शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

कशासाठी? दारूसाठी!

By admin | Updated: April 18, 2017 01:17 IST

सध्या समाजातील दोन घटक हवालदिल झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे तूर उत्पादक शेतकरी अन् दुसरा म्हणजे मद्य विक्रेते ! दोघेही आपापला माल विकण्यासाठी अक्षरश: कासावीस झाले आहेत

सध्या समाजातील दोन घटक हवालदिल झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे तूर उत्पादक शेतकरी अन् दुसरा म्हणजे मद्य विक्रेते ! दोघेही आपापला माल विकण्यासाठी अक्षरश: कासावीस झाले आहेत; पण हे साम्य इथेच संपते. त्यानंतर सुरू होतो तो विरोधाभास ! तूर उत्पादक शेतकऱ्यांची वास्तपुस्त करायला कुणालाही वेळ नाही. मद्य विक्रेत्यांसाठी मात्र राज्य सरकारपासून उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक यंत्रणेपर्यंत सारेच तत्पर दिसत आहेत.भारतीय जनता पक्षाला, केंद्रात सत्तेत येताबरोबर डाळींच्या भडकलेल्या दरांनी हिसका दाखवला. त्यामुळे हादरलेल्या सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डाळवर्गीय पिकांचे उत्पादन घेण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीचा पेरा केला. त्यानंतर मात्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. अजूनही निम्मी तूर शेतकऱ्यांच्या घरात असताना, नाफेड खरेदी बंद करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे दाद मागावी, तर केंद्राकडे बोट दाखविल्या जाते अन् तिथे तर स्वपक्षीय खासदारांचेही ऐकून घेतल्या जात नाही! मग बिचाऱ्या शेतकऱ्यांचा काय पाड? सरकारच्या उपेक्षेच्या धोरणाचा फटका जसा तूर उत्पादक शेतकऱ्याला बसला, तसाच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका मद्य विक्रेत्यांना बसला. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मात्र देशातील बहुतांश राज्यांमधील सरकारे कामाला लागली आहेत. महामार्गांपासून पाचशे मीटर अंतराच्या आत मद्य विक्री नको म्हणून, चक्क महामार्गांच्या शहरांमधून जाणाऱ्या भागांचे पालिकांकडे हस्तांतरण करण्यापासून ते पाचशे मीटरच्या सीमारेषेवर असलेल्या बार किंवा दुकानांचे प्रवेशद्वार बदलून त्यांना मर्यादेबाहेर काढण्यापर्यंतचे सर्व तऱ्हेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अकोला शहरातील एका चौकातील एक व्यापारी संकुल महामार्गापासून साधारणत: ४८० मीटर अंतरावर आहे. त्या संकुलातील तळ मजल्यावरील मद्यविक्रीचे दुकान महामार्गापासून ४८८ मीटर अंतरावर, तर त्या दुकानाच्या बरोबर खाली तळघरात असलेला बार ५०५ मीटर अंतरावर असल्याचे सरकारी आकडेवारी दर्शविते. सर्वोच्च न्यायालयाच्या फर्मानानंतर बारमालकाने प्रवेशद्वार इमारतीच्या मागच्या बाजूला स्थानांतरित केल्याची ही किमया ! पुढे वरच्या मजल्यावरील दुकान मालकानेही तोच कित्ता गिरवला! महामार्गालगतचे दुसरे एक दुकान अवघ्या चारच दिवसात सर्व सोपस्कार पार पाडून त्याच चौकात स्थानांतरित झाले आहे. सरकारी यंत्रणेची किती ही तत्परता ! हीच तत्परता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर का दिसत नाही, हा प्रश्न कुणी विचारू नये. त्याचे उत्तर सगळ्यांनाच माहीत आहे. मुळात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एका विशिष्ट उद्देशाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना, सरकारी यंत्रणांनी त्या निर्णयामागची भावना लक्षात घ्यावी, की केवळ तांत्रिक मुद्दे लक्षात घ्यावे? खरे तर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यावेळी प्रवेशद्वाराची जी स्थिती होती, त्यानुसारच अंतराचे मोजमाप केल्या जाईल, अशी भूमिका सरकारी यंत्रणा घेऊ शकल्या असत्या; पण मग खिसे कसे गरम झाले असते? मुंबईत दोन्ही द्रूतगती मार्गांचे एमएमआरडीएकडे हस्तांतरण करून अनेक बार, दुकाने वाचविण्याचे पुण्यकर्म राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने पार पाडले आहे. उद्या हाच कित्ता राज्यातील इतर शहरांमध्येही शंभर टक्के गिरविल्या जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी होईल की नाही, या प्रश्नाचे उत्तर काळच देईल; पण मोठ्या प्रमाणात बार, मद्यविक्रीची दुकाने बंद झाल्याने शहरांमध्ये मदिरापानाचे प्रमाण काही प्रमाणात तरी नक्कीच कमी झाले आहे. परिणामी, महसूल बुडण्याच्या धास्तीने बहुधा राज्य सरकार कासावीस झाले असावे. तूर उत्पादक शेतकरीही तसाच कासावीस झाला आहे. मद्य विक्रेत्यांचा कैवार घेणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा कैवार मात्र घ्यावासा वाटत नाही. - रवि टाले