तब्बल १५ वर्षांनंतर 'राजनीति'चा सीक्वल येणार? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 11:19 IST2025-06-05T11:11:11+5:302025-06-05T11:19:30+5:30
'राजनीति' चित्रपटाचा सीक्वल येणार; कोण साकारणार मुख्य भूमिका?

तब्बल १५ वर्षांनंतर 'राजनीति'चा सीक्वल येणार? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट, म्हणाले...
Raajneeti Sequal: प्रकाश झा दिग्दर्शित 'राजनीति' हा चित्रपट २०१० मध्ये सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल, रणबीर कपूर(Ranbir Kapoor), मनोज वाजपेयी, कतरिना कैफ (Katrina Kaif) यांसारखी स्टारकास्ट पाहायला मिळाली. हा चित्रपट अजूनही सर्वोत्तम राजकीय थ्रिलर चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १५ वर्षे उलटली आहेत, पण अजूनही हा सिनेमा लोकांच्या आठवणीत आहे. दरम्यान, अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी राजनितिच्या सीक्वलबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
'राजनीति' हा दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा आत्तापर्यंतचा सगळ्यात हिट चित्रपट समजला जातो. हा मल्टी-स्टारर चित्रपट ४ जून २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. आता लवकरच या चित्रपटाच्या सीक्वल येणार असल्याचे संकेत दिग्दर्शक प्रकाश झा यांनी दिले आहेत. अलिकडेच 'हिंदुस्तान टाईम्स'शी बोलताना ते म्हणाले, "राजनीतिचा प्रवास सुरुच होता. त्यामुळे यापूर्वीच 'राजनीतिचा-२' बद्दल योजना आखली होती. दरम्यान, कास्टिंग आणि शूटिंगच्या बाबतीत अद्याप काहीही ठोस असं सांगता येणार नाही. परंतु, सध्या याच्या स्क्रिप्टवर काम चालू आहे." असं म्हणत प्रकाश झा यांनी चित्रपटाच्या सीक्वलची हिंट दिली आहे.
'राजनीति'चा चित्रपटाचा प्रवास कसा होता?
याबद्दल सांगताना पुढे ते म्हणाले, "या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनची प्रोसेस जवळपास एक वर्ष चालली. आम्ही एका गर्दीच्या सीनसाठी जवळपास, ८००० लोकांना एकत्र आणणं, जे आमच्यासाठी खूप कठीण होतं. कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर आम्ही ज्यांना संपर्क केला त्या प्रत्येकाला या चित्रपटाचं कथानक आवडलं." असा म्हणत प्रकाश झा यांनी चित्रपटाच्या शूटिंगच्या आठवणी ताज्या केल्या.