शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश का ठरताेय भारतासाठी डोकेदुखी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 09:02 IST

मुद्द्याची गोष्ट : 1971 साली भारतामुळे बांगलादेश जन्माला आला; पण आता हेच अपत्य भारताकडे द्वेषाने पाहत आहे. त्याला तेथील राजकारणही कारणीभूत आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्याविरोधात जो असंतोष निर्माण झाला, त्यात तेथील नागरिकांनी भारतविरोधी भावना व्यक्त केली होती. हे सगळे चित्र दुर्देवी आहे व त्याचे दूरगामी परिणाम दोन्ही देशाच्या संबंधांवर होणार आहेत.

समीर परांजपे मुख्य उपसंपादक

भारताने ज्या बांगलादेशची निर्मिती केली, त्याच देशाबरोबर तणावाचे संबंध निर्माण झाल्याचे दुर्दैवी चित्र सध्या दिसत आहे. बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजवटीविरोधात तेथील जनतेमध्ये मोठा असंतोष होता. त्याचा भडका उडाल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला व बांगलादेशचा त्याग करून त्या भारतात आल्या. हसीना या नेहमी भारताला अनुकूल असल्याचे म्हटले जात असे. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे; मात्र त्या सत्तेवर असताना बांगलादेशचे भारताशी खूप घनिष्ट संबंध होते असे म्हणता येणार नाही. त्या देशाशी भारताचा सीमेवरून सुरू असलेला वाद, बांगलादेश रायफल्सचे सीमेवर तस्करांशी असलेले साटेलोटे, भारतीय हद्दीत बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीला बांगलादेश रायफल्स देत असलेले पाठबळ या खटकणाऱ्या गोष्टी आहेत.

शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेले अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनूस हे बांगलादेशमध्ये हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार आहेत. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर तेथील जनतेच्या आग्रहाखातर युनूस यांनी हे पद स्वीकारले आहे असे ते म्हणतात. बांगलादेशमध्ये झालेल्या निदर्शनात तेथील अल्पसंख्याकांवरही हल्ले झाले.  त्याचा भारताने कडक निषेध नोंदविला होता.

बांगलादेशमध्ये हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतरही तेथील अल्पसंख्याकांवरील हल्ल्याचे प्रमाण कमी होत नव्हते. शेख हसीना यांच्याविरोधात असंतोषाचा जो भडका उडाला त्यात तेथील काही मंदिरे, अल्पसंख्याकांची घरे, मालमत्ता यांची नासधूस करण्यात आली होती.  पूर्वी इस्कॉनशी संबंधित असलेले चिन्मय कृष्ण दास यांना अटक केल्यानंतर भारत व बांगलादेशमधील तणाव पुन्हा वाढला आहे. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक लोकांच्या सुरक्षेची काळजी तेथील सरकारने वाहणे आवश्यक असताना त्या देशात काही अनपेक्षित प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अटक झालेले चिन्मय कृष्ण दास यांची यापूर्वीच इस्कॉन बांगलादेशच्या सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे असे त्या संघटनेच्या धुरिणांनी जाहीर केले. तसेच चिन्मय कृष्ण दास हे करीत असलेले आंदोलन किंवा मांडत असलेले विचार यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही असे इस्कॉन बांगलादेश या संस्थेने जाहीर केले.  चिन्मय कृष्ण दास यांना पाठिंबा दिला असता तर इस्कॉन बांगलादेश या संस्थेचे अस्तित्व संपविण्याची तेथील राज्यकर्त्यांनी तजवीज केली असती.

राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली

चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात धाडण्यात आले असून त्यांना जामीन देण्यास बांगलादेशमधील  न्यायालयाने नकार दिला. त्या देशातील न्यायालयेदेखील पक्षपाती असून ते सत्ताधाऱ्यांना उत्तम वाटेल असेच निकाल देतात हे गेल्या दोन महिन्यांतील प्रसंगावरून लक्षात आले आहे. शेख हसीना बांगलादेशातून परागंदा झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया यांची खटल्यातून मुक्तता झाली.

पाकिस्तानातील न्याययंत्रणा सत्ताधीश, लष्कर यांच्यापुढे झुकल्याची अनेक उदाहरणे आहेत. बांगलादेशमध्येही आता तेच पाहायला मिळत आहे.  बांगलादेशच्या राजकारणात शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली. मुहम्मद युनूस हा त्यांना पर्याय होऊ शकत नाही. ती पोकळी भरून काढण्यासाठी लागणारे सामर्थ्य बेगम खालिदा झिया यांच्यापाशी उरलेले नाही.

बांगलादेशमधील हल्ल्यांमुळे अल्पसंख्यक भयभीत

nबांगलादेशमध्ये २०२२ साली झालेल्या जनगणनेनुसार १६.५१ कोटी लोकसंख्या आहे. त्यात ७.९५ टक्के लोक हिंदूधर्मीय आहेत. जगात सर्वाधिक हिंदू भारतात राहातात. दुसरा क्रमांक नेपाळ व तिसरा क्रमांक बांगलादेशचा लागतो.

nबांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायांमध्ये हिंदुंचा वरचष्मा आहे. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात जनतेने केलेल्या उठावामध्ये काही मुलतत्ववाद्यांनी मंदिरे जाळण्याचे, अल्पसंख्यकांवर हल्ले करण्याचे धक्कादायक प्रकार केले.

nप्रसारमाध्यमे हल्ल्यांच्या अतिरंजित बातम्या प्रसिद्ध करत आहेत अशी सारवासारव बांगलादेशच्या हंगामी सरकारने केली पण वस्तुस्थिती वेगळी होती हे आता लपून राहिलेले नाही. अशा हल्ल्यांचा भारत सरकारने अतिशय तीव्र शब्दांत निषेध केल्यामुळे बांगलादेशसह जगाला या गोष्टींची दखल घेणे भाग पडले आहे.

बांगलादेशचा बहुतांश कारभार लष्कराच्या ताब्यात गेला आहे. त्या देशात लोकशाही व्यवस्थेत अजून धुगधुगी आहे असे दाखवण्यासाठी युनूस यांच्या हातात सत्ता सोपविण्यात आली आहे. पण अशा गोष्टींमुळे त्या देशाची राजकीय घडी नीट बसेल या भ्रमात कोणीही राहू नये.

बांगलादेशच्या राजकारणात भारतद्वेष हा तेथील राजकारण्यांना यश मिळवून देणारा आवश्यक घटक झाला आहे. मुहम्मद युनूस किंवा त्यांच्यानंतर येणाऱ्या सत्ताधीशांकडून अशाच प्रकारचे भारतदेशाशी वर्तन अपेक्षित आहे.

१९७१ साली भारतामुळे बांगलादेश जन्माला आला; पण आता हेच अपत्य भारताकडे द्वेषाने पाहत आहे. शेजारी देश म्हणून संबंध दृढ ठेवत असतानाच बांगलादेशला चार खडे सुनावणे आवश्यक होते.

ते करूनही बांगलादेशमधील कट्टरपंथी आपल्या कारवाया थांबवतील या भ्रमात कोणीही राहू नये. या सर्व स्थितीमुळे बांगलादेश हा भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश