शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

विद्रोहाचा शिल्पकार

By admin | Updated: July 9, 2016 03:07 IST

दु:खितांच्या जगण्याचा जाहीरनामा लिहिणारे साठोत्तरी कवी तुळसी परब यांच्या जाण्याने विद्रोही साहित्य चळवळीला महत्त्वाचे योगदान देणारा शिल्पकार हरपला आहे. त्यांनी आपल्या

दु:खितांच्या जगण्याचा जाहीरनामा लिहिणारे साठोत्तरी कवी तुळसी परब यांच्या जाण्याने विद्रोही साहित्य चळवळीला महत्त्वाचे योगदान देणारा शिल्पकार हरपला आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून कायमच दारिद्र्य, शोषण, स्वातंत्र्य, पाणी, आदिवासींचे जीवन, अशा असंख्य विषयांना कवेत पकडण्याचे सामर्थ्य अभिव्यक्त केले. मराठी आणि भाषा शास्त्रात एम.ए केल्यानंतर त्यांनी त्यावेळच्या सचिवालयात नोकरी केली. मात्र पहिल्यापासून साहित्य- सामाजिक चळवळीत सक्रीय असणाऱ्या परब यांचे मन नोकरीत रमले नाही. काही वर्षांनंतर ही नोकरी सोडून त्यांनी समाजातील तळागाळातील घटकांच्या प्रगतीसाठी आवाज उठविला. त्यांचे अनियतकालिकांच्या लेखन चळवळीत महत्त्वाचे योगदान आहे. अरुण कोलटकर, वसंत गुर्जर, राजा ढाले यांच्या सोबत लिटल मॅगेझीन चळवळीतील त्यांचा सहभागही विशेष उल्लेखनीय ठरला. त्या काळात ‘सत्यकथा’ या वाङ्मयीन मासिकाची प्रतिकात्मक होळी करून करून प्रस्थापित व्यवस्थेवरचा राग व्यक्त करण्याचा प्रयत्न अनियतकालिकांशी संबंधित या साहित्यिकांनी केला होता. परब यांचे तीन कवितासंग्रह विशेष गाजले. त्यात ‘हिल्लोळ’, ‘धादांत आणि सुप्रमेय मधल्या कविता’, ‘कुबडा नार्सिसस’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘पाब्लो नेरुदांच्या कविता’, ‘मनोहर ओक यांच्या ऐंशी कविता’ ही त्यांनी संपादित केलेली पुस्तके आहेत. शहाद्यात ‘श्रमिक संघटने’मध्ये आदिवासींसाठी काम करताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, मात्र त्याला न जुमानता त्यांनी ते कार्य सुरुच ठेवले. ‘मागोवा’ गटाच्या चळवळीत सहभागी असताना त्यांनी कारावासही भोगला. २००५ साली झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. परब यांच्या स्वभावात कमालीचा विरोधाभास होता. एका बाजूला साहित्य व दृष्य कलांची जाण प्रगल्भतेची, सूक्ष्मतेची होती. ते नवीन कलाकृतींना स्वीकारण्यास नेहमी तयार असत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या भाषेत आणि वागणुकीत रांगडेपणा होता. समकालीन मराठी कवितेतील राजकीय जाणिवेची व्याप्ती वरचेवर वाढतच आहे. म्हणून अशा कवितेचे विश्लेषण आणि मूल्यमापन करताना परब यांची कविता एक संदर्भ चौकट म्हणून मोलाची ठरेल अशी आहे.