शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सव्यसाची, अवलिया पत्रकाराची अकाली एक्झिट

By admin | Updated: February 3, 2017 06:56 IST

पांढरा शुभ्र शर्ट, तेवढीच स्वच्छ पांढरी पॅन्ट, काखेत लेदरचा पाऊच, त्यात पान, सुपारी, चुना, कात असा सारा जामानिमा ! जणू तो बातमी रंगवण्याआधीच. स्वत:च्या मनासारखा विडा रंगला

- दिनकर रायकर(समूह संपादक, लोकमत)पांढरा शुभ्र शर्ट, तेवढीच स्वच्छ पांढरी पॅन्ट, काखेत लेदरचा पाऊच, त्यात पान, सुपारी, चुना, कात असा सारा जामानिमा ! जणू तो बातमी रंगवण्याआधीच. स्वत:च्या मनासारखा विडा रंगला की त्यांच्या लेखणीला बहार येत असे. त्यांचा हा रोजचा नित्यक्रम. मी इंडियन एक्स्प्रेसमध्ये आणि ते लोकसत्तामध्ये. हेमंत कुलकर्णी नावाच्या अजब रसायनाची माझी पहिली भेट तिथेच झाली. त्याला आज ४०वर्षे झाली. त्यांनी लिहिलेली कॉपी अशी काही चपखल असायची, की त्यात मोठ्या मुश्किलीने चूक निघायची. काना, उकार, मात्रेसह शुद्ध, कसलीही भेसळ नसणारी कॉपी हे त्यांचे बलस्थान! विद्याधर गोखलेंच्या काळात त्यांनी रविवार पुरवणीचे काम पाहिले. पण ते काही वर्षेच मुंबईत रमले. नंतर लोकसत्ताची नोकरी सोडून डेअरी काढायची, म्हणून नाशिकला गेले ते कायमचे. पण पत्रकारिता त्यांना शांत बसू देत नसावी. तेथून त्यांनी अर्धवेळ पत्रकार म्हणून काम सुरूकेले. नाशिक सोडायचे नाही, हा हट्ट कायम होता. पण माधव गडकरींच्या आग्रहाखातर त्यांनी नाशकातूनच लोकसत्तासाठी पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली.गडकरींच्या नंतर अरुण टिकेकरांच्या काळातही ते तेथे होते. टिकेकर लोकमतमध्ये मुख्य संपादक म्हणून आले, तसे हेमंतरावही त्यांच्या आग्रहाखातर लोकमतमध्ये आले. साधारण २००३ची ही गोष्ट. त्याआधी एकच वर्ष मी औरंगाबाद लोकमतला संपादक म्हणून काम सुरू केले होते. औरंगाबादला २००४ साली रा.ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावर कठोर भाष्य करणारा अग्रलेख हेमंतरावांनी लिहिला. लोकमतमध्ये त्यांनी लिहिलेला तो पहिला अग्रलेख. विजया राजाध्यक्ष यांना २९ जानेवारी २०१७ रोजी जाहीर झालेल्या ‘जनस्थान’ पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी लोकमतमध्येच लिहिलेले भाष्य हे त्यांचे शेवटचे लिखाण. एखाद्या संपादकाने त्याच्या कारकिर्दीत काम करताना एकाच दैनिकातील कामाची सुरुवात आणि शेवट अशा प्र्रकारे साहित्यिक लेखनाने करण्याचा हा अपूर्व योगायोग आता कायमच्या हेमंतरावच्या नावावर जमा झाला.मराठी आणि इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व असणारे हेमंतराव हाडाचे पत्रकार होते. आपल्याच आनंदात जगणे, आपल्याच टेचात जे वाटते, जे पटते ते परखडपणे लिहिणे हा त्यांचा स्थायीभाव. त्यासाठी त्यांनी कधीही, कोणतीही तडजोड केली नाही किंवा कसल्या आमिषालाही ते कधी बळी पडले नाहीत. हेमंतरावांना गृहीत धरणारी व्यक्ती मला कधीही कोणत्याही क्षेत्रात आजपर्यंत सापडलेली नाही. यावरून त्यांचा स्वभाव लक्षात यावा.ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकरांशी त्यांचा पत्रव्यवहार व स्नेह कायम होता. तर कविश्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना अवघा महाराष्ट्र प्रेमाने तात्या म्हणायचा. पण त्यांना ‘तात्याराव’ असे म्हणणारी, लिहिणारी एकमेव व्यक्ती म्हणजे हेमंतराव. तात्यांच्या नावाने नंतर नाशकात कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन झाले. त्यात कोणी थोडेही इकडे तिकडे काही केले की हेमंतरावांनी तलवार उपसलीच समजा. इतका त्यांचा तात्यांवर स्नेह होता. विजया राजाध्यक्षांना जनस्थान पुरस्कार जाहीर होईपर्यंत तो कायम राहिला.आधी आवडीने पान खाणारे हेमंतराव नंतर सुपारी तंबाखू खाऊ लागले. स्वत:चा धार लावलेला आडकित्ता, त्यात सुपारी पकडून ती अगदी बारीक कापून डबीत भरून ठेवायची, तंबाखूची वेगळी डबी, हे सारे अत्यंत नेटकेपणाने एका लेदरच्या पाऊचमध्ये त्यांच्या सोबत कायम असायचे. अनेकदा त्यावरून त्यांना टोकले तरी, जाऊद्या राव... असे म्हणत ते पुन्हा तेवढ्याच आत्मीयतेने सुपारीला आडकित्यात धरायचे.लोकमतमध्ये आल्यानंतर आम्हा दोघांचा खूप जवळचा संबंध आला. सटायर लिखाण हा त्यांच्या अत्यंत आवडीचा प्रकार होता. अनेक विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण पण तिरकस शैलीत त्यांनी केलेले लिखाण ज्याच्यावर असायचे त्याला ते बोचायचे आणि आतून गुदगुल्याही करायचे. अनेकदा ते खूप झोंबायचे. असे नेते मला फोन करून हेमंतरावांना आवरा, असे विनवायचे. मी त्यावरून काही विचारले की मलाच ते तिकडून मिश्कील हसत विचारायचे... ‘आला होता ना त्याचा फोन? आणखी थोडं ठोकू का उद्या.’ मग पुन्हा मिश्कीलपणे हास्य.अत्यंत अजब असे हे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना एखाद्या विषयावर लिखाण मागितले आणि ते त्यांनी तासाभराच्या आत अत्यंत अचूकपणे दिले नाही, असे कधीही झाले नाही. हा त्यांचा गुण हेरून गेल्यावर्षी त्यांना ग्रुप असोसिएट एडिटर केले गेले. संपादकीय पानाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. रोज सायंकाळी सहाच्या दरम्यान संपादकीय पान माझ्याकडे यायचे. त्याच पानावर त्यांच्यावर लिहिण्याची वेळ माझ्यावर येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. आताही वाटते की त्यांचा फोन येईल आणि संपादकीय पान टाकले आहे, असा निरोप देतील..!