शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

निर्भयतेशिवाय प्रगती नाही

By admin | Updated: February 13, 2015 00:12 IST

ईश्वरनिष्ठाला ही सारी जीवसृष्टी, त्याच परमात्म तत्त्वाचा विस्तार भासत असल्याने तोदेखील निर्भयतेने वावरतो - नित्य प्रार्थना,

निर्भयतेसाठी खरेपणा, सचोटी आवश्यक आहे. निर्भयतेशिवाय अंगीकृत कार्यात प्रगती नाही. आपला आहार-विहार, पथ्य सांभाळणाऱ्याला तशी रोगाची काळजी करण्याचे कारण नाही. तशी सत्यनिष्ठाला भीतीच उरत नाही.तरि न घालुनि महापुरी।न घेणे बुडणेयाचि शिसासी।कां रोगुन गणिजे यरी।पथ्याचिया।। तैसा कर्मांकर्माचिया मोहरा। उठू नेदि अहंकारा।संसाराचा दरारा।सांडणे येणे।। (ज्ञाने १६, ६९-७०)ईश्वरनिष्ठाला ही सारी जीवसृष्टी, त्याच परमात्म तत्त्वाचा विस्तार भासत असल्याने तोदेखील निर्भयतेने वावरतो - नित्य प्रार्थना, उपासना करणाऱ्याला तो आपल्या उपास्याच्या रूपाने पाठीशी आहे किंवा माझ्यात असलेल्या ईश्वरी अंशाचा म्हणजे पर्यायाने माझाच हा विस्तार आहे, अशी त्याची भावना असते. भीती ही नेहमी दुसऱ्यापासून असते. मीच सर्वत्र व्यापलेला आहे. दुसरे त्याशिवाय नाही, ही भावना निर्भयतेचे अधिष्ठान आहे.आपल्या वाट्याला आलेली निहितकर्मे करणारा निर्भयतेचा उपासक ठरतो किंवा वरचा वैचारिक स्तर ज्यांनी गाठला आहे तो आत्मभावाने, निर्भयतेने संचार करीत असतो. आपल्या कर्तव्यपालनात कुठेही मी पणाचा भाव नसल्याने असा साधक संसारातील द्वंद्वांना सामोरे जाताना कुठलाही धाक बाळगत नाही.आपल्या कर्मप्रवृत्तीत अहंकाराला प्रवेशू न देता, जे झाले, घडले ते त्याच्या इच्छेने झाले असे समजून कर्मफलाच्या परिणामापासून तो भयभीत होत नाही. सर्वांविषयी आत्मभाव निर्माण होणे ही साधना कठीण असली तरी निर्भयतेसाठी ती आवश्यक आहे. विश्वातील परम सत्य एक ईश्वरी सत्ताच आहे. ही जाणीव असणे- नित्य असणे - आवश्यक आहे. निर्भयतेशिवाय संसार दु:खाला सोडविणारे अन्य औषध नाही. सदाचार, ईश्वरनिष्ठा, संतांची कृपा आणि नित्य प्रार्थना यातून आघाडीवर असलेल्या या गुणविशेषाची, अभय साधनेची सुरुवात होते. आपल्या प्रत्येक व्यवहारात खरेपणा किंवा सचोटी राखणे हे या दृष्टीने महत्त्वाचे आहे.