शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

गुणवत्तेची कास

By admin | Updated: February 16, 2015 00:43 IST

इतिहासाची पानं उलटता उलटता आज कधी उगवतो, हेही पुष्कळदा कळत नाही. गुणवत्तेचंही तसंच आहे. काय होतो आपण नि काय झालो आपण?

डॉ. कुमुद गोसावी - इतिहासाची पानं उलटता उलटता आज कधी उगवतो, हेही पुष्कळदा कळत नाही. गुणवत्तेचंही तसंच आहे.काय होतो आपण नि काय झालो आपण? मनातल्या मनात मग एक गणित सुरू होतं. त्याचं अचूक उत्तरही आपल्याकडंच असतं. उमेद, उत्साह नि ऊर्जा या तीन ओमकाराचं पैंजण आपापली गुणवत्ता आपल्याला बहाल करीत असतं, या पैंजणाच्या नादलयीत नवनवीन आव्हानांकडं जाता येतं हे अध्यात्मच आपल्याला सांगत असतं.मूर्ख माणूस स्वत:च्या दोषांकडं डोळेझाक करतो. इतरांचे दोष काढतो ‘मी’भोवतीची त्याची येरझार नि वाईट बुद्धीनं घडणारे व्यवहार यांनी तो घेरला जातो. मन:शांती, मन:स्वाथ्य घालवून बसतो. जात, धर्म, पंथ नि नाती-गोती यात अडकून पडतो कोळिष्टकासारखा. त्यामुळं गुणवत्तेची कुचंबणा होते. जोपर्यंत गुणवत्तेला महत्त्व येत नाही, तोवर समाजाला भविष्य नाही. जोडिली अक्षरे।नव्हती बुद्धीची उत्तरे।नाही केली आटी।काठी मानदंडासाठी।कोणी भाग्यवंत।तया कळेल उचित।तुका म्हणे झरा।आहे मुळीचाची खरा।जगद्गुरू तुकोबांंनी प्रापंचिकांना अशी गुणवत्तेची ओळख करून दिली आहे. तेव्हा त्यातील अध्यात्म ध्यानी घेऊन गुणवत्ता जपायलाच हवी, नाही का?संस्कृतीचा प्रकाश आत्मोन्नतीची दिशा दाखवतो. तिच्यामुळं आत्मबोधाची दालनं खुली होतात. म्हणून तर एखादा रिक्षावाला पिता नि लोकांची धुणी-भांडी करणारी माता आपल्या मुलांनी शिकून गुणवत्ता वाढवावी नि गुणवत्तेच्या आधारे डॉक्टर, इंजिनिअर होऊन सुखी जीवनाची गुढी उभारावी, यासाठी अहोरात्र कष्ट उपसतात, अर्धपोटी राहतात नि सुदैवानं त्यांचं स्वप्न सफल झालं तर आपल्या आयुष्याचं सोनं झालं असं मानतात.गुणवत्तेची महती जर आमचा कष्टकरी, कामकरी, शेतकरी स्वत:चा घाम गाळता-गाळता जाणू शकतो, तर समाजाच्या सर्वच स्तरांतील जनलोकांनी सर्वच क्षेत्रातील गुणवत्ता कशी राखली जाईल, तिची चिरंतन वृद्धीच कशी होईल, याकडं सर्वंकष लक्ष सतत पुरवलं, त्यासाठी गरजूंना मदतीचा समर्थ प्रेमळ हात पुढं केला, अभेदभाव राखला तर आजही गुणवत्तेचं प्रमाण वाढतच राहील. पै वसंताचे रिगवणे।झाडाचे नि साजेपणे।जाणिजे तेवी करती।सांगती ज्ञान।वसंताचा प्रवेश असा झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो, तसा कोणताही देश, कोणताही समाज त्याच्यातील गुणवत्तेवरून जाणता येतो. ‘विद्वान सर्वत्र पुज्यते’ तेव्हा आपला देश, आपली संस्कृती जर या गुणवत्तेवरून ओळखली जाते, तर तिची कास आपण प्रत्येकानं धरण्याचा संकल्प करायला काय हरकत आहे?