शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने केला इशारा येता येता!

By admin | Updated: July 15, 2016 01:58 IST

‘केला इशारा जाता-जाता!’ नावाचा एक मराठी चित्रपट खूप गाजला होता. त्याच्या शीर्षकाची आज आठवण येते. कारण केवळ चार दिवसांत (शनिवार ते मंगळवार) दक्षिण महाराष्ट्राला मान्सूनच्या

‘केला इशारा जाता-जाता!’ नावाचा एक मराठी चित्रपट खूप गाजला होता. त्याच्या शीर्षकाची आज आठवण येते. कारण केवळ चार दिवसांत (शनिवार ते मंगळवार) दक्षिण महाराष्ट्राला मान्सूनच्या पावसाने येता येता इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत तुरळक पाऊस होता. नाले, ओढे कोरडेच होते. पुढे चार दिवस पाऊस चोवीस तास झोडपून काढू लागला. बघता बघता सर्व नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले. अनेक नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळीही गाठली. अनेक रस्ते, बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले. राष्ट्रीय महामार्ग वगळता बहुतांश रस्त्यांवर पाणी आले. कोल्हापूर- रत्नागिरी, कोल्हापूर-सिंधुदुर्ग मार्गांवर पाणी आले. शिवाय अनेक ठिकाणी शहरांतून पाणी शिरले. कोल्हापूरच्या सखल भागातही पाणी येऊन, सांगली शहराचा एक तृतीयांश भाग पाण्याने डबडबला. केवळ चार दिवसांत पावसाने दाणादाण उडवून दिली.कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, कऱ्हाड आदी सर्व शहरांतील पाणी बाहेर पडण्यास पुरेशी जागाच शिल्लक ठेवलेली नाही. वास्तविक, दक्षिण महाराष्ट्राच्या कृष्णा खोऱ्यातील चोवीसपैकी एकही धरण अद्याप भरलेले नाही. या चार दिवसांत पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसाने आता कोठे ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. एकही धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने पाण्याचा विसर्ग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीदेखील केवळ धरणांच्या लाभक्षेत्रात पडणाऱ्या पाण्याने नद्यांना महापुरी बनवून सोडले आहे. कारण, सर्वच नद्यांवर येणारे रस्ते वाढविले आहेत. राज्य आणि महामार्ग उंच केले आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यास पुरेशी जागाच ठेवलेली नाही. त्यामुळे हजारो एकर शेतीमधील उभ्या पिकांत पाणी शिरले आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या पश्चिम भागातील बारा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. हे सर्व तालुके डोंगराळ आहेत. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये पसरले आहेत. तेथे पाऊस प्रचंड असतो. दरवर्षी या तालुक्यांतच असणारी चोवीस धरणे भरतात. त्यांचा विसर्ग सुरू होताच नद्यांच्या पाण्याची पातळी वाढते. नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा दिला जातो. निसर्गनियमाप्रमाणे याचीही एक पद्धत ठरून गेली आहे. गत वर्षीच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर उन्हाळी पाऊस झालेच नाहीत. जूनमध्ये पाऊसच नाही. जुलैचा पहिला आठवडाही कोरडा गेला. मात्र, गत चार दिवसांत झालेल्या पावसाने कसर भरून काढली. गत वर्षीच्या पावसाची सरासरी पार केली. ही किमया केवळ चार दिवसांत झाल्याने नद्यांना पूर आले. अनेक गावांचा संपर्क तुटला. जनजीवन विस्कळीत झाले. त्याचे कारण थोडा जरी अधिक पाऊस झाला तरी येणाऱ्या पुरावर मात करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत. अनेक वर्षे आणि पिढ्यान्पिढ्या ठरावीक रस्ते, मार्ग, गावे पाण्याखाली जातातच, त्यावर उपाय नाही. याउलट अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग बंद केले गेले आहेत. परिणामी, पाण्याची अडवणूकच होत आहे. अद्याप ७० टक्के पाऊस होणे अपेक्षित आहे. जुलै आणि आॅगस्टमध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यानच्या काळात धरणे भरली तर विसर्ग करावा लागेल. एकीकडे पावसाचे पाणी आणि धरणांचा विसर्ग यामुळे हाहाकार उडू शकतो. हा निसर्गाने येता येताच दिलेला इशारा आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दक्षिण महाराष्ट्रात १९५३, १९८३ आणि २००५ मध्ये महापूर आले होते. केव्हा तरी दशक-दोन दशकांनंतर महापूर येतो म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. कारण पाण्याच्या निचऱ्याच्या मार्गावर आपण असंख्य अडथळे निर्माण केले आहेत. सांगली शहरात चार दिवसांच्या पावसाने वाताहत झालीे. निम्मे शहर पाण्यात तरंगत होते. चेन्नईची आठवण व्हावी, अशी परिस्थिती होती. निसर्गाने दिलेला इशारा समजून घेणे हाच समजूतदारपणा आहे. - वसंत भोसले