शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

समाजातील सज्जनशक्तीचा पुन्हा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 18:15 IST

मिलिंद कुलकर्णी बेरीज-वजाबाकी...! खान्देशात प्रशासनाने उत्तम नियोजन केलेले होते. खबरदारी म्हणून काहींवर नजर, संबंधितांना सूचना, शांतता समितीच्या बैठका, समाजमाध्यमांचा ...

ठळक मुद्देअयोध्या निकालानंतर संयम, सौहार्दाचे वातावरण ; प्रशासनाच्या नियोजनाला संपूर्ण समाजाची उत्तम साथसमाजमाध्यमांकडून स्वयंशिस्तीचे दर्शन ; एकात्मतेची भावना वाढीस लागल्याची सुखद भावना

मिलिंद कुलकर्णी

बेरीज-वजाबाकी...!खान्देशात प्रशासनाने उत्तम नियोजन केलेले होते. खबरदारी म्हणून काहींवर नजर, संबंधितांना सूचना, शांतता समितीच्या बैठका, समाजमाध्यमांचा काळजीपूर्वक वापर करण्याचे आवाहन, पुरेसा पोलीस बंदोबस्त अशी पूर्वतयारी करण्यात आली होती. धुळ्यात आदल्यादिवशी दोन आणि नंदुरबारात एक गुन्हा दाखल झाला, ही कारवाई प्रभावशाली ठरली. इतिहासात काही शहरांविषयी नोंदी असतील, पण तरीही समाजाने ठरवले तर प्रतिमा निश्चित बदलू शकते, हे या घटनेने दाखवून दिले.समाजपुरुषाची परीक्षा घेणारे प्रसंग अनेकदा येत असतात. त्यावेळी समाजातील सज्जनशक्ती काय भूमिका घेते, त्यावर वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अवलंबून असतो. भूतकाळातील घटनांविषयी तर नेहमीच दोन पक्ष राहिलेले आहेत, त्यासंबंधी विषय असला तर दोन्ही पक्ष हिरीरीने भूमिका मांडतात आणि आपली बाजू कशी खरी हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. अयोध्येचा वाद हा असाच आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाने उत्तम असे संतुलन राखले आणि ना कुणाचा विजय झाला ना, कुणाचा पराजय झाला, अशी भावना निर्माण झाली. वाद मिटला, देश जिंकला असे वातावरण संपूर्ण देशभर होते.निकाल ऐतिहासिक आहेच, पण या निकालाचे पडसाद काय उमटू शकतात, यासंबंधी पुरेशी खबरादारी प्रशासनाने घेतली, हे खूप महत्त्वाचे आहे. महाराष्टÑात नुकतीच विधानसभा निवडणूक आटोपली आहे. १८ दिवस उलटूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. सत्तासमीकरणात प्रमुख चार पक्ष गुंतलेले आहेत. शिवसेनेचे आमदार मुंबईत तर काँग्रेसचे आमदार जयपूरला आहेत. राष्टÑवादी व भाजपचे आमदार एकतर मतदारसंघात किंवा मुंबईतच असावे. राजकीय मंडळी सत्तास्थापनेच्या खेळात गुंतलेली असताना प्रशासनाने समाजातील जबाबदार घटकांचे सहकार्य घेत हा प्रसंग उत्तमपणे निभावला.धुळे आणि नंदुरबारमधील घटनांची तातडीने दखल घेऊन कारवाई केल्याने अतिउत्साही, उतावीळ मंडळींना चाप बसला. पुन्हा कोणी असा प्रकार करायला धजावले नाही.समाजातील सर्वच घटकांनी संयम, एकता, बंधुभावाचे विलक्षण दर्शन घडवले. शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. बाजारपेठेतही तुरळक गर्दी होती. समाजाला विश्वास देण्यासाठी सज्जनशक्ती रस्त्यावर उतरली. शांतता फेरी काढण्यात आल्या. सभांमध्ये एकोप्याचे आवाहन केले गेले. याचा खूप मोठा परिणाम झाला. जनजीवन पूर्ववत झाले.समाजमाध्यमांविषयी एरवी फारसे चांगले मत नाही. परंतु, प्रशासनाने धोक्याची जाणीव करुन देताच समाजमाध्यमांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले. कुणीही आक्षेपार्ह टिपणी न करता, एकोपा आणि बंधुभाव वृध्दिंगत होईल, असाच प्रयत्न केला.अयोध्या निकालाचे समाजात उमटलेले पडसाद पाहता समंजस, परिपक्वपणाचे विलक्षण दर्शन घडले. विजय, पराजयापेक्षा वाद मिटला, देश जिंकला ही भावना सर्वतोपरी ठरली. यातूनच समाज आणि देश पुढे जाणार आहे. संख्येने कमी असल्या तरी समाजात काही विघातक व विध्वंसक शक्ती आहेत, त्यांना समाजपुरुषाच्या या एकसंघ दर्शनाने व्यवस्थित संदेश मिळाला असेल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव