शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मनाचिये गुंथी - ब्रह्मांडाची सुव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2017 06:06 IST

पुरातन काळापासून ब्रह्मांड हा विषय अत्यंत उत्सुकतेचा राहिलेला आहे. या उत्सुकतेमुळेच या संबंधात सखोल शोध झालेले आहेत

पुरातन काळापासून ब्रह्मांड हा विषय अत्यंत उत्सुकतेचा राहिलेला आहे. या उत्सुकतेमुळेच या संबंधात सखोल शोध झालेले आहेत. खगोलशास्त्र याच शोधाची निर्मिती आहे. प्राचीन काळापासून जगातील अनेक देशांमध्ये यावर मोठे महत्त्वपूर्ण शोध लागलेले आहेत. प्राचीन भारत वर्षात या संबंधात वैज्ञानिक व सखोल संशोधन करणारे अनेक दिग्गज रहस्यवादी निर्माण झालेले आहेत. वेदातील अनेक मंत्रांत या ब्रह्मांडाची चर्चा आलेली आहे. नासदीय सुक्तात शून्यातून ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, या संबंधात फारच सखोल चर्चा आलेली आहे. बिग बैंग या सिद्धांताप्रमाणे या सुक्तामध्येसुद्धा स्फोटाद्वारे या सृष्टीची निर्मिती झालेली आहे, असे प्रतिपादित केलेले आहे. आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य यासारख्या सुप्रसिद्ध विद्वानांनी खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून ब्रह्यांडाची फारच मोठी विस्तुत व्याख्या केलेली आहे. आधुनिक खगोलशास्त्र अत्यंत प्रगत आहे. त्यातील अनेक सूक्ष्म व अत्यंत प्रभावशाली उपकरणांद्वारे ब्रह्मांडाच्या संबंधात अत्यंत बहुमूल्य ज्ञान उपलब्ध झालेले आहे. याव्यतिरिक्त आकाशात सोडलेल्या उपग्रहाद्वारेसुद्धा अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त झालेल्या आहेत. ब्रह्मांडाच्या संबंधात पुरातन व अलीकडील उपलब्ध माहितीनुसार पूर्ण ब्रह्मांडाची व्यवस्था ही एका तालासुरानुसार चालते. प्रत्येक ब्रह्मांडीय पिंडाचे आपले स्वत:चे एक केंद्र आहे. त्या केंद्राच्या भोवताली ब्रह्मांडीय पिंडाचे आपले मंडळ आहे. जसे आकाशात अब्जावधी पिंड आहेत ते अत्यंत लयबद्ध तऱ्हेने परस्पराशी संबंध व तारतम्य राखत आहेत. उदा. आमच्या सूर्यमंडळातील ग्रह व उपग्रह हे अत्यंत व्यवस्थित तऱ्हेने आपल्या केंद्रावर स्थित आहेत. आमच्या भारतीय तत्त्वज्ञानींनी जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडामध्ये असल्याचे प्रतिपादित केलेले आहेत.‘यत् पिण्डे तत् ब्रह्माण्डे’ब्रह्मांड विशालतम असून, पिंड लघुतम आहे. परंतु ब्रह्मांडातील संपूर्ण व्यवस्था या पिंडामध्येसुद्धा आहे. याचे कारण हे आहे की, योगी आपल्या चेतनेद्वारे ध्यान-धारणेने अंतर्मुख होऊन आपल्या पिंडाच्या आत त्या विशालतम ब्रह्मांडाचे दर्शन आपल्या सूक्ष्म दृष्टीने करतो. श्रीमद्भगवतगीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अशीच सूक्ष्म दृष्टी देऊन विश्वरूप दर्शन घडविले.‘दिव्य ददामि ते चक्षु:’या सूक्ष्म दृष्टीलाच दिव्यदृष्टी असेसुद्धा संबोधले जाते. जेव्हा आम्ही आपले विचार, वाणी व कर्म यामध्ये सुव्यवस्था राखतो, तेव्हा आम्ही आपल्या व्यक्तित्वाची परिपूर्णता प्राप्त करतो. या सुव्यवस्थेचे खंडण होेणे म्हणजेच रोग व अकाली मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे. ज्ञान, कर्म व भक्ती हे आमचे पिंड सुव्यवस्थेत राखण्याचे मार्ग आहेत.डॉ. भूषणकुमार उपाध्याय