शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

संतसंगे मानस निश्चळ

By admin | Updated: November 6, 2015 02:48 IST

संसारिक माणूस म्हटला की त्याच्याकडे ईर्षा, व्देष, स्वार्थ, मत्सर, अहंकार, द्वैत आदी विकारांना किंवा त्यापैकी काहीना थोड्याफार प्रमाणात का होईना किंवा प्रसंगानुरूप का होईना स्थान असते.

- डॉ. वि. पं. फड

संसारिक माणूस म्हटला की त्याच्याकडे ईर्षा, व्देष, स्वार्थ, मत्सर, अहंकार, द्वैत आदी विकारांना किंवा त्यापैकी काहीना थोड्याफार प्रमाणात का होईना किंवा प्रसंगानुरूप का होईना स्थान असते. ज्या व्यक्तीकडे यापैकी कशालाही स्थान नसते, तिच्याकडे आनंदाला उणीव असत नाही. अशा लोकाना संसारातले संन्याशी म्हणणे योग्य होईल असे आम्हास वाटते. खरे म्हणजे हे अवघड आहे. असे असले तरीही काही लोक असे असू शकतात. असो.ईर्षा, व्देष, स्वार्थ, मत्सर, अहंकार, द्वैतादी विकारांना पुरेसे किंवा थोडेफार स्थान देणारा माणूस स्वत:ला आनंदी, भाग्यशाली, शक्तीशाली समजत असला तरी असे लोकही कधी ना कधी दु:खी झाल्याशिवाय राहत नाहीत. चुकीच्या वर्तनामुळे एकीकडे एखाद्यावर अन्याय होतो आणि दुसरीकडे चूक करणाऱ्यांचे पाप वाढते. काहींना त्यांच्या इच्छेविरूध्द थोडेसे जरी काही घडले किंवा अपेक्षेचा भंग झाला की लगेच त्रास सुरू होतो. काही लोक केवळ अवास्तव कल्पना करून, असे होईल का, तसे होईल का, असे झाले तर, असे नाही झाले तर, तसे झाले तर, तसे नाही झाले तर, अशा कल्पनेनेच दु:खी वा त्रस्त होतात. काही लोकांकडे भौतिक सुख साधनांच्या उपलब्धतेसोबतच मानसिक दारिद्र्याचीही रेलचेल असते.अर्थात, काही लोक भरपूर उपलब्ध असूनही दु:खी तर काहींकडे काहीच नसते म्हणून दु:खी असतात. थोडक्यात, काही मोजके लोक सोडले तर मोठ्या प्रमाणावर लोक दु:खी, त्रस्त, अशांत आहेत. या अशांतीवर, पापावर, तापावर, अवास्तव आशा अपेक्षा, व्यर्थ कल्पना आदींवर, विकारांवर रामबाण उपाय म्हणजे संतांची संगत होय. संत संगतीत गेल्याने काय होते, हे सांगतांना संत निळोबाराय म्हणतात, संतसंगे हरे पाप। संतसंगे निरसे ताप।संतसंगे निर्विकल्प।होय मानस निश्चळ।संतांची संगत करण्यासाठी संत ओळखता आला पाहिजे. केवळ पेहराव पाहून किंवा काही लोक एखाद्याला संत मानतात म्हणून आपणही मानायचे, असे केले तर एखाद्या वेळी दु:ख कमी होण्याऐवजी दु:ख वाढू शकते. म्हणून केवळ लोक एखाद्याला संत म्हणत आहेत म्हणून आपणही संत म्हणून त्यांच्याकडे धाव घ्यावी असे नाही. संतांना पेहरावापेक्षा किंवा लोकांच्या म्हणण्यापेक्षा त्यांच्या वर्तनातून ओळखावे. ही ओळख व अशांची संगत निश्चितच आपल्या मनाला चुकीच्या विचारातून बाहेर काढून निश्चळ बनविण्यास मदत करेल. मन निश्चळ झाले तर आनंदाला वेगळ्याने शोधावे लागणार नाही. जय जय राम कृष्ण हरी।।