शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

समस्या कळल्या, उपाय काय?

By admin | Updated: February 2, 2017 00:30 IST

यंदाच्या अर्थसंकल्पाला एक विशेष पार्श्वभूमी आहे. नोटाबंदीमुळे आर्थिक -राजकीय आणि एकूणच समाजजीवन ढवळून निघाले आहे. त्याची या अर्थसंकल्पावर गडद छाया आहे.

- देविदास तुळजापूरकरयंदाच्या अर्थसंकल्पाला एक विशेष पार्श्वभूमी आहे. नोटाबंदीमुळे आर्थिक -राजकीय आणि एकूणच समाजजीवन ढवळून निघाले आहे. त्याची या अर्थसंकल्पावर गडद छाया आहे. नोटाबंदीमुळे तात्पुरती झळ बसेल, पण जनतेचे दुरगामी हित आहे, हे सूत्र पुन्हा या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सरकारने पुढे मांडले. मग ताबडतोबीची जी झळ जनतेला बसत आहे. त्यापासून संरक्षण म्हणून कल्याणकारी योजना, प्रोत्साहनपर योजना, मदत योजनांचे सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न केला.नोटाबंदीमुळे जी झळ जनतेला बसत आहे. त्यापासून संरक्षण म्हणून कल्याणकारी योजना, प्रोत्साहनपर योजना, मदत योजनांचे सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न अथर्संकल्पातून सरकारने केला आहे.आता प्रश्न आहे तो दुरगामी परिणामांचे काय? सरकारने अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी अर्थसंकल्पपूर्व आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला. यात मान्य केले की, सकल घरेलू उत्पादन घटेल, विकास दर मंदावेल, ओघानेच याची परिणती बेरोजगारी वाढण्यात, बाजारात उत्पादनाची मागणी घटण्यात, लोकांची क्रयशक्ती घटण्यात सरकारचे कर संकलन कमी होण्यात होणार आहे. म्हणजेच यामुळे देश मंदीच्या गर्तेत जाऊन पोहचू शकतो. यावर उपाय काय?आज आताच अनेक उद्योगांनी त्यांच्या उत्पादनाला मागणी नाही म्हणून आपल्या कामात कपात केली आहे. कंत्राटी कर्मचारी तात्पुरते कमी केले आहेत. उद्योगांनी बँकाकडून घेतलेली कर्ज परत केली आहेत. याचे पुनरुज्जीवन कसे होणार? त्यासाठी बाजारात उभारी येण्याची आवश्यकता आहे. ती कशी येणार? लोकांच्या हातात पैसा आला तर... याचा अर्थ त्यांचे उत्पन्न वाढले तर... ते कसे होणार... मला वाटते या प्रश्नांची उत्तरे या अर्थसंकल्पात नाहीत, तसा प्रयत्नही नाही.बँकांकडे आज ८ लाख कोटी रुपयांची थकीत कर्ज आहेत आणि किमान तेवढीच दडवून ठेवलेली आहेत, म्हणजे तो आकडा अंदाजे १५ लाख कोटींच्या घरात जातो. पण त्यावरील उपाययोजना जी अर्थसंकल्पात अपेक्षित होती त्याबाबत घोर निराशा झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पुनरुज्जीवन केव्हा आणि कसे होणार? सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवल पर्याप्तता निधीसाठी अत्यंत तोकडी १० हजार कोटींची तरतूद केली आहे.या अर्थसंकल्पाची मांडणी करताना काही महत्त्वपूर्ण बाह्यगत घडामोडींकडे लक्ष वेधले आहे. १. नवीन अमेरिकी सरकारची धोरणे. २. क्रुड आॅइलला दरातील संभाव्य वाढ या दोन्ही शक्यता अशा आहेत की त्या जागतिक अर्थव्यवस्थांच्या, भारतासह सारीपाट उधळून लावू शकतात. त्याचे काय? का प्रश्न अर्थसंकल्पात जरूर मांडला आहे, पण उत्तराविना या दोन्ही शक्यतांमुळे सारेजग अस्थिरतेच्या सावटाखाली आहे. अगदी भारतासह!(महाराष्ट्र स्टेट बँक एम्लॉइज फेडरेशन)