शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

पीकपेरा का बदलला

By admin | Updated: May 4, 2016 04:07 IST

कोणत्याही संदर्भात एखादी बाब उघडकीस आली तरच ती नियमबाह्य किंवा बोगस असल्याचे बोलले जाते. जोवर ती बाब कोणाच्या निदर्शनास येत नाही वा कोणी ती लक्षात आणून देत

कोणत्याही संदर्भात एखादी बाब उघडकीस आली तरच ती नियमबाह्य किंवा बोगस असल्याचे बोलले जाते. जोवर ती बाब कोणाच्या निदर्शनास येत नाही वा कोणी ती लक्षात आणून देत नाही तोवर ती नियमाच्या चौकटीत आणि रीतसर असल्याचे मानले जाते. असाच काहीसा प्रकार खान्देशातील जळगाव जिल्ह्यात घडला. एकाच जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये जादा क्षेत्र आणि केळीचा पीकपेरा दाखवून विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून बोगस कर्जवाटप झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कार्यक्षेत्रातच हा बोगस कर्जवाटप केल्याचा प्रकार घडला आहे. जिल्हा बॅँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाला शासन व नाबार्डकडून व्याजात सवलत मिळत असल्यामुळे अधिकाधिक शेतकरी या अल्पदरातील कर्जाचा लाभ घेतात. जिरायती व बागायती या क्षेत्रासाठी वेगवेगळे दर असल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी उताऱ्यावर केळीचे क्षेत्र दाखवून बोगस कर्ज लाटले. हा आकडा २०० कोटींच्या घरात असल्याचे पालकमंत्री सांगतात, चौकशी सुरू केल्याचे नमूद करतात आणि फसवणूक करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही असा सज्जड इशाराही देतात. परंतु बोगस कर्ज लाटण्याची हिंमत एकटा शेतकरी करणार नाही, हेही तितकेच खरे. या प्रकरणामागील बोलवते धनी मात्र निश्चितच वेगळे असू शकतील. कर्जवाटप प्रणालीतील काही घटकांनी गारपीट, दुष्काळाने पीडित शेतकऱ्यांना ही युक्ती सुचविली असेल. या बोगस कर्जवाटपाचा लाभार्थी एक आमदारदेखील असल्याची बाब जेव्हा पुढे येते, तेव्हा याठिकाणी किती बनवाबनवी आणि अंदाधुंदी सुरू असेल याची प्रचिती येते. एखाद्या शेतकऱ्याने आपला पीकपेरा बदलणे हे समजू शकते; पण १२ तालुक्यातील शेतकरी जेव्हा जादा क्षेत्र आणि चुकीचा पीकपेरा दाखविण्याचे धाडस करतात तेव्हा यामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा प्रकार केवळ खान्देशात आणि पहिल्यांदाच घडला असेही नाही. असे प्रकार वारंवार घडले आहेत. शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्य जनतेसाठी असतात; परंतु त्या पात्र लाभार्थींपर्यंत पूर्णपणे कधीच पोहचत नाहीत. अनेक गब्बर शेतकरी, लोकप्रतिनिधी स्वत: किंवा नातलगांच्या नावावर त्या योजना घशात घालतात. यास ‘अंधेर नगरी, बेबंद राजा’ असे नाही तर काय म्हणायचे?