शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बिहारचा ‘राष्ट्रीय’ धडा

By admin | Updated: February 21, 2015 02:13 IST

जितन मांझी या उपटसुंभ पुढाऱ्याने त्याच्या हाती विश्वासाने सोपविलेली राज्याची सत्ता पळवून नेण्याचा केलेला प्रयत्न जनता दल (यू)च्या निष्ठावान सभासदांनी व नेत्यांनी हाणून पाडला आहे

बिहारात ‘दूध का दूध और पानी का पानी’ झाले आहे. जितन मांझी या उपटसुंभ पुढाऱ्याने त्याच्या हाती विश्वासाने सोपविलेली राज्याची सत्ता पळवून नेण्याचा केलेला प्रयत्न जनता दल (यू)च्या निष्ठावान सभासदांनी व नेत्यांनी हाणून पाडला आहे. मांझीला पाठिंबा देणाऱ्या भाजपाचीही त्यामुळे भरपूर अप्रतिष्ठा झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाचे प्रायश्चित्त म्हणून नितीशकुमारांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडले व ते विश्वासाने जितन मांझीच्या हाती सोपविले. काही काळ राष्ट्रीय राजकारणात घालवून पुन्हा बिहारमध्ये परत येण्याचा आपला इरादा नितीशकुमारांनी तेव्हाही जाहीर केला होता. परंतु मांझीना त्या पदावर बसताच नव्या महत्त्वाकांक्षा फुटल्या व मुख्यमंत्रीपद आपलेच असल्याचे त्यांना वाटू लागले. नितीशकुमार व पक्षातील वरिष्ठ नेत्यांना न जुमानता निर्णय घेण्याचा व आपल्या मर्जीनुसार राज्याचा कारभार करण्याचा सपाटाच त्यांनी सुरू केला. त्याविषयी पक्षाच्या नेतृत्वाने दिलेली समजही त्यांनी कधी मनावर घेतली नाही. या काळात बिहारमध्ये विरोधी बाकावर बसणाऱ्या भाजपचा व त्या पक्षाचे नेते सुशीलकुमार मोदी यांचाही मांझींना पाठिंबा राहिला. नितीशकुमारांना वजा करून व पक्षातील आपल्या जातीचे आमदार सोबत घेऊन आपण भाजपाच्या मदतीने सरकार बनवू शकतो या महत्त्वाकांक्षेने मांझींना पछाडले होते. त्या अवस्थेतच त्यांनी नितीशकुमारांना पक्षाबाहेर काढण्याचा प्रयत्न करून पाहिला. पक्षाने जितन मांझींनाच पक्षाबाहेर काढले तेव्हा त्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला राज्यपालांना दिला. राज्यपालांनी तो मनावर न घेता विधानसभा कायम ठेवली व मांझींना तीत आपले बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली. मांझींनी ते आव्हान स्वीकारले आणि त्यासाठी जमवाजमवीला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सगळ््या आमदारांचा विकास निधी एक कोटींवर नेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. दिल्लीला जाऊन त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न केला. मांझीच्या सरकारने कोणतेही धोरणविषयक निर्णय घेऊ नयेत असे न्यायालयाने बजावल्यानंतरही तसे निर्णय घेणे मांझींनी सुरुच ठेवले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी आपला पक्ष मांझीला पाठिंबा देईल असे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी जाहीरही केले. परंतु अखेरच्या क्षणी त्यांना आपला इरादा बदलावा लागला असणार. दिल्लीतील पराभवाने त्या पक्षाच्या नेत्यांचीही डोकी ठिकाणावर आणली आहेत. त्याच मुळे भाजपाने मांझीच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर ऐनवेळी माघार घेण्याचे सूचित केले असणार. पक्ष विरोधात, न्यायालये विरोधात, सभागृह विरोधात, केंद्र सरकार हतबल आणि पाठिंबा देतो म्हणणाऱ्या भाजपाची ऐनवेळची माघार अशी सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर मांझींच्याही अकलेचे दरवाजे उघडले असणार. आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ऐनवेळी देण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या या नाईलाजातूनच आला असणार. विधीमंडळाची बैठक सुरू होण्याच्या काही काळच अगोदर त्यांनी तो दिला असेल तर अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचे जोडजंतरीचे राजकारण चालू राहिले असावे हेच स्पष्ट आहे. या प्रकरणाने बिहारएवढेच देशाच्या राजकारणालाही काही चांगले धडे दिले आहेत... नितीशकुमारांनी नको तेवढ्या संतत्वाचा आव आणून केवळ प्रायश्चित्त म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देणे ही त्यांची पहिली चूक. जितन मांझीसारख्या बेभरवशाच्या माणसाकडे आपले पद सोपविण्याचा आततायीपणा करणे ही दुसरी चूक. तर मांझीचे स्वतंत्र चाळे सुरू झाले तेव्हा त्यांना अडविण्यात त्यांनी केलेली दिरंगाई ही तिसरी चूक. राजकारणात अशा मांझींची संख्या मोठी आहे. किंबहुना राजकारण हे संधीसाधू माणसांचेच क्षेत्र आहे. त्यात कोण केव्हा दगाफटका करील याचा नेम नसतो. म्हणून नेतृत्वाने आपल्या अनुयायांबाबत सदैव सावध असले पाहिजे असे त्या क्षेत्रात म्हटले जाते. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत संरक्षण मंत्रीपद स्वीकारले तेव्हा आपल्या जुन्या पदाचा भार आपले विश्वासू सहकारी वसंतराव नाईक यांच्याकडे सोपविला. नाईकांनी त्यांचा विश्वास खराही ठरविला. पुढे शरद पवारांना दिल्लीला जाण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी मात्र सुधाकरराव नाईकांना आपला वारस नेमण्याची चूक केलेली आपण पाहिली. आता काँग्रेस पक्षात सारे काही दिल्लीच ठरवत असल्यामुळे अशा चुकांची व बरोबरीची संधी राहिली नाही ही गोष्ट वेगळी. बिहार हे देशातील एकेकाळचे बिमारू म्हणून ओळखले जाणारे मागासलेले राज्य आहे. गुंडगिरी, खंडणीखोरी, अपहरण व खून यासारख्या गुन्ह्यांतही त्याचा देशात फार वर नंबर लागायचा. त्या राज्याला प्रथमच चांगले दिवस नितीशकुमारांच्या काळात आले. त्याच्या विकासाची गती वाढली व बिहारमधून बाहेर जाणारा तरुणांचा लोंढाही त्याकाळात थांबला. राज्यात प्रथमच शांतता व सुव्यवस्था येऊन तेथील स्त्रिया सुरक्षित झाल्या. अशा राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याची एक जबाबदारी ही की मनात आले म्हणून वा प्रायश्चित्त घ्यायचे म्हणून त्याने ही जबाबदारी सोडता कामा नये. अन्यथा मुख्यमंत्री बदलला की राज्याची शासनव्यवस्थाही अस्थिर व दिशाहीन होते हा बिहारने देशाला दिलेला धडा आहे.