शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

संतसंगे मानस निश्चळ

By admin | Updated: November 6, 2015 02:48 IST

संसारिक माणूस म्हटला की त्याच्याकडे ईर्षा, व्देष, स्वार्थ, मत्सर, अहंकार, द्वैत आदी विकारांना किंवा त्यापैकी काहीना थोड्याफार प्रमाणात का होईना किंवा प्रसंगानुरूप का होईना स्थान असते.

- डॉ. वि. पं. फड

संसारिक माणूस म्हटला की त्याच्याकडे ईर्षा, व्देष, स्वार्थ, मत्सर, अहंकार, द्वैत आदी विकारांना किंवा त्यापैकी काहीना थोड्याफार प्रमाणात का होईना किंवा प्रसंगानुरूप का होईना स्थान असते. ज्या व्यक्तीकडे यापैकी कशालाही स्थान नसते, तिच्याकडे आनंदाला उणीव असत नाही. अशा लोकाना संसारातले संन्याशी म्हणणे योग्य होईल असे आम्हास वाटते. खरे म्हणजे हे अवघड आहे. असे असले तरीही काही लोक असे असू शकतात. असो.ईर्षा, व्देष, स्वार्थ, मत्सर, अहंकार, द्वैतादी विकारांना पुरेसे किंवा थोडेफार स्थान देणारा माणूस स्वत:ला आनंदी, भाग्यशाली, शक्तीशाली समजत असला तरी असे लोकही कधी ना कधी दु:खी झाल्याशिवाय राहत नाहीत. चुकीच्या वर्तनामुळे एकीकडे एखाद्यावर अन्याय होतो आणि दुसरीकडे चूक करणाऱ्यांचे पाप वाढते. काहींना त्यांच्या इच्छेविरूध्द थोडेसे जरी काही घडले किंवा अपेक्षेचा भंग झाला की लगेच त्रास सुरू होतो. काही लोक केवळ अवास्तव कल्पना करून, असे होईल का, तसे होईल का, असे झाले तर, असे नाही झाले तर, तसे झाले तर, तसे नाही झाले तर, अशा कल्पनेनेच दु:खी वा त्रस्त होतात. काही लोकांकडे भौतिक सुख साधनांच्या उपलब्धतेसोबतच मानसिक दारिद्र्याचीही रेलचेल असते.अर्थात, काही लोक भरपूर उपलब्ध असूनही दु:खी तर काहींकडे काहीच नसते म्हणून दु:खी असतात. थोडक्यात, काही मोजके लोक सोडले तर मोठ्या प्रमाणावर लोक दु:खी, त्रस्त, अशांत आहेत. या अशांतीवर, पापावर, तापावर, अवास्तव आशा अपेक्षा, व्यर्थ कल्पना आदींवर, विकारांवर रामबाण उपाय म्हणजे संतांची संगत होय. संत संगतीत गेल्याने काय होते, हे सांगतांना संत निळोबाराय म्हणतात, संतसंगे हरे पाप। संतसंगे निरसे ताप।संतसंगे निर्विकल्प।होय मानस निश्चळ।संतांची संगत करण्यासाठी संत ओळखता आला पाहिजे. केवळ पेहराव पाहून किंवा काही लोक एखाद्याला संत मानतात म्हणून आपणही मानायचे, असे केले तर एखाद्या वेळी दु:ख कमी होण्याऐवजी दु:ख वाढू शकते. म्हणून केवळ लोक एखाद्याला संत म्हणत आहेत म्हणून आपणही संत म्हणून त्यांच्याकडे धाव घ्यावी असे नाही. संतांना पेहरावापेक्षा किंवा लोकांच्या म्हणण्यापेक्षा त्यांच्या वर्तनातून ओळखावे. ही ओळख व अशांची संगत निश्चितच आपल्या मनाला चुकीच्या विचारातून बाहेर काढून निश्चळ बनविण्यास मदत करेल. मन निश्चळ झाले तर आनंदाला वेगळ्याने शोधावे लागणार नाही. जय जय राम कृष्ण हरी।।