शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
4
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
5
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
6
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
7
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
8
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
9
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
10
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
11
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
12
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
13
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
14
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
15
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
16
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
18
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
19
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
20
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी

प्रश्नचिन्ह आणि जीवन

By admin | Updated: November 2, 2016 05:49 IST

माझ्या लहानपणीची एक दृष्टांतकथा मला आठवते. चित्रकलेचा तास असतो.

माझ्या लहानपणीची एक दृष्टांतकथा मला आठवते. चित्रकलेचा तास असतो. चित्रकलेचे शिक्षक वर्गात मुलांना सुंदर सुंदर चित्रे काढायला शिकवतात. त्यात सूर्योदयाचे चित्र असते, डोंगराचे चित्र असते, झाडांचे चित्र असते आणि शेवटी माणसाचेही चित्र काढायला शिकवतात. इतर चित्रांपेक्षा माणसाचे चित्र काढणे तसे खूप अवघड. शिक्षक आज वर्गात सांगतात की, ‘सर्वांनी मी दिलेल्या कागदावर माणसाचे चित्र काढायचे. मी तुम्हाला माणसाचे चित्र काढायला शिकविले आहे. ज्याचे चित्र सर्वात लवकर काढून होईल त्याला मी बक्षीस देणार आहे. वर्गातील एका मुलाने सर्वात अगोदर दिलेल्या कागदावर चित्र काढून, घडी करून तो कागद शिक्षकांकडे दिला. शिक्षकाने ते चित्र पाहिले आणि त्याची पाठ थोपटली. त्या चित्राकडे पहात त्यांनी त्या मुलाला बोलावले. कारण त्या कागदावर माणसाचे चित्र काढलेले नव्हते. त्याऐवजी एक मोठे प्रश्नचिन्ह काढले होते. त्या विद्यार्थ्याला त्या चित्राविषयी विचारले त्यावर तो म्हणाला, ‘सर तुम्हीच एकदा म्हणाला होता माणूस म्हणजे एक मोठे प्रश्नचिन्ह. शिक्षक त्याच्या कल्पकतेला दाद देत हसले, त्यांनी तो कागद घेतला आणि त्या प्रश्नचिन्हापुढे एक स्वल्पविराम दिला. ते हसत हसत म्हणाले, ‘‘प्रश्नचिन्ह ही माणसाची एक खूण आहे. पण ती अपूर्ण आहे. परंतु जो या प्रश्नचिन्हाला स्वल्पविराम देऊन पुढे जातो तो खरा माणूस. आणि तीच माणसाखी खरी ओळख.’’प्रश्न म्हणजे जिज्ञासा आणि कुतुहल. प्रश्न म्हणजे समस्या, अडचण आणि त्या सोडविण्यासाठी लागणारी माणसाची कसोटी. मानवी जीवन जगत व्यवहार, विश्वरचना, त्या विश्वरचनेतील माणसाचे स्थान आणि अनुबंध या विश्व व्यवहारामागील अज्ञात शक्ती आणि मानवासह विश्व व्यवहाराला कारणीभूत असणारे चैतन्य आणि उर्जा या साऱ्या गोष्टींविषयी मानवी मनात प्रथम कुतुहल जागे होते. त्याचा शोध घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होते. आणि ही जिज्ञासा काही प्रश्न निर्माण करते. कुतुहल, जिज्ञासा, ज्ञान मिळविण्याची कृती आणि मिळाल्यानंतरची तृप्ती हे एक चक्र प्रथमत: एका प्रश्नाभोवती उभे राहते आणि मानवी व्यवहाराच्या एका भल्या मोठ्या परिघातून प्रश्न ही संकल्पना हळूच डोकावते. ज्याला प्रश्न पडत नाहीत किंवा ज्याच्यासमोर प्रश्न उभे रहात नाहीत. अशा माणसाला आपण माणूस म्हणणार का? असाही प्रश्न उभा राहतो. प्रश्न पडणे आणि तो सोडविणे हा जागृत मानवी मनाचा उद्गार आहे. आणि प्रश्न उभा राहणे हे त्याच्या कर्तृत्वाला आवाहन आहे. ज्याला कधी प्रश्न पडत नाहीत तो एकतर सर्वज्ञ आणि महान बुद्धिवान असतो. नाहीतर अतिशय निर्बुद्ध. मानवी बुद्धिलाही जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा हीच बुद्धिज्ञानाच्या सांगाती मानवी जीवनाचा शोध घेऊ लागते.

-डॉ. रामचंद्र देखणे