शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

राष्ट्रवादीचे काय होणार?

By admin | Updated: May 4, 2015 00:08 IST

परस्परविरोधी भूमिकांच्या डोहात राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही गटांगळ्या खात आहे. यापुढे आम्ही कधीही जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही, असे पुन्हा

यदू जोशी -

परस्परविरोधी भूमिकांच्या डोहात राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही गटांगळ्या खात आहे. यापुढे आम्ही कधीही जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही, असे पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी जाहीर केले. पण याच पक्षाने भाजपासोबत विदर्भातील जिल्हा परिषदांमध्ये सत्तेसाठी युती केलेली आहे त्याचे काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळाले नाही. तटकरे हे राष्ट्रवादीच्या संस्कृतीमध्ये पुरते मुरलेले आहेत. केवळ सात महिन्यांपूर्वी त्यांना हे पद मिळाले होते. आताच्या परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष होण्याची मनापासून अन्य कोणाचीही तयारी नसावी. शरद पवारांचे नेतृत्व मानणाऱ्या पक्षातील समजदार नेत्यांची अजित पवारांमुळे घुसमट होते हे आजचे नाही. अनेकदा या नेत्यांनी तशी भावना खासगीत बोलून दाखविली आहे. अशावेळी अजित पवारांचे रागलोभ सांभाळण्याचा संयम असलेले तटकरे पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची रया गेली. प्रदेश मुख्यालयातील वर्दळ आटली आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता असे जन्मापासूनचे या पक्षाचे तंत्र गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत बिघडले आणि पक्ष जमिनीवर आला. अजित पवार, तटकरे यांच्यावर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार आहे. छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय घाम पुसत अँटीकरप्शनचे उंबरे झिजवत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे वजनदार नेते, चांगली प्रतिमा असलेले दिलीप वळसे पाटील, संयमी आणि अभ्यासू असलेले जयंत पाटील, महिला, तरुणींची पसंती मिळू शकते अशा सुप्रिया सुळे, ग्रामीण महाराष्ट्राची जाण असलेले रणजितसिंह मोहिते, मुस्लीम आणि उत्तर भारतीयांमध्ये चांगले नाव असलेले नवाब मलिक आदिंना घेऊन राष्ट्रवादीने अध्यक्षीय मंडळ नेमले असते तर त्यातून वेगळा संदेश गेला असता. पण पक्षावर आपलीच पकड असावी हा आग्रह असलेल्यांची अडचण झाली असती. एक वा द्विचालकानुवर्ती असलेल्या पक्षाकडून इतक्या व्यापकतेची अपेक्षाही नाही. ‘आपल्या पक्षाचे काय होणार’ ही चिंता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे. तटकरे पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाल्याने त्याचे उत्तर मिळणार नाही. गणेश नाईक यांनी आपल्या घराण्यातील कोणालाही नवी मुंबई महापालिकेत उभे केले नाही. त्याचा आदर्श पक्षातील इतरांनी घ्यावा हे म्हणणे सोपे आहे; पण घराणेशाहीला फाटा देणे ही नाईक यांची राजकीय अगतिकता होती. तो त्यांचा त्याग नव्हता. अगतिकतेतून केलेली बाब ही त्याग कशी मानायची? घराणेशाही अन् वतनदारी संपेल त्या दिवशी एक तर राष्ट्रवादी संपेल किंवा प्रचंड लोकाभिमुख तरी होईल. पण तसे करून बघण्याची जोखीम कोण घेणार?जाता जाता : भाजपाचे मंत्री आणि आमदारांमध्ये समन्वयाचा किती अभाव आहे याचा हा अनुभव. विदर्भातील आमदारानेच सांगितलेला. भाजपाचे मंत्री भाजपा आमदाराच्या गावात जाताना त्यांना विचारतही नाहीत याची प्रचिती देणारा हा किस्सा. या आमदारांना बाजूच्या जिल्ह्यातील असलेल्या राज्यमंत्र्यांचा फोन आला. त्यांच्यातील संवाद असा -राज्यमंत्री - गावातलं तुमचं जनसंपर्क कार्यालय खूप बढिया आहे. आमदार- ‘तुम्ही कधी बघितलं?’. राज्यमंत्री - ‘मी एकदोन कार्यक्रमांसाठी आलो होतो गावात. त्यावेळी तुमच्या कार्यालयासमोरून गेलो.’आमदार- साहेब! मी तर त्या दिवशी गावातच होतो. एक फोन तर करायचा होता! आपली भेट झाली असती. राज्यमंत्री - पुढच्या वेळी आलो की फोन करीन.