शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दी वर्ष:... असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 05:53 IST

Poet Shanta Shelke's birth centenary year: बहुमुखी प्रतिभेचे संपन्न देणे लाभलेल्या ख्यातनाम कवयित्री, लेखिका शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होतो आहे, त्यानिमित्ताने ..

- प्रा. मिलिंद जोशी(कार्याध्यक्ष, म. सा. परिषद)‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे,फुलाफुलात येथल्या उद्या हसेल गीत हे’,असं आपल्या कवितेतून सांगणाऱ्या शांताबाई शेळके यांची ही  एक फार सुंदर आठवण. महाविद्यालयीन जीवनात प्रा. श्री. म. माटे, के.ना.वाटवे आणि रा.श्री. जोग यांच्यासारखे गुरू, फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्या आणि रविकिरण मंडळातील कवींच्या कविता यांनी भारावलेल्या काळात  शांताबाईंचा लेखन प्रवास सुरु झाला.  एम. ए. झाल्यानंतर शांताबाई मुंबईला येऊन वृत्तपत्र व्यवसायात शिरल्या. ‘नवयुग’ साप्ताहिकात काम करू लागल्या.  स्तंभलेखन, मुलाखती , इंग्रजी लेखनाचे अनुवाद , सभेचा वृत्तांत , गरजेनुसार किमान वाचनीय मजकूर ऐनवेळी तयार करणे, पुस्तक परीक्षणे  असे नाना तऱ्हेचे लेखन करण्याची सवय या काळात  शांताबाईंना लागली. प्रतिभा, स्फूर्ती, मूड लागणे, लेखनाची बैठक जमणे याखेरीजही लिहिता येते हे  जाणवले.  प्रौढ, विदग्ध आणि संस्कृतप्रचुर भाषाशैलीचे खूप आकर्षण असलेल्या  शांताबाईंच्या  लेखनाचे  संस्कृत वळण अत्र्यांनी पार बदलून टाकले. ‘नवयुग’ मधली नोकरी सोडल्यावर अर्थार्जनासाठी ‘हंस’च्या अंतरकरांनी दिलेला इंग्रजी चित्रपटांच्या कथांच्या अनुवादाचा प्रस्ताव  शांताबाईंनी स्वीकारला. त्यातून अनुवादाची एक नवी वाट त्यांना सापडली. पुढे त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले.   ‘पुण्यातून मुंबईला गेल्यानंतर विहिरीतून समुद्रात जावे असा अनुभव मी घेतला’, असे  शांताबाईंनी म्हटले आहे. फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्या आणि रविकिरण मंडळाची कविता यांच्याभोवतीच फिरणाऱ्या  शांताबाईंच्या अभिरुचीला मुंबईतल्या वास्तव्याने प्रगल्भ आणि विकसित केले. कवितेशी असलेले  शांताबाईंचे नाते सर्वांत जवळचे !  रविकिरण मंडळाच्या प्रभावातून बाहेर पडल्यावर  त्यांची कविता अधिक अंतर्मुख, चिंतनशील व प्रयोगशील होत गेली. चित्रपटासाठी गाणी कशी लिहावीत, याचा वस्तुपाठ त्यांना भालजी पेंढारकरांनी दिला. भालजींच्या ‘स्वराज्याचा शिलेदार’साठीची गाणी जमेनात म्हणून शांताबाई आल्या तेव्हा भालजी त्यांना म्हणाले, सिनेमाची गाणी अगदी सोपी हवीत.  आपण एकमेकांशी बोलतो आहोत, अशा भाषेत लिहा. आपोआप सुचेल !’’- त्यानंतर चित्रपटासाठी कितीतरी अविस्मरणीय गीते  शांताबाईंनी लिहिली. हृदयनाथ मंगेशकरांसोबत त्यांची सर्वांत गाजली आणि लोकप्रिय झाली ती  कोळीगीते !  ‘माझिया शब्दांवरी माझा ठसा माझा ठसाहे शब्द माझे चेहरे अन् हे शब्द माझा आरसा ..’असं म्हणणाऱ्या शांताबाईंचा ठसा त्यांच्या सर्वच लेखन प्रकारांवर उमटलेला आहे.‘माझे लेखन कशासाठी?’ या आत्मपर लेखात शांताबाई म्हणतात, ‘‘जगण्यासाठी मी जी धडपड केली, तिच्या खालोखाल साहित्यासाठी मी धडपडत राहिले. आणि कित्येकदा तर, साहित्यच मला जगण्यासाठीही उपयुक्त ठरले.  साहित्याइतके दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने मला कधी भारून टाकलेले नाही. बालपणापासून मी शब्दांच्या प्रेमात पडले. शब्दांनी नादावून गेले. शब्दांशी खेळत राहिले. नदीच्या मुखातून समुद्रात शिरावे तसे, मी लिपी ओळखू लागण्याच्या आधी ऐकलेल्या शब्दांच्या द्वारा अर्थांच्या साम्राज्यात प्रविष्ट झाले. शहरांतूनच पण, शहरांच्या पलीकडे जावे, असे मला वाटते. शब्द हा मला जगाशी जोडणारा सर्वांत मोठा दुवा आहे. माझ्या कवितेतून चाललेला हा, माझा आणि माझ्या संदर्भात जगाचा शोध कधीच संपू नये, असे मला वाटते.’’शांताबाई म्हणत, ‘‘या माझ्या दीर्घ लेखन उद्योगाची फलश्रुती काय?, किती यश पदरात पडले?, शेवटी मी काय कमावले?, काय गमावले?, आणि यश म्हणजे तरी नेमके काय?, माझ्या दृष्टीने या प्रश्नांना फारसे महत्त्व नाही. महत्त्व आहे ते, माझ्या छंदांचे ; आनंद आहे, कृतार्थता आहे ती, त्याच्या अखंड साधनेत, सततच्या पाठपुराव्यात. हा पाठपुरावा कधीही संपू नये, असे वाटते..’’- शांताबाई आयुष्यभर हा पाठपुरावा करत राहिल्या.joshi.milind23@gmail.com

टॅग्स :marathiमराठी