शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सागरी मार्गाचा नांगर

By admin | Updated: June 12, 2015 23:40 IST

सख्य कितीही असले तरी हवामानाप्रमाणे बदलणाऱ्या राजकारणात राजकीय नेते कमालीचे दक्ष झाले आहेत. जनतेला आकर्षित करणाऱ्या योजना आपल्या पक्षाकडे असाव्या

रघुनाथ पांडे -

सख्य कितीही असले तरी हवामानाप्रमाणे बदलणाऱ्या राजकारणात राजकीय नेते कमालीचे दक्ष झाले आहेत. जनतेला आकर्षित करणाऱ्या योजना आपल्या पक्षाकडे असाव्या म्हणून निवडणुका जिंकण्यासाठी अनेकदा पत्ते पिसावे लागतात. सोन्याची कोंबडी असलेल्या मुंबई महापालिकेच्या दोन वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीची तयारी भाजपाने दणक्यात सुरू केली. विधानसभा निवडणुकीत भाजपाला मुंबईत मिळालेले यश टिकवून ठेवण्यासह त्याचे प्रतिबिंब महापालिकेच्या निवडणुकीत उमटावे यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. त्याचेच प्रत्यंतर म्हणजे, मूळ शिवसेनेचा असलेला मुंबई सागरी मार्गाचा नांगर भाजपाच्या किनारपट्टीवर अडकविण्यात फडणवीस यशस्वी झाले. आपला मुद्दा कोणी हिसकावला तर एरवी शिवसेना जशास तसे उत्तर देई, पण दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांचेच व्हीजन डॉक्युमेंट भाजपाने हायजॅक करूनही फार खळखळ नसल्याने शिवसेना नरमल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. फडणवीसांनी मातोश्री जिंकली की मातोश्री फडणवीसांवर खूष आहे, याचा शोध घेतला जातो आहे. ‘राज्यात युतीचे सरकार आहे. मुंबई व राज्याचा विकास करणाऱ्या या निर्णयामुळे झालेल्या आनंदावर विरजण घालू नका’, असे मुत्सद्दीपणाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले खरे, पण निवडणुकीच्या पुढ्यात हा मुद्दा लक्षणीय व श्रेयाचाही ठरेल. तसे पाहता शिवसेनेच्या बाजुचा हा एकच विषय भाजपाने मोडून काढला असे नाही, तर शिवसेना सत्तेत आल्यानंतर अनेक मुद्दे फडणवीसांनी अलगद किनारी लावले आहेत. स्वकीय ज्येष्ठ मंत्र्यांसह शिवसेनेच्या काही मंत्र्यांची बोलती त्यांनी बंद केली, जैतापूरचा तापता विषय थंड केला. अर्थात त्यांच्याबद्दल सारे चांगलेच बोलतात असेही नाही. त्यांना ते अपेक्षितही नसेल. मात्र दिल्लीची भक्कम साथ असल्याने ते पक्ष व सत्तेतील आव्हाने सहज मोडून काढत आहेत. दिल्लीला महाराष्ट्रात जागोजागी भाजपाची सत्ता हवी असल्याने वाट्टेल ते करा असेच संकेत आहेत. मग मित्राच्या हाती असलेली मुंबई महापालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी पक्ष म्हणून भाजपाने ही अगदी उघडपणे चाल खेळली. भाजपाने जाहीर मोहोर उमटविलेला सागरी मार्ग सेनेच्या राजकारणासाठी अत्यंत मोलाचा आहे. फडणवीस थेट मुख्यमंत्री झाले, मात्र प्रदेशाध्यक्ष असताना सत्तेकडे जाणारे अनेक बारकावे शोधले. त्याचा वापर आता सुरू आहे. मुंबईतील वाहतूक सुलभ करण्याचा मुद्दा त्यातीलच आहे. सी-प्लेन उडवणे असो, की ३६ किलोमीटर अंतराचा हा सागरी मार्ग बांधणे असो, सारे मुंबईत पक्ष मजबुतीसाठी. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे ‘व्हीजन डॉक्युमेंट’ असलेला सागरी मार्ग शिवसेनेच्या जबड्यातून फडणवीस यांनी सहज ओढला व सारे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन ते मोकळेही झाले! मुळात मुंबई महापालिकेने केंद्राकडे चार वर्षापूर्वी पाठवलेला प्रस्ताव धूळ खात पडून होता. काँग्रेसनेही तो आपला भासवून निवडणुकीचा मुद्दा करण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंनी काँग्रेसला फटकारल्यावर वेस्टर्न एक्स्प्रे्रेस हायवेवरील सहार एलीवेटेड सारखा हा पूल असावा असा एक फाटा फुटला व मुद्दा पुन्हा बासनात गेला. फडणवीसांनी पंतप्रधानांना श्रेय दिल्याने शिवसेनेची पुढची भूमिका स्पष्ट होईल. सध्या तरी भाजपाने वेळ मारून नेली आहे. शिवसेनेला सोबत घेऊन मुंबई महापालिका गाठायची असे कोल्हापूर अधिवेशनात भाजपाने ठरविले, तरी वेळेवरची खुस्पटे काही कमी नसतील. शिवसेना ‘टायमींग’ साधेल असे शिवसेनेला ओळखून असलेले दिल्लीतील ‘भाजपाई’ सांगतात. साडेपाच किलोमीटरचा सागरी सेतू तीन वर्षांत होणार होता, त्याला दहा वर्षे लागली. ३६ किलोमीटरचा हा सागरी मार्ग तीन वर्षांत पूर्ण करण्याचा इरादा आहे. पण दहा वर्र्षेे व दोन निवडणुका हा मार्ग घेईल. वांद्रे-वरळी सागरी सेतूची संकल्पना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती. नितीन गडकरींनी ती प्रत्यक्षात आणली. सागरी मार्गाची संकल्पना उद्धव ठाकरेंची आहे. फडणवीस ती प्रत्यक्षात यावी यासाठी पराकाष्ठा करीत आहेत. राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. इथेही तेच घडते आहे.‘सीलिंक’मुळे पुलकरी असे बिरूद लागलेल्या गडकरींची जागा सागरी मार्गामुळे फडणवीस घेतील का, असे दिल्लीत बोलले जाते. संहिता जुनीच आहे. नेपथ्यही जुनेच. बदलली ती पात्रे आणि थोडेफार राजकारण..