शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पीकपेरा का बदलला

By admin | Updated: May 4, 2016 04:07 IST

कोणत्याही संदर्भात एखादी बाब उघडकीस आली तरच ती नियमबाह्य किंवा बोगस असल्याचे बोलले जाते. जोवर ती बाब कोणाच्या निदर्शनास येत नाही वा कोणी ती लक्षात आणून देत

कोणत्याही संदर्भात एखादी बाब उघडकीस आली तरच ती नियमबाह्य किंवा बोगस असल्याचे बोलले जाते. जोवर ती बाब कोणाच्या निदर्शनास येत नाही वा कोणी ती लक्षात आणून देत नाही तोवर ती नियमाच्या चौकटीत आणि रीतसर असल्याचे मानले जाते. असाच काहीसा प्रकार खान्देशातील जळगाव जिल्ह्यात घडला. एकाच जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये जादा क्षेत्र आणि केळीचा पीकपेरा दाखवून विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून बोगस कर्जवाटप झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कार्यक्षेत्रातच हा बोगस कर्जवाटप केल्याचा प्रकार घडला आहे. जिल्हा बॅँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाला शासन व नाबार्डकडून व्याजात सवलत मिळत असल्यामुळे अधिकाधिक शेतकरी या अल्पदरातील कर्जाचा लाभ घेतात. जिरायती व बागायती या क्षेत्रासाठी वेगवेगळे दर असल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी उताऱ्यावर केळीचे क्षेत्र दाखवून बोगस कर्ज लाटले. हा आकडा २०० कोटींच्या घरात असल्याचे पालकमंत्री सांगतात, चौकशी सुरू केल्याचे नमूद करतात आणि फसवणूक करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही असा सज्जड इशाराही देतात. परंतु बोगस कर्ज लाटण्याची हिंमत एकटा शेतकरी करणार नाही, हेही तितकेच खरे. या प्रकरणामागील बोलवते धनी मात्र निश्चितच वेगळे असू शकतील. कर्जवाटप प्रणालीतील काही घटकांनी गारपीट, दुष्काळाने पीडित शेतकऱ्यांना ही युक्ती सुचविली असेल. या बोगस कर्जवाटपाचा लाभार्थी एक आमदारदेखील असल्याची बाब जेव्हा पुढे येते, तेव्हा याठिकाणी किती बनवाबनवी आणि अंदाधुंदी सुरू असेल याची प्रचिती येते. एखाद्या शेतकऱ्याने आपला पीकपेरा बदलणे हे समजू शकते; पण १२ तालुक्यातील शेतकरी जेव्हा जादा क्षेत्र आणि चुकीचा पीकपेरा दाखविण्याचे धाडस करतात तेव्हा यामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा प्रकार केवळ खान्देशात आणि पहिल्यांदाच घडला असेही नाही. असे प्रकार वारंवार घडले आहेत. शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्य जनतेसाठी असतात; परंतु त्या पात्र लाभार्थींपर्यंत पूर्णपणे कधीच पोहचत नाहीत. अनेक गब्बर शेतकरी, लोकप्रतिनिधी स्वत: किंवा नातलगांच्या नावावर त्या योजना घशात घालतात. यास ‘अंधेर नगरी, बेबंद राजा’ असे नाही तर काय म्हणायचे?