शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

सव्यसाची, अवलिया पत्रकाराची अकाली एक्झिट

By admin | Updated: February 3, 2017 06:56 IST

पांढरा शुभ्र शर्ट, तेवढीच स्वच्छ पांढरी पॅन्ट, काखेत लेदरचा पाऊच, त्यात पान, सुपारी, चुना, कात असा सारा जामानिमा ! जणू तो बातमी रंगवण्याआधीच. स्वत:च्या मनासारखा विडा रंगला

- दिनकर रायकर(समूह संपादक, लोकमत)पांढरा शुभ्र शर्ट, तेवढीच स्वच्छ पांढरी पॅन्ट, काखेत लेदरचा पाऊच, त्यात पान, सुपारी, चुना, कात असा सारा जामानिमा ! जणू तो बातमी रंगवण्याआधीच. स्वत:च्या मनासारखा विडा रंगला की त्यांच्या लेखणीला बहार येत असे. त्यांचा हा रोजचा नित्यक्रम. मी इंडियन एक्स्प्रेसमध्ये आणि ते लोकसत्तामध्ये. हेमंत कुलकर्णी नावाच्या अजब रसायनाची माझी पहिली भेट तिथेच झाली. त्याला आज ४०वर्षे झाली. त्यांनी लिहिलेली कॉपी अशी काही चपखल असायची, की त्यात मोठ्या मुश्किलीने चूक निघायची. काना, उकार, मात्रेसह शुद्ध, कसलीही भेसळ नसणारी कॉपी हे त्यांचे बलस्थान! विद्याधर गोखलेंच्या काळात त्यांनी रविवार पुरवणीचे काम पाहिले. पण ते काही वर्षेच मुंबईत रमले. नंतर लोकसत्ताची नोकरी सोडून डेअरी काढायची, म्हणून नाशिकला गेले ते कायमचे. पण पत्रकारिता त्यांना शांत बसू देत नसावी. तेथून त्यांनी अर्धवेळ पत्रकार म्हणून काम सुरूकेले. नाशिक सोडायचे नाही, हा हट्ट कायम होता. पण माधव गडकरींच्या आग्रहाखातर त्यांनी नाशकातूनच लोकसत्तासाठी पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली.गडकरींच्या नंतर अरुण टिकेकरांच्या काळातही ते तेथे होते. टिकेकर लोकमतमध्ये मुख्य संपादक म्हणून आले, तसे हेमंतरावही त्यांच्या आग्रहाखातर लोकमतमध्ये आले. साधारण २००३ची ही गोष्ट. त्याआधी एकच वर्ष मी औरंगाबाद लोकमतला संपादक म्हणून काम सुरू केले होते. औरंगाबादला २००४ साली रा.ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावर कठोर भाष्य करणारा अग्रलेख हेमंतरावांनी लिहिला. लोकमतमध्ये त्यांनी लिहिलेला तो पहिला अग्रलेख. विजया राजाध्यक्ष यांना २९ जानेवारी २०१७ रोजी जाहीर झालेल्या ‘जनस्थान’ पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी लोकमतमध्येच लिहिलेले भाष्य हे त्यांचे शेवटचे लिखाण. एखाद्या संपादकाने त्याच्या कारकिर्दीत काम करताना एकाच दैनिकातील कामाची सुरुवात आणि शेवट अशा प्र्रकारे साहित्यिक लेखनाने करण्याचा हा अपूर्व योगायोग आता कायमच्या हेमंतरावच्या नावावर जमा झाला.मराठी आणि इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व असणारे हेमंतराव हाडाचे पत्रकार होते. आपल्याच आनंदात जगणे, आपल्याच टेचात जे वाटते, जे पटते ते परखडपणे लिहिणे हा त्यांचा स्थायीभाव. त्यासाठी त्यांनी कधीही, कोणतीही तडजोड केली नाही किंवा कसल्या आमिषालाही ते कधी बळी पडले नाहीत. हेमंतरावांना गृहीत धरणारी व्यक्ती मला कधीही कोणत्याही क्षेत्रात आजपर्यंत सापडलेली नाही. यावरून त्यांचा स्वभाव लक्षात यावा.ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकरांशी त्यांचा पत्रव्यवहार व स्नेह कायम होता. तर कविश्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना अवघा महाराष्ट्र प्रेमाने तात्या म्हणायचा. पण त्यांना ‘तात्याराव’ असे म्हणणारी, लिहिणारी एकमेव व्यक्ती म्हणजे हेमंतराव. तात्यांच्या नावाने नंतर नाशकात कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन झाले. त्यात कोणी थोडेही इकडे तिकडे काही केले की हेमंतरावांनी तलवार उपसलीच समजा. इतका त्यांचा तात्यांवर स्नेह होता. विजया राजाध्यक्षांना जनस्थान पुरस्कार जाहीर होईपर्यंत तो कायम राहिला.आधी आवडीने पान खाणारे हेमंतराव नंतर सुपारी तंबाखू खाऊ लागले. स्वत:चा धार लावलेला आडकित्ता, त्यात सुपारी पकडून ती अगदी बारीक कापून डबीत भरून ठेवायची, तंबाखूची वेगळी डबी, हे सारे अत्यंत नेटकेपणाने एका लेदरच्या पाऊचमध्ये त्यांच्या सोबत कायम असायचे. अनेकदा त्यावरून त्यांना टोकले तरी, जाऊद्या राव... असे म्हणत ते पुन्हा तेवढ्याच आत्मीयतेने सुपारीला आडकित्यात धरायचे.लोकमतमध्ये आल्यानंतर आम्हा दोघांचा खूप जवळचा संबंध आला. सटायर लिखाण हा त्यांच्या अत्यंत आवडीचा प्रकार होता. अनेक विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण पण तिरकस शैलीत त्यांनी केलेले लिखाण ज्याच्यावर असायचे त्याला ते बोचायचे आणि आतून गुदगुल्याही करायचे. अनेकदा ते खूप झोंबायचे. असे नेते मला फोन करून हेमंतरावांना आवरा, असे विनवायचे. मी त्यावरून काही विचारले की मलाच ते तिकडून मिश्कील हसत विचारायचे... ‘आला होता ना त्याचा फोन? आणखी थोडं ठोकू का उद्या.’ मग पुन्हा मिश्कीलपणे हास्य.अत्यंत अजब असे हे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना एखाद्या विषयावर लिखाण मागितले आणि ते त्यांनी तासाभराच्या आत अत्यंत अचूकपणे दिले नाही, असे कधीही झाले नाही. हा त्यांचा गुण हेरून गेल्यावर्षी त्यांना ग्रुप असोसिएट एडिटर केले गेले. संपादकीय पानाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. रोज सायंकाळी सहाच्या दरम्यान संपादकीय पान माझ्याकडे यायचे. त्याच पानावर त्यांच्यावर लिहिण्याची वेळ माझ्यावर येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. आताही वाटते की त्यांचा फोन येईल आणि संपादकीय पान टाकले आहे, असा निरोप देतील..!