शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

निर्भयतेशिवाय प्रगती नाही

By admin | Updated: February 13, 2015 00:12 IST

ईश्वरनिष्ठाला ही सारी जीवसृष्टी, त्याच परमात्म तत्त्वाचा विस्तार भासत असल्याने तोदेखील निर्भयतेने वावरतो - नित्य प्रार्थना,

निर्भयतेसाठी खरेपणा, सचोटी आवश्यक आहे. निर्भयतेशिवाय अंगीकृत कार्यात प्रगती नाही. आपला आहार-विहार, पथ्य सांभाळणाऱ्याला तशी रोगाची काळजी करण्याचे कारण नाही. तशी सत्यनिष्ठाला भीतीच उरत नाही.तरि न घालुनि महापुरी।न घेणे बुडणेयाचि शिसासी।कां रोगुन गणिजे यरी।पथ्याचिया।। तैसा कर्मांकर्माचिया मोहरा। उठू नेदि अहंकारा।संसाराचा दरारा।सांडणे येणे।। (ज्ञाने १६, ६९-७०)ईश्वरनिष्ठाला ही सारी जीवसृष्टी, त्याच परमात्म तत्त्वाचा विस्तार भासत असल्याने तोदेखील निर्भयतेने वावरतो - नित्य प्रार्थना, उपासना करणाऱ्याला तो आपल्या उपास्याच्या रूपाने पाठीशी आहे किंवा माझ्यात असलेल्या ईश्वरी अंशाचा म्हणजे पर्यायाने माझाच हा विस्तार आहे, अशी त्याची भावना असते. भीती ही नेहमी दुसऱ्यापासून असते. मीच सर्वत्र व्यापलेला आहे. दुसरे त्याशिवाय नाही, ही भावना निर्भयतेचे अधिष्ठान आहे.आपल्या वाट्याला आलेली निहितकर्मे करणारा निर्भयतेचा उपासक ठरतो किंवा वरचा वैचारिक स्तर ज्यांनी गाठला आहे तो आत्मभावाने, निर्भयतेने संचार करीत असतो. आपल्या कर्तव्यपालनात कुठेही मी पणाचा भाव नसल्याने असा साधक संसारातील द्वंद्वांना सामोरे जाताना कुठलाही धाक बाळगत नाही.आपल्या कर्मप्रवृत्तीत अहंकाराला प्रवेशू न देता, जे झाले, घडले ते त्याच्या इच्छेने झाले असे समजून कर्मफलाच्या परिणामापासून तो भयभीत होत नाही. सर्वांविषयी आत्मभाव निर्माण होणे ही साधना कठीण असली तरी निर्भयतेसाठी ती आवश्यक आहे. विश्वातील परम सत्य एक ईश्वरी सत्ताच आहे. ही जाणीव असणे- नित्य असणे - आवश्यक आहे. निर्भयतेशिवाय संसार दु:खाला सोडविणारे अन्य औषध नाही. सदाचार, ईश्वरनिष्ठा, संतांची कृपा आणि नित्य प्रार्थना यातून आघाडीवर असलेल्या या गुणविशेषाची, अभय साधनेची सुरुवात होते. आपल्या प्रत्येक व्यवहारात खरेपणा किंवा सचोटी राखणे हे या दृष्टीने महत्त्वाचे आहे.