शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

आनंदाचा शोध

By admin | Updated: January 11, 2015 01:57 IST

योग हा असा संस्कार आहे, तो आयुष्यभराची सोबत करणारा आहे. त्यामुळे शालेय आयुष्यात योग विषयाची आवड निर्माण होणे, अत्यंत गरजेचे आहे.

योग हा असा संस्कार आहे, तो आयुष्यभराची सोबत करणारा आहे. त्यामुळे शालेय आयुष्यात योग विषयाची आवड निर्माण होणे, अत्यंत गरजेचे आहे. आपल्या शरीराची आणि मनाची ओळख शालेय जीवनात झाल्यास त्याला कसे वळण द्यायचे हे कळू लागते. हल्लीच्या काळातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे अग्रक्रम अर्थात प्रायोरिटी न ठरवता येणे. कोणत्या गोष्टीला केव्हा, किती महत्त्व द्यायचे हेच कळेनासे होते. एकावेळी अनेक बाबींचा मारा होत असतो. त्यात हे माहिती तंत्रज्ञानाचे युग. त्यामुळे विविध गॅझेट्स आणि डिजिटल माध्यमांमुळे माहितीचा मारा सतत सुरू असतो. त्यात अनेकदा गांगरल्यासारखे होते. मुलांनाही या वातावरणात कसे रोखायचे, सांभाळायचे हे एक आव्हानच असते. पण शालेय जीवनात योगविषयक आवड निर्माण झाल्यास यातील बहुतेक समस्यांवर उत्तरे मिळू शकतील. कशाला अग्रक्रम द्यायचा ही सारासार विवेकबुद्धी योगातून निर्माण होते. विचारांचा गुंता सुटायला मदत मिळते. जे आपण ठरवलेले आहे किंवा आपल्या ज्या मूलभूत क्षमता आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी योगाचे मोठे साहाय्य मिळते. मुलांमधील खरे गुण कोणते आहेत? हे ओळखण्यासाठी हल्ली पालकांना खूप कष्ट पडतात. त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची, समुपदेशकांची मदत घेतली जाते. आपल्या पाल्यांचा कल कोठे आहे? हे शोधणे अनेकांना कर्मकठीण काम वाटते. पर्यायी अनेकदा चुकीच्या वाटा निवडल्या जातात, आणि त्यातून नैराश्य निर्माण होते. योगसाधनेतून ही बाबदेखील सहज सोपी होऊन जाते. लहान मुलांना योगाची आवड लागली म्हणजे त्यांना ज्या गोष्टीत अधिक रस आहे, त्यात ते अधिक समरसून जातात. ज्यात आवड नसेल पण तो अभ्यासक्रमाचा भाग असला तर कर्तव्य भावनेतून ते त्यातही शिकतातच. त्यातून त्यांचा कल ओळखणे खूप सोयीचे जाते. एकाग्रता हादेखील शालेय जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर. आमचा मुलगा-मुलगी खूप हुशार, फक्त त्यांनी मनावर घ्यायला हवे! असे अनेक पालकांकडून सांगितले जाते. मनावर घ्यायला हवे, पण ते घेतले जात नाही कारण एकाग्रता न साधणे खूप कठीण जाते. मन चंचल असल्याने बुद्धीला, शरीराला कष्ट देणाऱ्या बाबी करणे सतत टाळले जाते. त्यासाठी लागणारी शिस्त योगाद्वारे निर्माण होणे शक्य आहे. आपण जी गोष्ट करतोय ती अत्यंत एकाग्रतेने केल्यास त्यात अधिकाधिक रिझल्ट्स मिळतात, यश ओघाने मिळत जाते. मग नावलौकिकासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण यासाठी लागणारा दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी खरी गरज आहे, योगमार्गाद्वारे हे शक्य आहे. लहान मुलांचा मेंदू कोणतेही बदल, नव्या गोष्टी स्वीकारण्यासाठी नेहमी सज्ज असतो. योगसंस्कारांचा सर्वाधिक लाभ कोवळ्या वयात होऊ शकतो, जो त्यांच्यासाठी आयुष्यभराची पुंजी ठरेल. त्यामुळे जिथे जिथे शक्य असेल, तिथे तिथे योगशिक्षणाचा समावेश शालेय जीवनात केल्यास होणारे बदल हे विस्मयकारी असतील, यात शंका नाही. सध्याच्या काळात योगविषय अनिवार्य ठरत असताना त्याची सुरुवात लहान मुलांपासून होण्याची गरज आहे. मुलांना योगशिक्षणापासून रोखू नका. त्यांना मनसोक्त योग शिकू द्या, योग आत्मसात करू द्या. किंबहुना या पिढीबरोबरच पुढची पिढीही योगमाध्यमातून सशक्त, संपन्न होईल. या गुंतवणुकीचा परतावा ६ वर्षांनी किंवा पॉलिसीसारखा २० वर्षांनी नव्हे, तर पदोपदी मिळत राहील; आणि शेवटपर्यंत तो सोबत राहील. शिवाय कैक पटींनी अधिक तो पुढच्या पिढीत संकरित होईल, याची खात्री बाळगा. योग शिकताना लहान मुलांची निरागस बुद्धी नवा विषय आत्मसात करण्यासाठी सदैव तयार असते. त्यांना गरज असते ती योग्य योगशिक्षण देण्याची.