शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

समस्या कळल्या, उपाय काय?

By admin | Updated: February 2, 2017 00:30 IST

यंदाच्या अर्थसंकल्पाला एक विशेष पार्श्वभूमी आहे. नोटाबंदीमुळे आर्थिक -राजकीय आणि एकूणच समाजजीवन ढवळून निघाले आहे. त्याची या अर्थसंकल्पावर गडद छाया आहे.

- देविदास तुळजापूरकरयंदाच्या अर्थसंकल्पाला एक विशेष पार्श्वभूमी आहे. नोटाबंदीमुळे आर्थिक -राजकीय आणि एकूणच समाजजीवन ढवळून निघाले आहे. त्याची या अर्थसंकल्पावर गडद छाया आहे. नोटाबंदीमुळे तात्पुरती झळ बसेल, पण जनतेचे दुरगामी हित आहे, हे सूत्र पुन्हा या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सरकारने पुढे मांडले. मग ताबडतोबीची जी झळ जनतेला बसत आहे. त्यापासून संरक्षण म्हणून कल्याणकारी योजना, प्रोत्साहनपर योजना, मदत योजनांचे सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न केला.नोटाबंदीमुळे जी झळ जनतेला बसत आहे. त्यापासून संरक्षण म्हणून कल्याणकारी योजना, प्रोत्साहनपर योजना, मदत योजनांचे सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न अथर्संकल्पातून सरकारने केला आहे.आता प्रश्न आहे तो दुरगामी परिणामांचे काय? सरकारने अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी अर्थसंकल्पपूर्व आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला. यात मान्य केले की, सकल घरेलू उत्पादन घटेल, विकास दर मंदावेल, ओघानेच याची परिणती बेरोजगारी वाढण्यात, बाजारात उत्पादनाची मागणी घटण्यात, लोकांची क्रयशक्ती घटण्यात सरकारचे कर संकलन कमी होण्यात होणार आहे. म्हणजेच यामुळे देश मंदीच्या गर्तेत जाऊन पोहचू शकतो. यावर उपाय काय?आज आताच अनेक उद्योगांनी त्यांच्या उत्पादनाला मागणी नाही म्हणून आपल्या कामात कपात केली आहे. कंत्राटी कर्मचारी तात्पुरते कमी केले आहेत. उद्योगांनी बँकाकडून घेतलेली कर्ज परत केली आहेत. याचे पुनरुज्जीवन कसे होणार? त्यासाठी बाजारात उभारी येण्याची आवश्यकता आहे. ती कशी येणार? लोकांच्या हातात पैसा आला तर... याचा अर्थ त्यांचे उत्पन्न वाढले तर... ते कसे होणार... मला वाटते या प्रश्नांची उत्तरे या अर्थसंकल्पात नाहीत, तसा प्रयत्नही नाही.बँकांकडे आज ८ लाख कोटी रुपयांची थकीत कर्ज आहेत आणि किमान तेवढीच दडवून ठेवलेली आहेत, म्हणजे तो आकडा अंदाजे १५ लाख कोटींच्या घरात जातो. पण त्यावरील उपाययोजना जी अर्थसंकल्पात अपेक्षित होती त्याबाबत घोर निराशा झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पुनरुज्जीवन केव्हा आणि कसे होणार? सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवल पर्याप्तता निधीसाठी अत्यंत तोकडी १० हजार कोटींची तरतूद केली आहे.या अर्थसंकल्पाची मांडणी करताना काही महत्त्वपूर्ण बाह्यगत घडामोडींकडे लक्ष वेधले आहे. १. नवीन अमेरिकी सरकारची धोरणे. २. क्रुड आॅइलला दरातील संभाव्य वाढ या दोन्ही शक्यता अशा आहेत की त्या जागतिक अर्थव्यवस्थांच्या, भारतासह सारीपाट उधळून लावू शकतात. त्याचे काय? का प्रश्न अर्थसंकल्पात जरूर मांडला आहे, पण उत्तराविना या दोन्ही शक्यतांमुळे सारेजग अस्थिरतेच्या सावटाखाली आहे. अगदी भारतासह!(महाराष्ट्र स्टेट बँक एम्लॉइज फेडरेशन)