शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

संघ आणि सरकार

By admin | Updated: August 2, 2014 00:23 IST

रा.स्व. संघाने नरेंद्र मोदींना त्यांचे शब्द गिळायला भाग पाडले आहे.

रा.स्व. संघाने नरेंद्र मोदींना त्यांचे शब्द गिळायला भाग पाडले आहे. २९ जुलैला कृषी संशोधन व अनुसंधान या संस्थेच्या (आयसीएआर) ८६ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने, देशभरातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना उद्देशून भाषण करताना मोदी म्हणाले, ह्यतुमचे संशोधन प्रयोगशाळेतून निघून शेतीपर्यंत (फ्रॉम लॅब टू लँड) पोहचले पाहिजे. तुमच्या संशोधनांनी शेतीचे उत्पादन वाढले पाहिजे आणि शेतकऱ्यांची समृद्धीही वाढली पाहिजे. त्यासाठी आवश्यक तर आपल्या विद्यापीठांत आकाशवाणीची केंद्रे स्थापन करा व त्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत नव्या शोधांची माहिती पोहोचवा.ह्ण सगळ्या प्रसिद्धीमाध्यमांनी या आवाहनाला भरघोस प्रसिद्धी दिल्यानंतर व जीवशास्त्रीय पद्धतीने विकसित केलेल्या तांदूळ, गहू व डाळींपासून वांग्यापर्यंतच्या पिकांच्या नव्या जाती कृषी क्षेत्रापर्यंत पोहचविण्याची तयारी या संस्थांनी सुरु केल्यानंतर ह्यअसले काही करू देणार नाहीह्ण असा इशारा भारतीय किसान संघ व स्वदेशी जागरण मंच या संघ परिवारातल्या दोन संघटनांनी या संस्थांना व मोदींना दिला आहे. जीवशास्त्रीय पद्धतीने विकसित केलेल्या पिकांंचा शेतजमिनीवर व ती खाणाऱ्या लोकांवर कोणता परिणाम होईल याची सखोल व शास्त्रीय तपासणी आधी करा, असे या संघटनांनी त्यांना खडसावले आहे. शिवाय ह्यतुमच्या निवडणूक जाहीरनाम्यात आम्ही असे काही करणार नाही असे आश्वासन तुम्हीच दिले असल्याचीह्ण आठवणही त्यांनी मोदी व भाजपा यांना करून दिली आहे. या संघटनांच्या शिष्टमंडळाचा जोर व दबाव एवढा मोठा की, मोदी सरकारातील एका मंत्र्यानेच ह्यआम्ही लगेच असे काही करणार नाहीह्ण असे आश्वासन देऊन टाकले आहे. जीवशास्त्रीय पद्धतीने विकसित केलले बियाणे पुरविणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना मूठभर आहेत. हे बियाणे देशात आणायचे तर देशातील बीज उत्पादन करणारी केंद्रे व शेतकरी यांचे नुकसान होईल आणि कृषी क्षेत्रात येत असणारा पैसा विदेशात जाईल असेही संघाच्या या संस्थांचे प्रतिपादन आहे. मात्र दोनच दिवसात एका मागोमाग एक घडलेल्या या दोन घटनांनी निर्माण केलेले प्रश्न राजकीय आहेत. मोदी सरकारातील मंत्री पंतप्रधान आणि संघ यापैकी कोणाचे अधिक ऐकतात हा प्रश्न जसा यातून पुढे आला आहे, तसाच संघ मोदींनाही कामाचे स्वातंत्र्य देणार की नाही, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. याआधी अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारवर मर्यादा घालण्याचा असाच प्रयत्न संघाने केला होता. आपल्या पक्षाने जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने मोदी एवढ्यातच विसरले की काय, हाही प्रश्न यातून निर्माण होणारा आहे. मात्र या साऱ्या गदारोळात महत्त्वाची बाब ही की, संघाने मोदी सरकारला शंभर दिवस पूर्ण होण्याआधी असे जाहीररीत्या फटकारले ही आहे. १९९९ ते २००४ या काळात अटलबिहारी वाजपेयी यांचे पहिले भाजपाप्रणीत आघाडी सरकार सत्तेवर होेते. त्या सरकारात अनेक पक्ष सामील होते. स्वाभाविकच वाजपेयींवर ती आघाडी सांभाळण्याचे व त्यातील प्रत्येक पक्षाला सोबत घेण्याची जबाबदारी होती. संघाच्या तेव्हाच्या नेतृत्वाला मात्र आपली कार्यक्रमपत्रिका वाजपेयींनी राबवावी याची घाई होती. त्यासाठी त्यांनी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दोघांनाही वेळोवेळी जाहीरपणे फटकारणे सुरू केले होते. त्यामुळे आलेली उद्विग्नता वाजपेयींनी काही पत्रकारांजवळ बोलूनही दाखविली होती. त्यांच्या पक्षातही त्यावेळी याची चर्चा झाली होती. आताचे मोदी सरकार स्वबळावर उभे आहे. झालेच तर ते आपल्या व्यक्तिगत लोकप्रियतेमुळे व कार्यशैलीमुळे सत्तेवर आले आहे, याची जाणीव मोदींना आहे. संघाने त्यांच्या नेतृत्वाचा पाठपुरावा निवडणुकीत केला असला तरी मोदींच्या विजयात त्यांचा स्वत:चा वाटा किती आणि संघाचा किती याची एक निश्चित जाणीव मोदींना आहे. आपल्या सरकारातील ज्या पुढाऱ्यांनी त्यांना अडचणीत आणणारी वक्तव्ये केली, त्यांना ह्ययोग्यह्ण ती समज देण्याची हिंमतही त्यांच्यात आहे. असे आक्रमक नेतृत्व संघापुढे किती काळ वाकेल आणि आपल्या कार्यवाहीला मर्यादा घालून घेईल, हा यापुढचा प्रश्न आहे. १९७७ पासून चाललेल्या दुहेरी सदस्यत्वाच्या वादाची ही अपरिहार्य परिणती आहे.