शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

तिढा सुटता सुटेना

By admin | Updated: September 17, 2016 04:43 IST

देशातील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरण्याबाबत जो काही तिढा निर्माण झाला आहे, तो लवकर सुटण्याचे तर राहोच पण तो अधिकाधिक गुंतागुंतीचाच होत चालला आहे

देशातील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या रिक्त जागा भरण्याबाबत जो काही तिढा निर्माण झाला आहे, तो लवकर सुटण्याचे तर राहोच पण तो अधिकाधिक गुंतागुंतीचाच होत चालला आहे. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्याचा केन्द्र सरकार आणि संसदेचा मनसुबा सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठाने उधळून लावल्यापासून निर्माण झालेल्या या तिढ्यात उभय पक्ष परस्परांवर आरोप प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानू लागले आहेत. याच मालिकेत आता केन्द्र सरकारने नवा आरोप करताना विलंबाची जबाबदारी देशातील उच्च न्यायालयांवर ढकलली आहे. देशाचे सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांनी अलीकडेच सरकारवर आरोप करताना सरकारने न्यायाधीशांच्या नेमणुका अडकवून ठेवल्याचे म्हटले होते. आता त्या आरोपालाच सरकारने हे उत्तर दिले आहे. उच्च न्यायालयांनी वेळोवेळी त्यांच्याकडील न्यायाधीशांच्या रिकाम्या जागा भरण्यासाठी ज्या शीघ्रतेने हालचाली करणे आवश्यक होते, त्या केल्या गेल्या नाहीत व त्यातूनच आजची अवस्था निर्माण झाल्याचे सरकारने सर्वोच्च न्यायालयाला कळविले आहे. परिणामी सरकारने याबाबत कोणतेही अडवणुकीचे धोरण स्वीकारलेले नाही, असेही सरकारने त्यात म्हटले आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधीश मंडळाने (कॉलेजियम) शिफारस केलेल्या नावांवर येत्या दोन आठवड्यात सरकार आपला अंतिम निर्णय घेईल आणि रिक्त जागा भरल्या जातील अशा शब्दात सरकारने न्यायसंस्थेला आश्वस्तही केले आहे. आजच्या घडीला देशातील उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची जी मंजूर पदे आहेत, त्यापैकी तब्बल ४५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्याचा न्यायव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम घडून येणे सहज स्वाभाविक आहे. जवळजवळ नऊ वर्षांपूर्वी जी पदे रिक्त झाली ती भरण्याची प्रक्रिया संबंधित न्यायालयांनी आत्ताशी कुठे सुरु केली असेही पुराव्यानिशी सरकारने आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. न्यायाधीशांच्या नेमणुका करण्यासाठी जी विशिष्ट रचनात्मक प्रणाली सरकारने तयार करुन सर्वोच्च न्यायालयास सादर करावयाची आहे, त्याबाबतही सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात गंभीर स्वरुपाचे मूलभूत मतभेद आहेत. अर्थात या मतभेदाच्या मुळाशी अंतिम अधिकार कोणाचा असावा, हाच महत्वाचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत आपले अधिकार सोडण्यास किंवा ते जरादेखील पातळ होऊ देण्यास राजी नाही तर त्याचवेळी सरकारला या विषयातील निर्णयाचा अंतिम अधिकार स्वत:पाशी हवा आहे. त्यामुळेच हा वाद जटील होत चालला आहे.