण माझ्या नावामागे एखादं प्रसिद्ध आडनाव आहे, केवळ आडनावासह मी जगू शकेन असं मला वाटत नाही.

खान आडनावाने माझ्यासाठी बरेच दरवाजे उघडले पण मला वाटतं की शेवटी मला माझ्या खान आडनावाशिवायही खूप काही करावं लागणार होत. इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी मला कठोर महेनत करावी लागली. स्वत:ला सिद्ध करावं लागलं. ते आडनाव असताना आणि नसताना दोन्ही प्रसंगात मी काम करत होते, असं ती म्हणाली.

खान आडनावाचा त्याग करून तू खूप मोठी चूक करते आहेस, असं सांगणारे माझ्या आयुष्यात अनेकजण होते. तुला आडनावाचं महत्त्व माहीत नाही, असं लोक म्हणायचे. मला खान कुटुंबाबद्दल खूप आदर आहे, त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, असं तिने सांगितलं.

पुढे ती म्हणाली, मला एक मुलगा आहे आणि मी खान कुटुंबाचा एक भाग आहे, पण फक्त मला माझ्यासाठी माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज होती आणि हे फक्त आडनावापुरतं नव्हतं. मी आयुष्यात काहीही करू शकते, हे मला सिद्ध करायचं होतं.

अर्जुन कपूरसोबतच्या नात्याबद्दलही ती बोलली. ती म्हणाली, अर्जुन कपूरने माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. माझ्या आयुष्यात प्रेम आणलं. रिलेशनशिपमध्ये असूनही तुम्ही आनंदी नसाल तर त्या नात्यात अर्थ नाही.

अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाबद्दल ती म्हणाली, सध्या तरी मी रिलेशनशिप फेज एन्जॉय करतेय. लग्नाबद्दल मी काहीही बोलू इच्छित नाही. सध्या तरी मी प्री हनिमून पीरियड एन्जाॅय करतेय.