शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पोशाख

By admin | Updated: June 5, 2017 00:19 IST

तुम्ही कपडे काय घालता यावर तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. कंपनीत जीन्स चालत नाही म्हणतात.

किशोर पाठकतुम्ही कपडे काय घालता यावर तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. कंपनीत जीन्स चालत नाही म्हणतात. तिथे प्लेन फॉर्मल चालतात. म्हणजे कॉलेजात ठिगळा ठिगळाच्या जीन्स घालणारी मुलं नोकरीला लागले की पहिल्या दिवशीच शर्ट इन करून टाय लावून स्मार्ट होतो. माणूस म्हटला की त्याची एक ओळख असते. एखाद्याला कायम शर्ट पायजमात पाहिल्यावर सूटमध्ये पाहणे चमत्कारिक वाटते. अगदी पूर्वीपासून आपण पोशाखाचे नाते माणसाच्या स्वभावाशी जोडलेले आहे. गांधींचे बॅरिस्टर ड्रेसमधले फोटो आता स्मरणात नाहीत. उलट चित्रकारांच्या भाषेत गांधी काढणे सोपे. टक्कल, चष्मा, पंचा बास. याउलट रवि वर्माच्या चित्रातली स्त्री प्रत्यक्ष पाहायची म्हणजे कसरतच. इतके दागिने, कपड्यांचा थाट वेगळाच आहे. शिवाजी महाराज एकतर सिंहासनावर नाहीतर घोड्यावरच दिसतात. त्यांचा जिरेटोप, अंगरखा, दागिने पाहणे गर्वाचे असतेच, पण महानुभव असतो. शिवाजी महाराज, विवेकानंद, गांधी, नेहरू, पूर्वीचे राजे यांना साध्या आपल्या वेशात पाहणे अशक्य. आपल्याला व्यक्तिमत्त्व नसते म्हणून आपण कोणत्याही पोशाखात बेंगरूळ दिसणार हे नक्की. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले लगेच जाकीटची फॅशन आली. पंतप्रधान, मुख्यमंत्री ते आमदार, नगरसेवक जाकिटात दिसू लागले. वास्तविक पूर्वीचे कवी, शायर हे झब्बा जाकिटात कायम असायचे. पण तेव्हा ती फॅशन झाली नाही. आता ती झाली. म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीचे आपण काय घेऊ शकतो ते पाहावं. शिवाजी महाराज, विवेकानंद यांच्या पोशाखाची नक्कल स्पेशल दिवशीच असते. विवेकानंदांचा ड्रेस रोज कुणी वापरू शकत नाहीत. कारण ते नुस्ते कापड नसते. ती वृत्ती असते, त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. एकवेळ तुम्ही कपड्यांचे अनुकरण कराल, पण विचारांचे शक्य नाही. तो भागच वेगळा. अलीकडे कपड्यांची लांबी रुंदी कमी होत चाललीय. बेंबी वा गळा मोकळा ठेवणे ही फॅशन झालीय. व्यक्तिस्वातंत्र्य हा विषय कसा आणि कुठपर्यंत ताणायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्याचा संबंध सहकाराशी लावायचा असेल तर लावावा, पण तरुणांना ही ओल्ड स्टाइल पसंत नाही. ध्येय, विचार आखूड होत गेले की त्याचा परिणाम पोशाखावरही होतो. एक मित्र सिग्रेट प्यायचा. एक दिवशी म्हणाला सिग्रेटचा ब्रँड बदलला. मी म्हटलं का? व्हरायटी म्हणून? तर म्हणाला, तात्यासाहेब ही सिग्रेट पितात म्हणून मीही आजपासून स्वीकारली. मी अचंब्याने म्हणालो, फक्त सिग्रेट? तो मंद हसला. बरोबर होते, तो तात्यांच्या सिग्रेटचेच अनुकरण करूशकत होता. म्हणून म्हटलं प्रत्येक जण कुवतीपुरता महामानव वापरतो, झेपेल, पचेल तेवढे विचार स्वीकारतो. एरवी पंधरा वेळा विपश्यना केलेला मित्र येताच कचाकचा भांडतो. परत त्याचे समर्थन करतो. एक श्लोक आहे, किं वाससा तत्र विचारणीयं। वास: प्रधानं खलु योग्यताया:। पीतांबरं वीक्ष्य ददौ सुकन्या चर्मांवर वीक्ष्य विषं समुद्रा। विष्णूचा पीतांबर बघून मुलगी दिली आणि चर्मांवर बघून विष दिले - तर असे हे पोशाख माहात्म्य।