शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

मन वढाय वढाय

By admin | Updated: February 23, 2015 22:45 IST

खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मन’ या प्रसिद्ध कवितेतील हे कडवे आहे. बहिणाबार्इंचे शिक्षण वारकरी विद्यापीठात आणि मंदिराच्या पाठशाळेत झाल्यामुळे

डॉ. दिलीप धोंडगे - मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरकिती हाकला हाकला फिरी येतं पिकावरखान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मन’ या प्रसिद्ध कवितेतील हे कडवे आहे. बहिणाबार्इंचे शिक्षण वारकरी विद्यापीठात आणि मंदिराच्या पाठशाळेत झाल्यामुळे संतांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्या एकंदर विचारपद्धतीवर झालेला होता. माया, मोह, मद, मत्सरादी षड्विकारांचा मनाला प्रादुर्भाव होतो. असे विकारग्रस्त मन मग अनावर होते. संतांचे तत्त्वज्ञानदेखील हेच असते.‘तुम्ही करा रे भजन । ऐका रे कीर्तन ।।नका होऊं रे राकेस । शुद्ध ठेवा मन ।।असं म्हणणाऱ्या बहिणाबार्इंना माणसाचा राक्षस होऊ नये याचे अगत्य वाटते व यासाठी मन शुद्ध ठेवण्याची गरज प्रतीत होते. मन शुद्ध ठेवण्याचा त्यांना आकळलेला उपायही त्या सांगतात व तो उपाय म्हणजे भजन-कीर्तन हा असल्याचा स्पष्ट करतात. भजन-कीर्तन हा मंदिराच्या पाठशाळेतला स्वाध्याय आहे. मन शुद्ध नसलं तर मनुष्य राक्षस होतो. कारण मन हे ओढाळ आहे. दोन वेळा ‘वढाय’ हा शब्द आलेला आहे. द्विरुक्ती ही ते विशेषण ठसविण्यासाठी आहे. मनाचं वढायपण स्पष्ट करण्यासाठी बहिणाबार्इंनी एकदम चपखल प्रतिमा वापरली आहे. ती प्रतिमा म्हणजे ते ‘उभ्या पिकातलं ढोर’ अशी आहे. उभं पीक म्हणजे फळाफुलाला आलेलं पीक. त्याला उपभोगणारं मन हे ओढाळ मन. यामुळे ओढाळपण हे सार्थ होतं. पुढे हे ओढाळपण बहिणाबाई अधिक गडद करतात.‘किती हाकला हाकला ।फिरी येतं पिकावर ।।’ कितीही हाकला, हे ‘हाकला हाकला’ या द्विरुक्तीतून मांडले आहे. क्रियेचे आधिक्य सूचित करण्यासाठी वापरलेले क्रियापद मनाच्या आसक्तीचंही वर्णन करतं. पुन्हा ते मन पिकावर फिरून येतं. ढोराचं हे सहजस्वाभाविक वर्तन सर्वांच्याच निरीक्षणात आलेलं असल्यामुळे प्रतिपाद्य विषयाचे आकलन सहजसुलभ होते. पण ढोराच्या वर्तनामागे मनाची प्रेरणा कार्यशील असल्याचे काही मानसशास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट झालेले नाही. ढोराची प्रेरणा ही त्याला केलेल्या प्रतिबंधातून मुक्त होण्याची धडपड ही असू शकते व ही धडपड त्याच्या भुकेशी निगडित असू शकते. पण मानवाच्या बाबतीत मनाची प्रेरणा ही प्रधान असल्याचे सिद्ध झालेले आहे. म्हणून मनाला ओढाळ ढोराची प्राकृतिक उपमा दिलेली आहे. अमूर्त तत्त्व स्पष्ट करण्यासाठी मूर्त उपमानांचा वापर करावा लागतो. बहिणाबार्इंनी संतांच्या तत्त्वज्ञानाच्या संस्काराचा आपल्या प्रतिभेच्या साहाय्याने जो नवोन्मेष प्रकट केला, तो विलोभनीय होय. यादृष्टीने हे कडवे तत्त्वकाव्य होय.