शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

निर्भयतेशिवाय प्रगती नाही

By admin | Updated: February 13, 2015 00:12 IST

ईश्वरनिष्ठाला ही सारी जीवसृष्टी, त्याच परमात्म तत्त्वाचा विस्तार भासत असल्याने तोदेखील निर्भयतेने वावरतो - नित्य प्रार्थना,

निर्भयतेसाठी खरेपणा, सचोटी आवश्यक आहे. निर्भयतेशिवाय अंगीकृत कार्यात प्रगती नाही. आपला आहार-विहार, पथ्य सांभाळणाऱ्याला तशी रोगाची काळजी करण्याचे कारण नाही. तशी सत्यनिष्ठाला भीतीच उरत नाही.तरि न घालुनि महापुरी।न घेणे बुडणेयाचि शिसासी।कां रोगुन गणिजे यरी।पथ्याचिया।। तैसा कर्मांकर्माचिया मोहरा। उठू नेदि अहंकारा।संसाराचा दरारा।सांडणे येणे।। (ज्ञाने १६, ६९-७०)ईश्वरनिष्ठाला ही सारी जीवसृष्टी, त्याच परमात्म तत्त्वाचा विस्तार भासत असल्याने तोदेखील निर्भयतेने वावरतो - नित्य प्रार्थना, उपासना करणाऱ्याला तो आपल्या उपास्याच्या रूपाने पाठीशी आहे किंवा माझ्यात असलेल्या ईश्वरी अंशाचा म्हणजे पर्यायाने माझाच हा विस्तार आहे, अशी त्याची भावना असते. भीती ही नेहमी दुसऱ्यापासून असते. मीच सर्वत्र व्यापलेला आहे. दुसरे त्याशिवाय नाही, ही भावना निर्भयतेचे अधिष्ठान आहे.आपल्या वाट्याला आलेली निहितकर्मे करणारा निर्भयतेचा उपासक ठरतो किंवा वरचा वैचारिक स्तर ज्यांनी गाठला आहे तो आत्मभावाने, निर्भयतेने संचार करीत असतो. आपल्या कर्तव्यपालनात कुठेही मी पणाचा भाव नसल्याने असा साधक संसारातील द्वंद्वांना सामोरे जाताना कुठलाही धाक बाळगत नाही.आपल्या कर्मप्रवृत्तीत अहंकाराला प्रवेशू न देता, जे झाले, घडले ते त्याच्या इच्छेने झाले असे समजून कर्मफलाच्या परिणामापासून तो भयभीत होत नाही. सर्वांविषयी आत्मभाव निर्माण होणे ही साधना कठीण असली तरी निर्भयतेसाठी ती आवश्यक आहे. विश्वातील परम सत्य एक ईश्वरी सत्ताच आहे. ही जाणीव असणे- नित्य असणे - आवश्यक आहे. निर्भयतेशिवाय संसार दु:खाला सोडविणारे अन्य औषध नाही. सदाचार, ईश्वरनिष्ठा, संतांची कृपा आणि नित्य प्रार्थना यातून आघाडीवर असलेल्या या गुणविशेषाची, अभय साधनेची सुरुवात होते. आपल्या प्रत्येक व्यवहारात खरेपणा किंवा सचोटी राखणे हे या दृष्टीने महत्त्वाचे आहे.