शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे काय होणार?

By admin | Updated: May 4, 2015 00:08 IST

परस्परविरोधी भूमिकांच्या डोहात राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही गटांगळ्या खात आहे. यापुढे आम्ही कधीही जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही, असे पुन्हा

यदू जोशी -

परस्परविरोधी भूमिकांच्या डोहात राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही गटांगळ्या खात आहे. यापुढे आम्ही कधीही जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही, असे पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी जाहीर केले. पण याच पक्षाने भाजपासोबत विदर्भातील जिल्हा परिषदांमध्ये सत्तेसाठी युती केलेली आहे त्याचे काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळाले नाही. तटकरे हे राष्ट्रवादीच्या संस्कृतीमध्ये पुरते मुरलेले आहेत. केवळ सात महिन्यांपूर्वी त्यांना हे पद मिळाले होते. आताच्या परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष होण्याची मनापासून अन्य कोणाचीही तयारी नसावी. शरद पवारांचे नेतृत्व मानणाऱ्या पक्षातील समजदार नेत्यांची अजित पवारांमुळे घुसमट होते हे आजचे नाही. अनेकदा या नेत्यांनी तशी भावना खासगीत बोलून दाखविली आहे. अशावेळी अजित पवारांचे रागलोभ सांभाळण्याचा संयम असलेले तटकरे पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची रया गेली. प्रदेश मुख्यालयातील वर्दळ आटली आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता असे जन्मापासूनचे या पक्षाचे तंत्र गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत बिघडले आणि पक्ष जमिनीवर आला. अजित पवार, तटकरे यांच्यावर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार आहे. छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय घाम पुसत अँटीकरप्शनचे उंबरे झिजवत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे वजनदार नेते, चांगली प्रतिमा असलेले दिलीप वळसे पाटील, संयमी आणि अभ्यासू असलेले जयंत पाटील, महिला, तरुणींची पसंती मिळू शकते अशा सुप्रिया सुळे, ग्रामीण महाराष्ट्राची जाण असलेले रणजितसिंह मोहिते, मुस्लीम आणि उत्तर भारतीयांमध्ये चांगले नाव असलेले नवाब मलिक आदिंना घेऊन राष्ट्रवादीने अध्यक्षीय मंडळ नेमले असते तर त्यातून वेगळा संदेश गेला असता. पण पक्षावर आपलीच पकड असावी हा आग्रह असलेल्यांची अडचण झाली असती. एक वा द्विचालकानुवर्ती असलेल्या पक्षाकडून इतक्या व्यापकतेची अपेक्षाही नाही. ‘आपल्या पक्षाचे काय होणार’ ही चिंता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे. तटकरे पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाल्याने त्याचे उत्तर मिळणार नाही. गणेश नाईक यांनी आपल्या घराण्यातील कोणालाही नवी मुंबई महापालिकेत उभे केले नाही. त्याचा आदर्श पक्षातील इतरांनी घ्यावा हे म्हणणे सोपे आहे; पण घराणेशाहीला फाटा देणे ही नाईक यांची राजकीय अगतिकता होती. तो त्यांचा त्याग नव्हता. अगतिकतेतून केलेली बाब ही त्याग कशी मानायची? घराणेशाही अन् वतनदारी संपेल त्या दिवशी एक तर राष्ट्रवादी संपेल किंवा प्रचंड लोकाभिमुख तरी होईल. पण तसे करून बघण्याची जोखीम कोण घेणार?जाता जाता : भाजपाचे मंत्री आणि आमदारांमध्ये समन्वयाचा किती अभाव आहे याचा हा अनुभव. विदर्भातील आमदारानेच सांगितलेला. भाजपाचे मंत्री भाजपा आमदाराच्या गावात जाताना त्यांना विचारतही नाहीत याची प्रचिती देणारा हा किस्सा. या आमदारांना बाजूच्या जिल्ह्यातील असलेल्या राज्यमंत्र्यांचा फोन आला. त्यांच्यातील संवाद असा -राज्यमंत्री - गावातलं तुमचं जनसंपर्क कार्यालय खूप बढिया आहे. आमदार- ‘तुम्ही कधी बघितलं?’. राज्यमंत्री - ‘मी एकदोन कार्यक्रमांसाठी आलो होतो गावात. त्यावेळी तुमच्या कार्यालयासमोरून गेलो.’आमदार- साहेब! मी तर त्या दिवशी गावातच होतो. एक फोन तर करायचा होता! आपली भेट झाली असती. राज्यमंत्री - पुढच्या वेळी आलो की फोन करीन.