शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

पोशाख

By admin | Updated: June 5, 2017 00:19 IST

तुम्ही कपडे काय घालता यावर तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. कंपनीत जीन्स चालत नाही म्हणतात.

किशोर पाठकतुम्ही कपडे काय घालता यावर तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. कंपनीत जीन्स चालत नाही म्हणतात. तिथे प्लेन फॉर्मल चालतात. म्हणजे कॉलेजात ठिगळा ठिगळाच्या जीन्स घालणारी मुलं नोकरीला लागले की पहिल्या दिवशीच शर्ट इन करून टाय लावून स्मार्ट होतो. माणूस म्हटला की त्याची एक ओळख असते. एखाद्याला कायम शर्ट पायजमात पाहिल्यावर सूटमध्ये पाहणे चमत्कारिक वाटते. अगदी पूर्वीपासून आपण पोशाखाचे नाते माणसाच्या स्वभावाशी जोडलेले आहे. गांधींचे बॅरिस्टर ड्रेसमधले फोटो आता स्मरणात नाहीत. उलट चित्रकारांच्या भाषेत गांधी काढणे सोपे. टक्कल, चष्मा, पंचा बास. याउलट रवि वर्माच्या चित्रातली स्त्री प्रत्यक्ष पाहायची म्हणजे कसरतच. इतके दागिने, कपड्यांचा थाट वेगळाच आहे. शिवाजी महाराज एकतर सिंहासनावर नाहीतर घोड्यावरच दिसतात. त्यांचा जिरेटोप, अंगरखा, दागिने पाहणे गर्वाचे असतेच, पण महानुभव असतो. शिवाजी महाराज, विवेकानंद, गांधी, नेहरू, पूर्वीचे राजे यांना साध्या आपल्या वेशात पाहणे अशक्य. आपल्याला व्यक्तिमत्त्व नसते म्हणून आपण कोणत्याही पोशाखात बेंगरूळ दिसणार हे नक्की. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले लगेच जाकीटची फॅशन आली. पंतप्रधान, मुख्यमंत्री ते आमदार, नगरसेवक जाकिटात दिसू लागले. वास्तविक पूर्वीचे कवी, शायर हे झब्बा जाकिटात कायम असायचे. पण तेव्हा ती फॅशन झाली नाही. आता ती झाली. म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीचे आपण काय घेऊ शकतो ते पाहावं. शिवाजी महाराज, विवेकानंद यांच्या पोशाखाची नक्कल स्पेशल दिवशीच असते. विवेकानंदांचा ड्रेस रोज कुणी वापरू शकत नाहीत. कारण ते नुस्ते कापड नसते. ती वृत्ती असते, त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. एकवेळ तुम्ही कपड्यांचे अनुकरण कराल, पण विचारांचे शक्य नाही. तो भागच वेगळा. अलीकडे कपड्यांची लांबी रुंदी कमी होत चाललीय. बेंबी वा गळा मोकळा ठेवणे ही फॅशन झालीय. व्यक्तिस्वातंत्र्य हा विषय कसा आणि कुठपर्यंत ताणायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्याचा संबंध सहकाराशी लावायचा असेल तर लावावा, पण तरुणांना ही ओल्ड स्टाइल पसंत नाही. ध्येय, विचार आखूड होत गेले की त्याचा परिणाम पोशाखावरही होतो. एक मित्र सिग्रेट प्यायचा. एक दिवशी म्हणाला सिग्रेटचा ब्रँड बदलला. मी म्हटलं का? व्हरायटी म्हणून? तर म्हणाला, तात्यासाहेब ही सिग्रेट पितात म्हणून मीही आजपासून स्वीकारली. मी अचंब्याने म्हणालो, फक्त सिग्रेट? तो मंद हसला. बरोबर होते, तो तात्यांच्या सिग्रेटचेच अनुकरण करूशकत होता. म्हणून म्हटलं प्रत्येक जण कुवतीपुरता महामानव वापरतो, झेपेल, पचेल तेवढे विचार स्वीकारतो. एरवी पंधरा वेळा विपश्यना केलेला मित्र येताच कचाकचा भांडतो. परत त्याचे समर्थन करतो. एक श्लोक आहे, किं वाससा तत्र विचारणीयं। वास: प्रधानं खलु योग्यताया:। पीतांबरं वीक्ष्य ददौ सुकन्या चर्मांवर वीक्ष्य विषं समुद्रा। विष्णूचा पीतांबर बघून मुलगी दिली आणि चर्मांवर बघून विष दिले - तर असे हे पोशाख माहात्म्य।