शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

तारेवरची कसरत

By admin | Updated: July 15, 2016 02:00 IST

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचे पद तसे काटेरी मुकुटाचेच असते पण त्याची प्रचिती येणाऱ्या नव्या गव्हर्नराना कार्यालयातील अगदी पहिल्या दिवसापासूनच येऊ शकेल

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचे पद तसे काटेरी मुकुटाचेच असते पण त्याची प्रचिती येणाऱ्या नव्या गव्हर्नराना कार्यालयातील अगदी पहिल्या दिवसापासूनच येऊ शकेल, अशी चिन्हं दिसू लागली आहेत. जून महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांकाची चलनवाढ ५.७७ टक्क्यांवर पोहचली असून गत एप्रिलपासून सातत्याने ती वाढतेच आहे. सामान्यांसाठी हा विषय जरी किचकट असला तरी त्याचा साध्या भाषेतील अर्थ मात्र त्यांची झोप उडविणारा आहे. थोडक्यात सांगायचे तर, अन्नधान्य व भाजीपाल्याची महागाई वाढत आहे आणि ती कमी होण्याची शक्यता दृष्टिपथात नाही. ही बाब सर्वसामान्यांप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचीही झोप उडविणारी आहे. त्यामागील कारण म्हणजे केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यातील एक करार. या करारानुसार, चलनवाढीच्या दराने सहा टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडल्यास, तो दर कमाल मर्यादेच्या आत राखण्यात अपयश का आले, याचे लेखी स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेला द्यावे लागते. चलनवाढीचा दर मर्यादेत राखणे ही तिची जबाबदारी असल्याने, असे लेखी स्पष्टीकरण देण्याची पाळी आल्यास, एकप्रकारे ते बँकेच्या विश्वसनीयतेवर सार्वजनिकरीत्या प्रश्नचिन्ह लागण्यासारखेच ठरते. रिझर्व्ह बँकेचे मावळतीकडे निघालेले गव्हर्नर रघुराम राजन यांनी सप्टेबर २०१३ मध्ये जेव्हां पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हां चलनवाढीचा दोन अंकी होता. राजन यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभरातच तो सहा टक्क्यांच्या आत आला आणि तेव्हापासून सातत्याने तो कमाल मर्यादेच्या आतच होता. आता राजन यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना ग्राहक मूल्य निर्देशांक चलनवाढ पुन्हा एकदा सहा टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे नव्या गव्हर्नरसमोर कारकिर्दीच्या प्रारंभीच मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. त्यातही गोम म्हणजे सरकारला एकाच वेळी विकास दर उच्च व चलनवाढीचा दर खालच्या पातळीवर राखायचा असतो आणि अर्थशास्त्र असे सांगते की, उच्च विकास दर नेहमीच चलनवाढीच्या उच्च दरासोबत येत असतो. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला नेहमीच तारेवरची कसरत करावी लागते. उच्च विकास दरासाठी सरकारचा दबाव असतो; कारण सरकारला उपलब्ध असलेल्या मर्यादित काळात आपली उपलब्धी जनतेसमोर मांडायची असते. राजन यांना ही तारेवरची कसरत जमली होती. नवे गव्हर्नर ती जमवू शकतात की नाही, हे बघणे रंजक ठरणार आहे.