शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

वेध - खारपाणपट्टा : उ:शाप कधी?

By admin | Updated: May 2, 2017 06:02 IST

खारपाणपट्ट्यात दरवर्षीच हे चित्र कमीअधिक फरकाने दिसते. राज्यकर्ते बदलतात, मग नवी आश्वासने दिली जातात! पाण्याचा

खारपाणपट्ट्यात दरवर्षीच हे चित्र कमीअधिक फरकाने दिसते. राज्यकर्ते बदलतात, मग नवी आश्वासने दिली जातात!  पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी  संपविण्याच्या बाता केल्या जातात;  पण परिस्थितीत काही फरक पडत नाही.पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमधून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात तापीला जाऊन मिळणाऱ्या पूर्णा नदीला तिच्या खोऱ्यातील भागात पूर्वापार जीवनदायिनी संबोधले जाते. विशेषत: पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पूर्णेच्या दोन्ही काठांवर वसलेल्या गावांसाठी तर वर्षानुवर्षांपासून ही नदीच पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. त्यामुळेच या भागातील जनमानसाने पूर्णेला आईचा दर्जा दिला आहे. या भागातील माणूस पूर्णेला मोठ्या प्रेमाने पूर्णामाय म्हणतो. अमरावती, अकोला व बुलडाणा या जिल्ह्यांमधील पूर्णेच्या दोन्ही काठांवरील भागात भूगर्भातील पाणी खूप खारे आहे. त्यामुळेच सुमारे ४० ते ५० किलोमीटर रुंद आणि १५५ किलोमीटर लांबीच्या या भागाला खारपाणपट्टा म्हणूनच संबोधले जाते. भूगर्भातील पाणी समुद्राच्या पाण्याशी साधर्म्य सांगण्याइतपत खारे असल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रामुख्याने पूर्णा व तिच्या उपनद्यांवरच अवलंबून राहावे लागते. लोकसंख्या कमी होती आणि धरणे बांधली गेली नाहीत, तोपर्यंत पूर्णामायने तिच्या लेकरांची पुरेपूर काळजी घेतली. अर्थात नदीपात्रातून पाणी आणण्याचे श्रम तेव्हाही होतेच; पण किमान चांगल्या गुणवत्तेचे पाणी मिळू शकत होते. पुढे शेतीच्या नावाखाली शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या धरणांनी आपल्या पोटात पाणी साठवणे सुरू केल्यापासून मात्र कधीकाळी बारोमास वाहणारी पूर्णामाय हिवाळ्यातच कोरडी पडू लागली अन् तिच्या लेकरांच्या पाण्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सुरू झाल्या. यावर्षी पावसाळा चांगला होऊनही पिण्याच्या पाण्यासाठी खारपाणपट्ट्यातील नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. खारपाणपट्ट्याच्या अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये १५ ते २० दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी अख्खे गाव नदी किंवा नाल्याच्या पात्रात खोदलेल्या खड्ड्यांभोवती, हे खारपाणपट्ट्यातील सार्वत्रिक चित्र झाले आहे. एवढा आटापिटा करून मिळणारे पाणी गढूळ आणि चवीला मचूळ तर असतेच; शिवाय अनेक रोगांनाही जन्म देते. त्यामुळेच या भागात मूत्रपिंडाच्या विकारांनी त्रस्त असलेल्या लोकांची संख्या प्रचंड आहे. जिथे माणसांनाच चांगले पाणी मिळत नाही, तिथे पशूंचा काय पाड? दूषित पाणी पिऊन मरायला टेकलेली गुरे, हे या सगळ्याच गावांमधील चित्र आहे. काही गावे अगदी पूर्णेकाठी वसलेली आहेत; पण गावकऱ्यांना पाण्यासाठी तब्बल पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते. हा प्रश्न केवळ पाणीटंचाईपुरताच मर्यादित नाही, तर त्याला सामाजिक पदरही आहे. मुलींचे विवाह खारपाणपट्ट्यातील मुलांशी लावून द्यायला इतर भागातील लोक तयार नसतात. आता तर खारपाणपट्ट्यातील उपवर मुलींचे कुटुंबीयही शक्यतोवर मुलीचा विवाह खारपाणपट्ट्याबाहेरील मुलांशी जुळविण्याचा प्रयत्न करतात. पाणीटंचाई एवढे उग्र रूप धारण करते, की पाण्याअभावी मुलींचे विवाहसोहळे स्वत:च्या गावाऐवजी एखाद्या नातेवाइकाच्या गावात आयोजित करण्याची पाळी वधूपित्यांवर येते!खारपाणपट्ट्यात हे चित्र दरवर्षीच कमीअधिक फरकाने दिसते. सरकारला जाग येण्याची मात्र काहीही चिन्हे दिसत नाहीत. राज्यकर्ते बदलतात, मग नवी आश्वासने दिली जातात! पाणीपुरवठा योजनांच्या घोषणा होतात, पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्याच्या बाता केल्या जातात; पण परिस्थितीत काही फरक पडत नाही. प्रत्येक सरकारने या भागासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना जाहीर केल्या. कधी उच्चाधिकार समिती गठित केली जाते, तर कधी खारपाणपट्टा संशोधन केंद्राचे गाजर दाखविले जाते. कधी पूर्णेवर बॅरेजेस उभारण्याची घोषणा होते, तर कधी चार हजार कोटी रुपयांच्या सुधारणा प्रकल्प कराराची घोषणा होते. घोषणांचे पुढे काही होत नाही अन् शापित खारपाणपट्ट्याला उ:शापही लाभत नाही!- रवि टाले