शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

विठोबाच्या जिद्दीला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 03:04 IST

दुष्काळामुळे बैलजोडी विकावी लागली तरी हिंमत न हारता विठोबा मांडोळे या शेतकऱ्याने लोखंडी खाटेने तीन एकर शेतात सऱ्या पाडून दोन एकरात कापसाची लागवडदेखील केली.

- मिलिंद कुलकर्णीदुष्काळामुळे बैलजोडी विकावी लागली तरी हिंमत न हारता विठोबा मांडोळे या शेतकऱ्याने लोखंडी खाटेने तीन एकर शेतात सऱ्या पाडून दोन एकरात कापसाची लागवडदेखील केली. कुढत न बसता संकटावार मात करण्याची किमया विठोबाने साधली..दुष्काळाने आर्थिक कणा मोडला असतानाही संकटावर मात करीत उभारी घेणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुकच्या विठोबा मांडोळे याने संकटात असलेल्या बळीराजाला मोठी हिंमत दिली आहे. दोन वर्षांपासून खान्देशात दुष्काळी स्थिती आहे. हंगाम जेमतेम येतो. पाणी टंचाईने खेड्यातील स्थिती बिकट आहे. त्याचा फटका खडकी बुद्रुकच्या विठोबासह अनेक शेतकऱ्यांना बसला. काहींनी आत्महत्त्येचा मार्ग स्वीकारला. मात्र विठोबासारखे काही शेतकरी संकटावर मात करीत पुन्हा उभे ठाकले आहेत. विठोबा हा खरा शेतमजूर. कष्टाने मजुरी करताना त्याने स्वत: शेती करण्याचे धाडस केले. सात वर्षांपूर्वी त्याने गावातील शेतकऱ्याचे तीन एकर शेत कसायला घेतले. बायको, दोन मुलांसह विठोबाने केलेल्या कष्टाला फळ येऊ लागले. छोटं घर बांधलं. बैलजोडी घेतली. पण शेती किती बेभरवशाचा व्यवसाय आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. दोन वर्षांच्या दुष्काळाने विठोबाचे आर्थिक गणित बिघडवून टाकले. गेल्या वर्षी पाणी व चारा टंचाईमुळे त्यांना बैलजोडी विकावी लागली. मोठा मुलगा बांधकामावर सेंट्रींगचे काम करीत असल्याने त्याचा संसाराला हातभार लागतो. दुसरा मुलगा बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला, त्याचं पुढील शिक्षण थांबविण्याचा कटू निर्णय विठोबा आणि त्याच्या कुटुंबियांनी घेतला. यंदा खरीपाच्या तयारीच्या वेळी शिल्लक पुंजीतून बियाणे घेतले. तरी बैलजोडी, औतासाठी पैशांची व्यवस्था काही होईना. हंगाम तोंडावर आला असल्याने सगळ्यांची लगबग सुरु झाली होती. पैशांची व्यवस्था होण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर विठोबाने लोखंडी खाटेने सऱ्या पाडायला (शेत आखणे) सुरुवात केली. तीन एकर शेतात सऱ्या पाडून दोन एकरात त्याने कापसाची लागवडदेखील केली. उणीवा, अभावामुळे कुढत बसण्यापेक्षा त्याच्यावर मात करण्याची विठोबाने साधलेली किमया कर्णोपकर्णी पंचक्रोशीत पसरली. विठोबाला अर्थ सहाय्यासाठी समाज पुढे सरसावला. आमदार उन्मेष पाटील यांनी खडकी येथे जाऊन विठोबाच्या जिद्दीला दाद दिली. बियाणे, कीटकनाशके आणि खते उपलब्ध करुन दिली. चाळीसगावच्या डॉ.विनोद कोतकर दाम्पत्याच्या आई फाऊंडेशनने मुलाच्या आयटीआय प्रवेशाची जबाबदारी घेतली. शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आणि विठोबाला मदत करु लागल्या आहेत. समाजाने विठोबाच्या जिद्दीची संवेदनशीलतेने दखल घेतली. मदतीचा ओघ सुरु झाला. यातून विठोबाने बळीराजाला सकारात्मक संदेश दिला. परिस्थितीपुढे शरण जाण्यापेक्षा तिच्याशी दोन हात करा. क्षमता सिध्द करा म्हणजे समाज स्वत:हून मदतीला पुढे येतो. मदतीसाठी हात पसरण्यापेक्षा सरी ओढण्यासाठी खाट ओढणाऱ्या विठोबाच्या हातांनी संकटातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने मात्र विठोबाला मदतीचा हात देण्याऐवजी त्याच्या ‘शेतकरी’ असण्यावर प्रश्नचिन्ह लावले. कारण काय तर त्याच्या नावे शेती नाही, सातबारा, खाते उतारा नसल्याने तो शेतकरी नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईला तो पात्र नसल्याचा नियम कृषी विभागाने दाखविला. माणसांसाठी नियम आहे, नियमासाठी माणूस नाही हे विसरले जात असल्याने विठोबाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार होत असावा. विठोबाची विलक्षण जिद्द प्रसारमाध्यमांमुळे जगभर पोहोचली. सामाजिक संस्था, कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचले. काहींनी त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी बोलावलं, कुणी सत्कारासाठी बोलावले. तरीही विठोबा शेतीवाडी सोडून कुठेही जायला तयार झाला नाही. घर-शेती सोडून मी कुठे येणार नाही, आता दोघांना माझी गरज आहे, ही त्याची भूमिका खूप काही सांगून जाणारी आहे.