शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शब्द आणि भाव

By admin | Updated: April 18, 2017 01:16 IST

प्राचीन काळापासून भारतीय विचारवंतांनी शब्द आणि भाव या दोन्हीतले साम्य बऱ्याच अंशी सखोल असल्याचे सांगितलेले आहे. हे दोन्ही परस्परांना लक्षणीय गांभीर्याने प्रभावित करतात

डॉ. भूषणकुमार उपाध्यायप्राचीन काळापासून भारतीय विचारवंतांनी शब्द आणि भाव या दोन्हीतले साम्य बऱ्याच अंशी सखोल असल्याचे सांगितलेले आहे. हे दोन्ही परस्परांना लक्षणीय गांभीर्याने प्रभावित करतात. सामान्यत: ‘शब्द’ असा ध्वनी आहे की जो लहरींच्या स्वरूपात आमच्या कर्णकमलाद्वारे मेंदूत प्रवेश करतो व त्यांच्या संबंधित भागांना प्रेरित करतो. जेव्हा शब्द लिखित स्वरूपात असतात, तेव्हा ते आमच्या दृष्टीद्वारे मेंदूपर्यंत पोहचतात. दृष्टिदोष असलेली व्यक्ती आपल्या स्पर्शाच्या माध्यमातून शब्द समजतो व त्याद्वारे त्याचा मेंदू काम करतो. परामानसशास्त्रात ‘टेलीपॅथी’ ही अशी एक पद्धत सांगितलेली आहे की, ज्यात दोन मेंदू कोणत्याही भौतिक साधनांशिवाय परस्परांशी संवाद साधतात. प्रत्येक शब्दाचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. तो गुणधर्म वेगवेगळ्या संवेदनासोबत मेंदूत प्रवेश करून त्याचा प्रभाव निर्माण करतो. मेंदूच्या मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आमचा मेंदू डावा गोलार्थ व उजवा गोलार्थ या दोन भागात विभागला गेलेला आहे. डावा गोलार्थ तर्क आणि गणिती कामांना संपादित करतो, तर उजवा गोलार्थ तत्त्वज्ञान, कल्पना व कवित्व या संबंधातील कामांशी संबंधित आहे. माणसाचे जीवन तर्क व काव्य यांनी बनलेले आहे. या दोघांचे संतुलन व ताळमेळ आम्हाला चांगले विचार प्रदान करतात. जाणकारांच्या म्हणण्यानुसार आपल्या मेंदूत कोट्यवधी पेशी असून, त्या आपला वेगवेगळा प्रभाव निर्माण करतात. ज्याप्रमाणे क्रोध या अवस्थेत एका विशिष्ट प्रकारच्या पेशी जागृत होतात. त्याच प्रमाणे इतर प्रकारच्या मानसिक अवस्थेतसुद्धा त्याच्याशी संबंधित दुसऱ्या प्रकारच्या पेशी काम करतात. प्रत्येक पेशींचे काम वेगवेगळे असते. ज्या प्रकारचे विचार आमच्या मेंदूत उत्पन्न होतात, त्या प्रकारच्या पेशी कार्यरत होतात. हे विचार बाह्य संवेदनेतून किंवा मेंदूत स्थित असलेल्या संस्कारातूनसुद्धा स्वयंप्रेरित होतात. मेंदूत उत्पन्न होणाऱ्या विचारांशी जेव्हा आम्ही जोडले जातो, तेव्हा आमच्या मनामध्ये एक विशिष्ट प्रकारची भावना निर्माण होते, ही भावना आम्हाला मानसिक व शारीरिक ह्या दोन्ही प्रकारांनी प्रभावित करते. चिकित्सा शास्त्रानुसार ऐंशी प्रतिशत आजार हे मानसिक असतात. म्हणजेच काही शारीरिक आजाराचे कारण मनोविकार हे असतात. प्राचीन भारतातील योगी आणि मानस शास्त्रज्ञांना हे तथ्य माहीत होते म्हणून त्यांनी मनात सकारात्मक भावना निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी असंख्य मार्ग सांगितलेले आहेत. ज्ञान, भक्ती व कर्म यांच्या साधकांना अनेक अशा उपासनेतून जावे लागते की, ज्यातून स्वयंसकारात्मक भाव निर्माण होतात.