शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आपण अजून अपरिपक्वच

By admin | Updated: April 17, 2015 23:44 IST

देशाच्या पंतप्रधानपदावर असलेल्या जबाबदार नेत्याने विदेशात जाऊन स्वदेशी राजकारणाची बदनामी करणारी भाषणे द्यावी काय, हा प्रश्न कायद्याचा नसला तरी आंतरराष्ट्रीय संकेतांचा आहे.

देशाच्या पंतप्रधानपदावर असलेल्या जबाबदार नेत्याने विदेशात जाऊन स्वदेशी राजकारणाची बदनामी करणारी भाषणे द्यावी काय, हा प्रश्न कायद्याचा नसला तरी आंतरराष्ट्रीय संकेतांचा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, इंग्लंडचे पंतप्रधान कॅमेरून किंवा जर्मनीच्या चॅन्सेलर (पंतप्रधान) अँजेला मेर्केल या नेत्यांनाही त्यांच्या देशातील विरोधी राजकारणाला तोंड द्यावे लागले आहे. आपल्या राजकीय विरोधकांना पराभूत करूनच त्यांनी त्यांची सत्तास्थाने मिळविली आहेत. मात्र एकवार सत्तास्थान मिळविले की ते मिळविणारा नेता त्याच्या पक्षाचाच केवळ उरत नाही. तो साऱ्या देशाचा नेता होतो. देशांतर्गत राजकारणात बोलताना तो पक्षीय राहू शकत असला तरी परदेशात गेल्यानंतर त्याला आपली प्रतिमा राष्ट्रीयच राखावी लागते. आपल्या देशाचे एकात्म राजकीय स्वरूपच त्याला जगासमोर उभे करावे लागते. भारतात आलेल्या ओबामांनी त्यांच्या येथील भाषणात त्यांच्या विरोधी पक्षांविषयी किंवा त्यांच्या जुन्या सरकारांविषयी कधी टीकेचे उद््गार काढले नाहीत. कॅमेरून, मेर्केल किंवा फ्रान्सचे होलेंडेही त्यांच्या स्वदेशी विरोधकांविषयी विदेशात कधी अपशब्द काढत नाहीत. फार कशाला आपल्या यापूर्वीच्या पंतप्रधानांनीही तसे केल्याचे कधी दिसले नाही. कारण उघड आहे. लोकशाहीत सरकारे बदलतात. आजचे सत्ताधारी उद्याचे विरोधक होतात आणि कालचे विरोधक आज सत्ताधारी होऊ शकतात. देश व देशाचे हित या गोष्टी मात्र कायम राहतात. त्याचमुळे विदेशातील व्यासपीठांवरदेखील आपल्या स्वदेशी विरोधकांविषयी आदराने बोलणे समंजस नेत्यांकडून अपेक्षित असते. चर्चिल आणि अ‍ॅटली हे दोन ब्रिटिश नेते देशात असताना परस्परांवर टोकाची टीका करीत. मात्र परदेशात गेल्यानंतर ते एकमेकांविषयी अतिशय आदराने व कौतुकानेच बोलताना दिसत. या स्थितीत फ्रान्स, जर्मनी व कॅनडात नरेंद्र मोदींनी केलेली भाषणे तपासून पाहण्याजोगी आहेत. ‘पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी घाण करून ठेवली. आम्ही ती साफ करीत आहोत. स्कॅम इंडिया ही देशाची प्रतिमा बदलून ती स्कील इंडिया बनवीत आहोत’ असे वक्तव्य मोदी यांनी त्यांच्या विदेशदौऱ्यात जाहीरपणे केले आहे. मोदींच्या सरकारपूर्वी भारतावर काँग्रेसच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारचे राज्य होते. त्याआधी त्यावर भाजपाच्या अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार अधिकारारूढ होते. पं. नेहरुंपासून आतापर्यंत १४ पंतप्रधानांनी देशाच्या राजकारणाची धुरा वाहिली. त्याचे आर्थिक आणि औद्योगिकच नव्हे तर आण्विक क्षेत्रातील महत्त्व वाढविले. मोदींचे म्हणणे खरे मानले तर त्या साऱ्यांनी देशात नुसती घाणच करून ठेवली आणि एकट्या मोदींवर ती साफ करण्याचे उत्तरदायित्व आज येऊन पडले. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर याच मोदींनी त्यांच्या सर्व पूर्वसुरींनी केलेल्या चांगल्या कामाचा यथोचित गौरव केला होता, हे येथे आठवायचे. मोदींचे सरकार देशात सत्तारूढ झाले तेव्हा सारा देश नवा झाला नाही. तो पूर्वी होता आणि विकसितही होत होता. मोदींच्या नंतरही तो राहील आणि विकसितच होत राहील. मात्र याचे भान न राखणारे पुढारी ‘बाकी सारे वाईट आणि मीच एकटा काय तो चांगला’ असे सांगत फिरतात. दु:ख याचे की ते हे विदेशी व्यासपीठांवर आणि विदेशी नेत्यांच्या उपस्थितीत बोलतात. असे बोलणाऱ्या नेत्यांची किंमत ऐकणारे ओळखतात आणि त्याच वेळी ते त्याच्या कुवतीची परीक्षाही करीत असतात. असली वक्तव्ये करून नरेंद्र मोदींनी भारताची एकात्मता जगासमोर मांडली की त्याच्यातील राजकीय दुहीचे चित्र जगासमोर उभे केले? मोदी हे भाजपाचे पंतप्रधान आहेत की भारताचे? पक्षाचा अभिनिवेश आणि वेश कुठे मिरवावा आणि कुठे टाकावा याविषयीचे भान त्यांच्यासारख्या उच्चपदस्थाने राखायचे नाही तर कोणी राखायचे? इंग्लंड, अमेरिका, कॅनडा किंवा फ्रान्स यासारख्या देशाच्या एखाद्या नेत्याने विदेशात जाऊन आपल्या स्वदेशी विरोधकांची अशी निंदा केली असती तर त्या देशातील प्रसिद्धीमाध्यमांनी आणि जनतेनेही त्यांना असभ्य ठरवून त्यांची निर्भर्त्सना केली असती. मोदींचे सुदैव हे की त्यांच्या भोवतीच्या व्यवस्थेने त्यांना विदेशी पत्रकारांपासून दूर ठेवण्याची काळजी घेतली. अन्यथा त्यांना त्यांच्या या संकेतभंगाविषयीची विचारणा तेथेच झाली असती. पुढे जाऊन तुमच्या पक्षाच्या सत्ताकाळात तुमच्या देशातील अल्पसंख्य स्वत:ला सुरक्षित समजतात काय, असा अडचणीचा प्रश्नही त्यांना विचारला असता. देशात उभ्या केल्या जाणाऱ्या धार्मिक दुभंगाविषयीही त्यांनी मोदींची उलटतपासणी केली असती. प्रश्न एकट्या नरेंद्र मोदींचा नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे विदेशातील बड्या नेत्यांतच नव्हे तर सामान्य जनतेत निर्माण होणाऱ्या भारताच्या राजकीय प्रतिमेचा आहे. अशी वक्तव्ये करणारे नेतृत्व आपल्यासोबतच आपल्या देशाच्या राजकारणाच्या अपरिपक्वतेचीच जाहिरात करीत असते. अशा नेत्यांना आवरणारे कुणी नसणे आणि आपल्या व्याख्यानपटुत्वावर त्यांचे प्रसन्न असणे हीच अशावेळी चिंतेची बाब होते. मोदींच्या या वक्तव्याची भारतीय माध्यमांनीही घ्यावी तशी दखल घेतलेली न दिसणे ही त्यांच्याही दुबळेपणाची व अपरिक्वतेची साक्ष ठरणारी बाब आहे.