शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण रामदास आठवल्यांचे

By admin | Updated: April 19, 2015 01:34 IST

एका चित्रपट गौरव सोहळ्यात सादर झालेल्या कवीसंमेलनात सागर कारंडे नावाच्या नटाने रामदास आठवलेंच्या रूपात कविता सादर केल्या.

एका चित्रपट गौरव सोहळ्यात सादर झालेल्या कवीसंमेलनात सागर कारंडे नावाच्या नटाने रामदास आठवलेंच्या रूपात कविता सादर केल्या. त्याचा पेहराव, हावभाव हमखास विनोदनिर्मिती करणारे होते. त्याच्या बरेच आठवडे आठवलेच्या नावाने अनेक कविता फेसबुक आणि व्हॉट्सअपवर फिरत होत्या. त्यामुळे रामदास आठवले, त्यांचे सहकारी आणि पक्ष दुखावल्याचेही प्रसिद्ध झाले होते. इतक्या कमी कलावधीत इतकी हास्यास्पदता एखाद्या माणसाने चुकूनच मिळवली असेल. पण हा लेख विनोदनिर्मितीसाठी नाही. रामदास आठवलेंच्या शोकात्म होऊन बसलेल्या राजकारणाचे रूप समजून घेण्यासाठी आहे. ली दोन-तीन दशके रामदास आठवले राजकारणात आहेत. दलिथ पँथरची शकले होण्यापासून रिपब्लिकन पक्षाच्या चिरफाळ्या होईपर्यंत आणि शरद पवारांचे मांडलिक म्हणून काम करण्यापासून सेना-भाजपाच्या राजकारणाला निळी झालर लावण्यापर्यंत मोठा राजकीय पल्ला त्यांनी गाठलेला आहे. यादरम्यान त्यांना एकदा मंत्रिपद मिळाले. एकदा ते लोकसभेवर गेले. खूप अजीजी करून का होईना ते आता राज्यसभेवर गेले आहेत. अजूनही त्यांना केंद्रातल्या मंत्रिपदाची आस आहे. त्या काळात त्यांनी आपल्या परीने संघटन बांधण्याचा प्रयत्न केला. पण विधिमंडळात त्याच्या पक्षाला काही स्थान नाही. आमच्यामुळे आधी आघाडीचे आणि मग महायुतीचे उमेदवार निवडून आले असा दावा ते करीत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या पक्षातले किती लोक निवडून आले याचे उत्तर शून्यच आहे. राज्यव्यापी संघटना न बांधता येणे, बिगर दलितांपर्यंत पोचण्यासाठी सोशल इंजिनीअरिंगचा यशस्वी प्रयोग न करता येणे या त्यांच्या प्रमुख मर्यादा आहेत. वर्षानुवर्षे महाराष्ट्रातल्या दलितांचे संघटन जर थेट बोलायचे झाले तर रिपब्लिकन पक्षाचे संघटन हे पूर्वाश्रमीच्या महार समाजापासून आताच्या नवबौद्ध समाजापर्यंत मर्यादित आहे. त्यापलीकडे जाऊन बिगर दलित समाजाचे संघटन करावे असे प्राधान्याने दलितांच्या असलेल्या संघटनांना वाटलेच नाही किंवा जमलेच नाही. त्याला रामदास आठवले यांचा पक्षही अपवाद नाही. मात्र सर्व दलितांचे संघटनही त्यांच्या पक्षाला जमले आहे का, हा खरा प्रश्न आहे. जवळपास एक दशकाहून अधिक काळ रामदास आठवले सुरु वातीला काँग्रेससोबत व नंतर राष्ट्रवादीसोबत होते. त्यांचे शरद पवारांशी असलेले चांगले संबंध हे त्याचे कारण होते. त्यांना समाजकल्याण आणि परिवहन ही खाती असणारे मंत्रिपदही मिळाले. (याच मंत्रिपदाच्या काळात हजारो परप्रांतीयांना रिक्षा-टॅक्सीचे परमिट देऊन मराठी माणसाच्या बोकांडी बसवले असाही त्यांच्याबद्दल आक्षेप आहे.) पण एका टप्प्यानंतर आपला आणि आपल्या पक्षाचा फक्त वापर होत आहे असे वाटल्यानंतर रामदास आठवले यांनी ही सोयरीक मोडली आणि ते शिवशक्ती- भीमशक्तीच्या युतीचा भाग बनले. शिवसेना - भाजपामधले मतभेद तीव्र झाल्यामुळे आणि भाजपाचे दिवस चांगले आहेत असे आठवलेंना वाटल्यामुळे त्यांनी शिवसेनेपासून काडीमोड घेत भाजपाची साथ घेतली. (त्यामुळे अर्जुन डांगळे त्यांच्यापासून दुरावले. ते अद्यापही विधान परिषदेची जागा मिळेल या आशेने शिवसेनेसोबत आहेत.) सत्ता मिळाल्यानंतरही भाजपाने रामदास आठवलेंना झुलवत ठेवले आहे. केंद्रात मंत्रिपद नाही. राज्यात आमदार नाहीत. पक्षाचा विस्तार होण्याची चिन्हे राहिली नाहीत आणि नवीन मित्र मिळवण्याची जागा राहिली नाही. अशा कठीण परिस्थितीत रामदास आठवले अडकले आहेत. त्यांच्या दुर्दैवाने रामदास आठवलेंना फारशी सहानुभूतीही नाही. रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडानंतर दलित समाज सगळ्याच दलित नेतृत्वावर चिडला होता. तेव्हा रामदास आठवले लोकांना भेटायला गेले. चिडलेल्या लोकांनी त्यांचा अक्षरश: पाठलाग केला. पण लोकांमध्ये जाण्याचे धैर्य दाखिवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. आज दुर्दैवाने त्यांच्या धैर्यापेक्षा त्यांच्या चारोळ्यांची चर्चा अधिक आहे. या हास्यास्पद स्थितीतून स्वत:ला बाहेर काढणे ही रामदास आठवले यांची जबाबदारी आहे. ते त्यांना कितपत जमते यावर त्यांचे अस्तित्व आणि भवितव्य अवलंबून आहे. आठवलेंनी घेतली भाजपाची साथ जवळपास एक दशकाहून अधिक काळ रामदास आठवले सुरु वातीला काँग्रेससोबत व नंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते. त्यांचे शरद पवारांशी असलेले चांगले संबंध हे त्याचे कारण होते. एका टप्प्यानंतर आपला आणि आपल्या पक्षाचा फक्त वापर होत आहे असे वाटल्यानंतर ते शिवशक्ती- भीमशक्तीच्या युतीचा भाग बनले. पुढे या दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर भाजपामध्ये आपले काहीतरी होईल असे वाटल्याने त्यांनी भाजपाची साथ घेतली. डॉ. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर रिपब्लिकन पक्षात जसे गवई, खोब्रागडे, गायकवाड, कांबळे अशी फूट पडली तसे सध्या रिपब्लिकन पक्षामध्ये आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे इत्यादींचे गट आहेत. इतर अदखलपात्र गट आहेत ते वेगळेच. या पक्षांमध्ये रामदास आठवल्यांची लोकप्रियता जास्त आहे असे दिसते. सर्व प्रमुख गटांचे ऐक्याचे प्रयोग इतक्या वेळा आले आहेत की त्याला आता विनोदमूल्यही उरलेले नाही. अशा परिस्थितीत रिपिब्लकन पक्षाचा एक एक गट किती काम करू शकेल व काही नवे सांगु शकेल का, हा खरा प्रश्न आहे. डॉ. दीपक पवार