शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

सव्यसाची, अवलिया पत्रकाराची अकाली एक्झिट

By admin | Updated: February 3, 2017 06:56 IST

पांढरा शुभ्र शर्ट, तेवढीच स्वच्छ पांढरी पॅन्ट, काखेत लेदरचा पाऊच, त्यात पान, सुपारी, चुना, कात असा सारा जामानिमा ! जणू तो बातमी रंगवण्याआधीच. स्वत:च्या मनासारखा विडा रंगला

- दिनकर रायकर(समूह संपादक, लोकमत)पांढरा शुभ्र शर्ट, तेवढीच स्वच्छ पांढरी पॅन्ट, काखेत लेदरचा पाऊच, त्यात पान, सुपारी, चुना, कात असा सारा जामानिमा ! जणू तो बातमी रंगवण्याआधीच. स्वत:च्या मनासारखा विडा रंगला की त्यांच्या लेखणीला बहार येत असे. त्यांचा हा रोजचा नित्यक्रम. मी इंडियन एक्स्प्रेसमध्ये आणि ते लोकसत्तामध्ये. हेमंत कुलकर्णी नावाच्या अजब रसायनाची माझी पहिली भेट तिथेच झाली. त्याला आज ४०वर्षे झाली. त्यांनी लिहिलेली कॉपी अशी काही चपखल असायची, की त्यात मोठ्या मुश्किलीने चूक निघायची. काना, उकार, मात्रेसह शुद्ध, कसलीही भेसळ नसणारी कॉपी हे त्यांचे बलस्थान! विद्याधर गोखलेंच्या काळात त्यांनी रविवार पुरवणीचे काम पाहिले. पण ते काही वर्षेच मुंबईत रमले. नंतर लोकसत्ताची नोकरी सोडून डेअरी काढायची, म्हणून नाशिकला गेले ते कायमचे. पण पत्रकारिता त्यांना शांत बसू देत नसावी. तेथून त्यांनी अर्धवेळ पत्रकार म्हणून काम सुरूकेले. नाशिक सोडायचे नाही, हा हट्ट कायम होता. पण माधव गडकरींच्या आग्रहाखातर त्यांनी नाशकातूनच लोकसत्तासाठी पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली.गडकरींच्या नंतर अरुण टिकेकरांच्या काळातही ते तेथे होते. टिकेकर लोकमतमध्ये मुख्य संपादक म्हणून आले, तसे हेमंतरावही त्यांच्या आग्रहाखातर लोकमतमध्ये आले. साधारण २००३ची ही गोष्ट. त्याआधी एकच वर्ष मी औरंगाबाद लोकमतला संपादक म्हणून काम सुरू केले होते. औरंगाबादला २००४ साली रा.ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावर कठोर भाष्य करणारा अग्रलेख हेमंतरावांनी लिहिला. लोकमतमध्ये त्यांनी लिहिलेला तो पहिला अग्रलेख. विजया राजाध्यक्ष यांना २९ जानेवारी २०१७ रोजी जाहीर झालेल्या ‘जनस्थान’ पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी लोकमतमध्येच लिहिलेले भाष्य हे त्यांचे शेवटचे लिखाण. एखाद्या संपादकाने त्याच्या कारकिर्दीत काम करताना एकाच दैनिकातील कामाची सुरुवात आणि शेवट अशा प्र्रकारे साहित्यिक लेखनाने करण्याचा हा अपूर्व योगायोग आता कायमच्या हेमंतरावच्या नावावर जमा झाला.मराठी आणि इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व असणारे हेमंतराव हाडाचे पत्रकार होते. आपल्याच आनंदात जगणे, आपल्याच टेचात जे वाटते, जे पटते ते परखडपणे लिहिणे हा त्यांचा स्थायीभाव. त्यासाठी त्यांनी कधीही, कोणतीही तडजोड केली नाही किंवा कसल्या आमिषालाही ते कधी बळी पडले नाहीत. हेमंतरावांना गृहीत धरणारी व्यक्ती मला कधीही कोणत्याही क्षेत्रात आजपर्यंत सापडलेली नाही. यावरून त्यांचा स्वभाव लक्षात यावा.ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकरांशी त्यांचा पत्रव्यवहार व स्नेह कायम होता. तर कविश्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना अवघा महाराष्ट्र प्रेमाने तात्या म्हणायचा. पण त्यांना ‘तात्याराव’ असे म्हणणारी, लिहिणारी एकमेव व्यक्ती म्हणजे हेमंतराव. तात्यांच्या नावाने नंतर नाशकात कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन झाले. त्यात कोणी थोडेही इकडे तिकडे काही केले की हेमंतरावांनी तलवार उपसलीच समजा. इतका त्यांचा तात्यांवर स्नेह होता. विजया राजाध्यक्षांना जनस्थान पुरस्कार जाहीर होईपर्यंत तो कायम राहिला.आधी आवडीने पान खाणारे हेमंतराव नंतर सुपारी तंबाखू खाऊ लागले. स्वत:चा धार लावलेला आडकित्ता, त्यात सुपारी पकडून ती अगदी बारीक कापून डबीत भरून ठेवायची, तंबाखूची वेगळी डबी, हे सारे अत्यंत नेटकेपणाने एका लेदरच्या पाऊचमध्ये त्यांच्या सोबत कायम असायचे. अनेकदा त्यावरून त्यांना टोकले तरी, जाऊद्या राव... असे म्हणत ते पुन्हा तेवढ्याच आत्मीयतेने सुपारीला आडकित्यात धरायचे.लोकमतमध्ये आल्यानंतर आम्हा दोघांचा खूप जवळचा संबंध आला. सटायर लिखाण हा त्यांच्या अत्यंत आवडीचा प्रकार होता. अनेक विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण पण तिरकस शैलीत त्यांनी केलेले लिखाण ज्याच्यावर असायचे त्याला ते बोचायचे आणि आतून गुदगुल्याही करायचे. अनेकदा ते खूप झोंबायचे. असे नेते मला फोन करून हेमंतरावांना आवरा, असे विनवायचे. मी त्यावरून काही विचारले की मलाच ते तिकडून मिश्कील हसत विचारायचे... ‘आला होता ना त्याचा फोन? आणखी थोडं ठोकू का उद्या.’ मग पुन्हा मिश्कीलपणे हास्य.अत्यंत अजब असे हे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना एखाद्या विषयावर लिखाण मागितले आणि ते त्यांनी तासाभराच्या आत अत्यंत अचूकपणे दिले नाही, असे कधीही झाले नाही. हा त्यांचा गुण हेरून गेल्यावर्षी त्यांना ग्रुप असोसिएट एडिटर केले गेले. संपादकीय पानाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. रोज सायंकाळी सहाच्या दरम्यान संपादकीय पान माझ्याकडे यायचे. त्याच पानावर त्यांच्यावर लिहिण्याची वेळ माझ्यावर येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. आताही वाटते की त्यांचा फोन येईल आणि संपादकीय पान टाकले आहे, असा निरोप देतील..!