शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

विद्रोहाचा शिल्पकार

By admin | Updated: July 9, 2016 03:07 IST

दु:खितांच्या जगण्याचा जाहीरनामा लिहिणारे साठोत्तरी कवी तुळसी परब यांच्या जाण्याने विद्रोही साहित्य चळवळीला महत्त्वाचे योगदान देणारा शिल्पकार हरपला आहे. त्यांनी आपल्या

दु:खितांच्या जगण्याचा जाहीरनामा लिहिणारे साठोत्तरी कवी तुळसी परब यांच्या जाण्याने विद्रोही साहित्य चळवळीला महत्त्वाचे योगदान देणारा शिल्पकार हरपला आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून कायमच दारिद्र्य, शोषण, स्वातंत्र्य, पाणी, आदिवासींचे जीवन, अशा असंख्य विषयांना कवेत पकडण्याचे सामर्थ्य अभिव्यक्त केले. मराठी आणि भाषा शास्त्रात एम.ए केल्यानंतर त्यांनी त्यावेळच्या सचिवालयात नोकरी केली. मात्र पहिल्यापासून साहित्य- सामाजिक चळवळीत सक्रीय असणाऱ्या परब यांचे मन नोकरीत रमले नाही. काही वर्षांनंतर ही नोकरी सोडून त्यांनी समाजातील तळागाळातील घटकांच्या प्रगतीसाठी आवाज उठविला. त्यांचे अनियतकालिकांच्या लेखन चळवळीत महत्त्वाचे योगदान आहे. अरुण कोलटकर, वसंत गुर्जर, राजा ढाले यांच्या सोबत लिटल मॅगेझीन चळवळीतील त्यांचा सहभागही विशेष उल्लेखनीय ठरला. त्या काळात ‘सत्यकथा’ या वाङ्मयीन मासिकाची प्रतिकात्मक होळी करून करून प्रस्थापित व्यवस्थेवरचा राग व्यक्त करण्याचा प्रयत्न अनियतकालिकांशी संबंधित या साहित्यिकांनी केला होता. परब यांचे तीन कवितासंग्रह विशेष गाजले. त्यात ‘हिल्लोळ’, ‘धादांत आणि सुप्रमेय मधल्या कविता’, ‘कुबडा नार्सिसस’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘पाब्लो नेरुदांच्या कविता’, ‘मनोहर ओक यांच्या ऐंशी कविता’ ही त्यांनी संपादित केलेली पुस्तके आहेत. शहाद्यात ‘श्रमिक संघटने’मध्ये आदिवासींसाठी काम करताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, मात्र त्याला न जुमानता त्यांनी ते कार्य सुरुच ठेवले. ‘मागोवा’ गटाच्या चळवळीत सहभागी असताना त्यांनी कारावासही भोगला. २००५ साली झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. परब यांच्या स्वभावात कमालीचा विरोधाभास होता. एका बाजूला साहित्य व दृष्य कलांची जाण प्रगल्भतेची, सूक्ष्मतेची होती. ते नवीन कलाकृतींना स्वीकारण्यास नेहमी तयार असत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या भाषेत आणि वागणुकीत रांगडेपणा होता. समकालीन मराठी कवितेतील राजकीय जाणिवेची व्याप्ती वरचेवर वाढतच आहे. म्हणून अशा कवितेचे विश्लेषण आणि मूल्यमापन करताना परब यांची कविता एक संदर्भ चौकट म्हणून मोलाची ठरेल अशी आहे.