शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

संतसंगे मानस निश्चळ

By admin | Updated: November 6, 2015 02:48 IST

संसारिक माणूस म्हटला की त्याच्याकडे ईर्षा, व्देष, स्वार्थ, मत्सर, अहंकार, द्वैत आदी विकारांना किंवा त्यापैकी काहीना थोड्याफार प्रमाणात का होईना किंवा प्रसंगानुरूप का होईना स्थान असते.

- डॉ. वि. पं. फड

संसारिक माणूस म्हटला की त्याच्याकडे ईर्षा, व्देष, स्वार्थ, मत्सर, अहंकार, द्वैत आदी विकारांना किंवा त्यापैकी काहीना थोड्याफार प्रमाणात का होईना किंवा प्रसंगानुरूप का होईना स्थान असते. ज्या व्यक्तीकडे यापैकी कशालाही स्थान नसते, तिच्याकडे आनंदाला उणीव असत नाही. अशा लोकाना संसारातले संन्याशी म्हणणे योग्य होईल असे आम्हास वाटते. खरे म्हणजे हे अवघड आहे. असे असले तरीही काही लोक असे असू शकतात. असो.ईर्षा, व्देष, स्वार्थ, मत्सर, अहंकार, द्वैतादी विकारांना पुरेसे किंवा थोडेफार स्थान देणारा माणूस स्वत:ला आनंदी, भाग्यशाली, शक्तीशाली समजत असला तरी असे लोकही कधी ना कधी दु:खी झाल्याशिवाय राहत नाहीत. चुकीच्या वर्तनामुळे एकीकडे एखाद्यावर अन्याय होतो आणि दुसरीकडे चूक करणाऱ्यांचे पाप वाढते. काहींना त्यांच्या इच्छेविरूध्द थोडेसे जरी काही घडले किंवा अपेक्षेचा भंग झाला की लगेच त्रास सुरू होतो. काही लोक केवळ अवास्तव कल्पना करून, असे होईल का, तसे होईल का, असे झाले तर, असे नाही झाले तर, तसे झाले तर, तसे नाही झाले तर, अशा कल्पनेनेच दु:खी वा त्रस्त होतात. काही लोकांकडे भौतिक सुख साधनांच्या उपलब्धतेसोबतच मानसिक दारिद्र्याचीही रेलचेल असते.अर्थात, काही लोक भरपूर उपलब्ध असूनही दु:खी तर काहींकडे काहीच नसते म्हणून दु:खी असतात. थोडक्यात, काही मोजके लोक सोडले तर मोठ्या प्रमाणावर लोक दु:खी, त्रस्त, अशांत आहेत. या अशांतीवर, पापावर, तापावर, अवास्तव आशा अपेक्षा, व्यर्थ कल्पना आदींवर, विकारांवर रामबाण उपाय म्हणजे संतांची संगत होय. संत संगतीत गेल्याने काय होते, हे सांगतांना संत निळोबाराय म्हणतात, संतसंगे हरे पाप। संतसंगे निरसे ताप।संतसंगे निर्विकल्प।होय मानस निश्चळ।संतांची संगत करण्यासाठी संत ओळखता आला पाहिजे. केवळ पेहराव पाहून किंवा काही लोक एखाद्याला संत मानतात म्हणून आपणही मानायचे, असे केले तर एखाद्या वेळी दु:ख कमी होण्याऐवजी दु:ख वाढू शकते. म्हणून केवळ लोक एखाद्याला संत म्हणत आहेत म्हणून आपणही संत म्हणून त्यांच्याकडे धाव घ्यावी असे नाही. संतांना पेहरावापेक्षा किंवा लोकांच्या म्हणण्यापेक्षा त्यांच्या वर्तनातून ओळखावे. ही ओळख व अशांची संगत निश्चितच आपल्या मनाला चुकीच्या विचारातून बाहेर काढून निश्चळ बनविण्यास मदत करेल. मन निश्चळ झाले तर आनंदाला वेगळ्याने शोधावे लागणार नाही. जय जय राम कृष्ण हरी।।