शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

पोशाख

By admin | Updated: June 5, 2017 00:19 IST

तुम्ही कपडे काय घालता यावर तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. कंपनीत जीन्स चालत नाही म्हणतात.

किशोर पाठकतुम्ही कपडे काय घालता यावर तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. कंपनीत जीन्स चालत नाही म्हणतात. तिथे प्लेन फॉर्मल चालतात. म्हणजे कॉलेजात ठिगळा ठिगळाच्या जीन्स घालणारी मुलं नोकरीला लागले की पहिल्या दिवशीच शर्ट इन करून टाय लावून स्मार्ट होतो. माणूस म्हटला की त्याची एक ओळख असते. एखाद्याला कायम शर्ट पायजमात पाहिल्यावर सूटमध्ये पाहणे चमत्कारिक वाटते. अगदी पूर्वीपासून आपण पोशाखाचे नाते माणसाच्या स्वभावाशी जोडलेले आहे. गांधींचे बॅरिस्टर ड्रेसमधले फोटो आता स्मरणात नाहीत. उलट चित्रकारांच्या भाषेत गांधी काढणे सोपे. टक्कल, चष्मा, पंचा बास. याउलट रवि वर्माच्या चित्रातली स्त्री प्रत्यक्ष पाहायची म्हणजे कसरतच. इतके दागिने, कपड्यांचा थाट वेगळाच आहे. शिवाजी महाराज एकतर सिंहासनावर नाहीतर घोड्यावरच दिसतात. त्यांचा जिरेटोप, अंगरखा, दागिने पाहणे गर्वाचे असतेच, पण महानुभव असतो. शिवाजी महाराज, विवेकानंद, गांधी, नेहरू, पूर्वीचे राजे यांना साध्या आपल्या वेशात पाहणे अशक्य. आपल्याला व्यक्तिमत्त्व नसते म्हणून आपण कोणत्याही पोशाखात बेंगरूळ दिसणार हे नक्की. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले लगेच जाकीटची फॅशन आली. पंतप्रधान, मुख्यमंत्री ते आमदार, नगरसेवक जाकिटात दिसू लागले. वास्तविक पूर्वीचे कवी, शायर हे झब्बा जाकिटात कायम असायचे. पण तेव्हा ती फॅशन झाली नाही. आता ती झाली. म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीचे आपण काय घेऊ शकतो ते पाहावं. शिवाजी महाराज, विवेकानंद यांच्या पोशाखाची नक्कल स्पेशल दिवशीच असते. विवेकानंदांचा ड्रेस रोज कुणी वापरू शकत नाहीत. कारण ते नुस्ते कापड नसते. ती वृत्ती असते, त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. एकवेळ तुम्ही कपड्यांचे अनुकरण कराल, पण विचारांचे शक्य नाही. तो भागच वेगळा. अलीकडे कपड्यांची लांबी रुंदी कमी होत चाललीय. बेंबी वा गळा मोकळा ठेवणे ही फॅशन झालीय. व्यक्तिस्वातंत्र्य हा विषय कसा आणि कुठपर्यंत ताणायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्याचा संबंध सहकाराशी लावायचा असेल तर लावावा, पण तरुणांना ही ओल्ड स्टाइल पसंत नाही. ध्येय, विचार आखूड होत गेले की त्याचा परिणाम पोशाखावरही होतो. एक मित्र सिग्रेट प्यायचा. एक दिवशी म्हणाला सिग्रेटचा ब्रँड बदलला. मी म्हटलं का? व्हरायटी म्हणून? तर म्हणाला, तात्यासाहेब ही सिग्रेट पितात म्हणून मीही आजपासून स्वीकारली. मी अचंब्याने म्हणालो, फक्त सिग्रेट? तो मंद हसला. बरोबर होते, तो तात्यांच्या सिग्रेटचेच अनुकरण करूशकत होता. म्हणून म्हटलं प्रत्येक जण कुवतीपुरता महामानव वापरतो, झेपेल, पचेल तेवढे विचार स्वीकारतो. एरवी पंधरा वेळा विपश्यना केलेला मित्र येताच कचाकचा भांडतो. परत त्याचे समर्थन करतो. एक श्लोक आहे, किं वाससा तत्र विचारणीयं। वास: प्रधानं खलु योग्यताया:। पीतांबरं वीक्ष्य ददौ सुकन्या चर्मांवर वीक्ष्य विषं समुद्रा। विष्णूचा पीतांबर बघून मुलगी दिली आणि चर्मांवर बघून विष दिले - तर असे हे पोशाख माहात्म्य।