शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

आत्मोद्धारी संस्था

By admin | Updated: September 23, 2016 00:48 IST

समाज आणि देशाच्या विकासात स्वयंसेवी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लोककल्याणासाठीच्या अनेक योजना शासन या संस्थांच्या सहकार्यानेच राबवित असते

समाज आणि देशाच्या विकासात स्वयंसेवी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लोककल्याणासाठीच्या अनेक योजना शासन या संस्थांच्या सहकार्यानेच राबवित असते आणि या कामासाठी त्यांना पुरेसा निधीही उपलब्ध करून दिला जातो. परंतु मागील काही वर्षात स्वयंसेवी संस्थांची वाढलेली अवाढव्य संख्या आणि यापैकी काहींवर होणारे निधीच्या गैरवापराचे आरोप यामुळे समाजसेवेच्या नि:स्वार्थ उद्दिष्टांनाच कुठेतरी गालबोट लागल्याची शंका यावी. अनेक संस्था समाजसेवेच्या पडद्याआड निव्वळ शासकीय निधी लाटण्याचे काम करीत असल्याची गंभीर बाबही निदर्शनास आली असून स्वयंसेवी संस्थांच्या या अनियंत्रित कारभारावर सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. स्वयंसेवी संस्थांची संख्या आणि या प्रश्नाच्या व्याप्तीकडे लक्ष देणारी एखादी नियामक संस्था आहे काय, असा सवाल सरन्यायाधीश तीरथसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान शासनाला विचारला आहे. एवढेच नव्हे तर त्यांना मिळणाऱ्या निधीबाबत पारदर्शकता आणण्यासाठी प्रभावी कायदा असावा, असेही सुचविले आहे. देशात आजमितीस ३० लाख स्वयंसेवी संस्था असून ही संख्या चक्रावून टाकणारी आहे. एकट्या महाराष्ट्रात पाच लाखावर तर आसामात ९७ हजार आणि बिहारात ६१ हजार संस्थांची नोंदणी आहे. गृह मंत्रालयानुसार अशा संस्थांना दर वर्षी १५० देशांकडून १० हजार कोटी रुपये मिळतात. परंतु या निधीचा कुठे व कसा वापर होतो याबाबतची माहिती शासन दरबारी नाही. अनेक संस्थांकडून विदेशी निधी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यावर शासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या वर्षी अशा ६९ संस्थांना काळ्या यादीत टाकून विदेशी निधी स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली तर ३१ हजार संस्थांना आयकर विवरण न भरल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली. काही संस्था देशहिताविरुद्ध कारवायात गुंतल्या असल्याचा गंभीर आरोप गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने शासनाने केल्यानंतर हे सरकारचे दमनतंत्र असल्याचीही टीका झाली होती. पण बहुतांश स्वयंसेवी संस्था या लोकांची सेवा करण्यापेक्षा स्वत:चाच उद्धार करण्यात धन्य मानत असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही. मुळात समाजसेवा हा सुद्धा आता व्यवसाय झाला आहे. या क्षेत्रात रग्गड पैसा असल्याने करिअर म्हणूनही त्याची निवड होऊ लागली आहे. अनेक संस्थांचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच आहेत. अन्यथा या ३० लाख संस्थांनी स्वत:ला प्रामाणिकपणे समाजकार्यात झोकून दिले तर देशाचे चित्र निश्चितच वेगळे आणि सुखावह दिसले असते.