शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मिनिमम गव्हर्नमेन्ट

By admin | Updated: July 11, 2016 04:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या अनेक आकर्षक घोषणांपैकी एक घोषणा होती, ‘मॅक्सिमम गव्हर्नन्स, मिनिमम गव्हर्नमेंट’! त्याचा अर्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या अनेक आकर्षक घोषणांपैकी एक घोषणा होती, ‘मॅक्सिमम गव्हर्नन्स, मिनिमम गव्हर्नमेंट’! त्याचा अर्थ, आमच्या सरकारचा आकार शक्य तेवढा लहान असेल; पण आम्ही राज्यशकट मात्र कमालीच्या कार्यक्षमतेने हाकू! आता राज्यशकट किती कार्यक्षमतेने हाकले जात आहे, याबाबत प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात; पण अलीकडेच पार पडलेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तार व फेरबदलानंतर, ‘मिनिमम गव्हर्नमेंट’चा मागमूसही शिल्लक राहिलेला दिसत नाही. राज्यघटनेतील तरतुदीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कमाल संख्या एकूण लोकसभा सदस्यांच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. सध्या लोकसभेत एकूण ५४५ सदस्य आहेत. याचाच अर्थ मंत्र्यांची एकूण संख्या ८२ पेक्षा जास्त असू शकत नाही. पण ताज्या विस्तारामुळे ती ७८ झाली आहे. म्हणजेच मंत्रिमंडळाने कमाल मर्यादा जवळपास गाठलीच आहे. मोदींचे पूर्वसुरी डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातही शेवटच्या विस्तारानंतर ७८ मंत्रीच होते. मे २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तारुढ झाले, तेव्हा मंत्रिमंडळात केवळ ४५ मंत्री होते आणि ते आधीच्या १६ वर्षांतील सर्वात छोटे मंत्रिमंडळ ठरले होते. छोट्या मंत्रिमंडळामुळे उत्तरदायित्व वाढेल, नोकरशाहीच्या आकाराला पायबंद बसेल व निर्णयप्रक्रिया सुटसुटीत होईल, असे सांगत त्याचे कौतुकही झाले होते. त्यानंतरच्या पहिल्या विस्तारात, मंत्र्यांची संख्या ६६ वर पोहोचली व आता ती ७८ वर पोहोचली आहे. डॉ. सिंग आघाडीचे पंतप्रधान असल्याने सर्व घटकांना खूश ठेवण्यासाठी त्यांना अनेक तडजोडी करणे भाग होते. उलट मोदींच्या पक्षाला लोकसभेत पूर्ण बहुमत प्राप्त आहे. डॉ. सिंग पंतप्रधान असताना दोन सत्ता केंद्रे होती, असा आरोप केला जात असे, तर मोदींनी अप्रत्यक्षरीत्या अध्यक्षीय प्रणाली सुरू केल्याचा आरोप होतो. त्यामुळे कुणाला तरी खूश करणे ही मोदींची अपरिहार्यता नाही. शिवाय काही मंत्रालयांचे विलिनीकरण करून, तसेच मंत्री गट व स्थायी समित्यांना सोडचिठ्ठी देत, त्यांनी निर्णय प्रक्रिया जलद केली आहे. असे असताना मोदी मंत्रिमंडळाचा आकार अवघ्या दोनच वर्षात डॉ. सिंग मंत्रिमंडळाएवढा होणे, हे कशाचे लक्षण म्हणता येईल?